Blog No. 2023/49
Date: 26th, February 2023.
मित्रांनो,
मनमोहन देसाई हे 70 आणि 80
च्या दशकातील सर्वात यशस्वी चित्रपट निर्मात्यांपैकी एक समजले जातात. बॉलीवूड मधील
सर्वात प्रभावशाली चित्रपट दिग्दर्शक आणि मसाला चित्रपटाचे प्रणेते म्हणून देसाई
मानले जातात. हिन्दी चित्रपटांचे एक वेगळे युग त्यांच्या मुळे अनुभवास मिळाले.
मनमोहन देसाई बद्दल थोडे काही
मनमोहन देसाई यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1937 चा. ते एका गुजराती कुटुंबात जन्माला आले. त्यांचे वडील किकूभाई देसाई हे पॅरामाउंट स्टुडिओ (नंतरचे फिल्मालय) चे मालक आणि भारतीय चित्रपट निर्माते होते.त्यांनी मुख्यतः स्टंट चित्रपट जसे की सर्कस क्वीन, गोल्डन गँग आणि शेख चिली चित्रपट बनविले.त्यांचे मोठे भाऊ सुभाष देसाई यांनी त्यांना 1960 मध्ये छलिया चित्रपटात दिग्दर्शक म्हणून चान्स दिला.निर्माता सुभाष देसाई ह्यांनी निर्मिलेल्या ब्लफ मास्टर,धरमवीर आणि देशप्रेमी ह्या चित्रपटांची निर्मिती केली.ज्यांचे दिग्दर्शन हे मनमोहन देसाई ह्यांनी केले.
मनमोहन देसाई यांची वेगळी थीम
मनमोहन देसाई हे परिवार-केंद्रित,action-गाणी-आणि-नृत्य
चित्रपटांसाठी ओळखले जातात.भारतीय जनतेच्या अभिरुचीनुसार त्यांनी चित्रपट बनविले.त्यांना
त्यात यश देखिल भरपूर मिळाले. मनमोहन देसाई यांनी प्रथम मसाला चित्रपटांची
निर्मिती केली. त्यांचे चित्रपट म्हणजे जत्रेत हरवलेले भाऊ पुनः एकत्र येतात. ह्या
थीमवर बेतलेले होते.
मनमोहन देसाई यांचे चित्रपट
मनमोहन देसाई यांच्या
चित्रपटांची नांवे बघितली तर त्या काळातील लोक हा हिट तो हिट असेच सांगत राहतील.
त्याचे शेवटचे तीन चित्रपट मात्र ओळीने फ्लॉप झाले. त्यांनी राजकपूर सोबत 1960 ला
छलिया, 1963 ला शम्मी कपूर सोबत ब्लफ मास्टर, 1966 ला बत्तमीज हा शम्मी कपूर सोबत,
1968 ला किस्मत विश्वजीत सोबत तर 1970 ला सच्चा झुटा राजेश खन्ना सोबत, 1972 ला रामपुरका
लक्ष्मण रणधीर कपूर सोबत, भाई हो तो ऐसा 1972 ला जितेंद्र सोबत तर शशी कपूर सोबत 1973 ला आ गले लग जा, राजेश खन्ना
सोबत 1974 ला रोटी आणि मग अमिताभ बच्चनचे युग सुरु झाले. 1974 ला परवरिश, 1977 ला अमर
अकबर एंथनी, 1979 ला सुहाग, 1981 ला नसीब, 1982 ला देश प्रेमी, 1983 ला कुली,जो अमिताभला
सेटवर झालेल्या अपघातामुळे जास्त गाजला,अमिताभच्या प्राणावर बेतले होते,1985 चा मर्द
थोडा फार यशस्वी झाला. पण त्या नंतरचे 1988 चा गंगा जमुना सरस्वती,1989 चा तूफान हे
दोन चित्रपट अमिताभ असूनही साफ पडले.1993 ला त्यांनी अनमोल हा शेवटचा चित्रपट केला.अमिताभच्या
युगातही त्यांनी 1977 ला धर्मवीर आणि चाचा भतिजा हे दोन चित्रपट केले आणि ते यशस्वी
झाले.. अमिताभ सोबतचा अमर अकबर अॅंथनी हा मल्टी स्टार चित्रपट यांत अमिताभ सोबतच विनोद
खन्ना, ऋषि कपूर, परवीन बाबी,शबाना आझमी,नीतू सिंग आणि प्राण हे स्टार होते. तो काळ
हा मल्टी स्टार चित्रपटांचा होता.
मृत्यू
1994 ला त्यांचा मुंबईतल्या
राहत्या घरी मृत्यू झाला.
अशा ह्या मसाला चित्रपटांच्या प्रणेत्यास त्यांच्या 86 व्या जयंतीला माझा प्रणाम.एक
यशस्वी दिग्दर्शक म्हणून ते वर्षानुवर्ष आठवणीत रहातील,हयात शंका नाही.
प्रसाद नातू,पुणे.



mast
ReplyDeleteChan blog.
ReplyDeleteActress Nanda was supposed to marry film-maker Manmohan Desai, engagement took place in 1992, but before the wedding could take place, Manmohan died when he fell from a building.
Sudden loss of a talented life.....Charumati
ReplyDeleteविनम्र श्रद्धांजलि🙏
ReplyDelete