Blog No. 2023/46
Date: 23rd,
February 2023.
मित्रांनो,
कधीकधी काही गाणी आपल्याला खूप काही सांगून जातात आणि कधी तरं असं वाटतं की
हे गाणं आपल्यासाठीच लिहिले असावे.मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा असचं एक गाणं ऐकल
आणि लक्षात ठेऊनच मी जीवनाची पुढील वाटचाल केली.असे म्हटले तर गैर होणार नाही.त्यावेळेस
आलेल्या "तपस्या" या चित्रपटात राखी गुलजार आणि परीक्षित सहानी हे दोघे
दिग्गज कलाकार होते.या चित्रपटातलं "जो राह चुनी तूने उसी राह पे राही चलते
जाना रे"
हे गाणं स्व.किशोरकुमार यांनी केवळ छान आणि सुंदरच म्हटलेलं नाही तर अतिशय
भावस्पर्शी म्हटलेलं आहे. गाण्यात एक छानसा अर्थ आहे,अगदी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.असे म्हटले तरी चालेल.मला हे गाणं नेहमीच भावतं.
!! मुखडा !!
जो राह चुनी तुने उसी राह पे राही चलते जाना रे
वो कितनी भी लंबी रात दिया बन जलते जाना रे
ह्याचा अर्थ असा की
तू जी वाट निवडली आहेस, त्या वाटेने चालत रहा.तुला वाटेने न
जाण्यासाठी कुणी कितीही हत्सोहित केले तरी तू आपल्या निश्चयापासून ढळू नकोस.ती रात्र किती ही मोठी असो तरी दिवा बनून तेवत रहा.म्हणजेच
दु:खाचा काळ कितीही मोठा असला तरी त्या दु;खरुपी अंधारात स्वयंप्रकाशाने पुढे चालत रहा.
पुढे कवि म्हणतो,
!!अंतरा !!
कभी पेड का साया, पेड के काम न आया,
सेवा मे सभी की उसने जनम बिताया,
कोई कितने भी फल तोडे, उसे तो भाई फलते जाना रे.
ह्याचा अर्थ असा की,
झाडाची सावली झाडाच्या
कधीच कामांत येत नाही. किती खरंय हे की, झाडाची सावली त्याच्या कधीच कामात येत नाही, ऊन्हात ते झाड इतरांना मात्र सावली देत असतं.त्या सावलीचा
त्या झाडाला कधीच फायदा घेता येत नाही. त्या झाडाचा जन्म इतरांची सेवा करण्यात
जातो. कोणी त्याच्यावर लागलेली सर्व फळे तोडली
तरी ते आपला फुलण्याचा,फलण्याचा धर्म कधीच सोडत नाही.तू इतरांना आधार
दे पण तुला कोणाचाही आधार मिळेल ह्याची अपेक्षा न ठेवता हे कार्य कर.तुझ्याकडून
सर्व काही घेण्याचा इतर जण प्रयत्न करतील पण तू आपल्या देण्याचा धर्म कधी सोडू
नकोस.
पुढे कवि म्हणतो,
!!अंतरा !!
तेरी अपनी कहानी ये दर्पन बोल रहा है,
भीगी आंख का पानी हकीकत खोल रहा है,
जिस
रंगमे ढादे वक्त मुसाफिर चलते जाना रे.
ह्याचा अर्थ असा की
तुझे जे वास्तव आहे ते कधीच तू लपवू शकणार नाहीस.कारण
ते तुझा चेहरा सांगतोय.तुझ्या डोळ्यातील पाणी सारेच काही सांगून जाते. जे समोर
येईल ते जसेच्या तसे तुला स्विकारायचं आहे आणि चालत रहायचं आहे.
फिल्मी गाणी लिहिणाऱ्या कवींना
कवी न म्हणता गीतकार का म्हणायचे हे मला अजूनही कळलेलं नाही. आधीच्या काळात गीतकार
म्हणजे कवी पेक्षा थोडासा हलक्या दर्जाचा असा समजला जायचा. का कुणास ठाऊक? या गीताचे गीतकार एम.जी.हशमत हे किती सुंदर सांगून गेले आहेत या गीतात.मार्ग दाखविणारे पथदर्शक असे ही गाणे आहे.कधी कधी कठीण प्रसंगात आपली मती
कुंठित होते.आता नेमकं काय करायचं ही हे सुचतं नाही तेव्हा ही गाणी मार्ग
दाखवितात.अंधारातून प्रकाशाकडे नेतात.विचार करायला लावतात आणि नेहमीच आपल्या सोबत
असतात.माझ्या जीवनाशी या अशाच सुंदर गीतांची नाळ केव्हा
जोडली गेली मला कळलचं नाही.अन मग जीवनाची वाटचाल केवळ प्रवाही झाली नाही तर सुकर झाली,सोपी झाली.गाण्यांचे माझ्या जीवनात मोठे योगदान आहे.
प्रसाद नातु,पुणे

फारच सुंदर गाणे आणि समर्पक रसग्रहण.
ReplyDeleteमीनल ओगले.
ReplyDeleteArthapoorna ani motivating gana
ReplyDelete