Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

तुम बेसहारा हो तो


Blog No. 2023/38    

Date: 14th, February 2023.


मित्रांनो,

आनंद बक्षी ह्यांनी जीवनात 4000 च्या वर गाणी लिहिली.ह्यातील बऱ्याचशा गाण्यांना ऐकून अनेकांचे  life बदलले असेल.म्हणजे ज्या गायकांनी गायली,ज्या चित्रपटात होती त्या निर्माते-दिग्दर्शकांचे,त्यातील नायकांचे, संगीतकारांचे.कारण बरेचसे चित्रपट हे केवळ गाण्यांवर हिट झाले,बरेचसे चित्रपट कहाणी चांगली,स्टारकास्ट चांगली,अगदी दिग्दर्शक चांगले असूनही चित्रपटातील गाणी चांगली नसल्यामुळे पडल्याची अनेक उदाहरणे देता येतील.

            हे झाले ते गाणे ज्या चित्रपटात होते,त्या चित्रपटाशी संबंधित लोकांच्या बाबतीत.पण अनेक लोकांना गाण्यांनी घडविले आणि त्यातील मी एक.जीवनाच्या खडतर प्रवासात एक गाणं माझ्या मदतीला आलं.अनुरोध हा राजेश खन्नाचा चित्रपट.राजेश खन्नाची कारकिर्द जवळपास उतरणीला लागलेली.1973 च्या जंजीर नंतर अमिताभ बच्चनचा उदय झाला.1975 च्या शोले नंतर अमिताभचे स्टारडम सुरु झाले.अन फेब्रुवरी 1977 ला अनुरोध हा चित्रपट आला.अन तो मुख्यतः गाण्यामुळे चालला.किशोर कुमारच्या “आपके अनुरोध पे मै ये गीत सुनाता हूं” “आते जाते खूबसूरत आवारा सडकोपे” “मेरे दिल ने तडप के जब नाम तेरा पुकारा” ह्या गाण्याच्या मानाने मन्ना डे यांनी गायलेले आणि अशोककुमारवर चित्री केलेले “तुम बेसहारा हो तो किसी का सहारा बनो” हे गीत मागे पडले. अशोककुमारचा ह्या गाण्यातील सुरेख अभिनय ह्यामुळे देखिल हे गाणे आवडले. त्या सोबत हे अर्थपूर्ण गाणं गाणं आहे म्हणून देखिल मला खूप आवडलं,भावले.किती सुंदर अर्थ आहे ह्या गाण्याचा. बघा ना.                                        

 !! मुखड़ा !!

तुम बेसहारा हो तो किसी का सहारा बनो

तुमको अपने आप ही सहारा मिल जाएगा

कश्ती कोई डूबती पहुचा दो किनारे पे

तुमको अपनेआप ही किनारा मिल जाएगा  !! मुखड़ा !!

ह्या गाण्यात कवि म्हणतो,”तुम्ही स्वत: “बेसहारा आहात,तुम्हाला कुणाचा आधार नाही.तर तुम्ही दुसऱ्याला आधार द्या.आपोआप तुम्हाला त्याचा आधार मिळेल.एखाद्या डुबणाऱ्या नावेला किनाऱ्या पर्यन्त पोहोचवा.अन   तुम्हाला आपोआप किनारा सापडेल.किती सुंदर.

 !! अंतरा 1 !!

हंस कर जिंदा रहना पड़ता है,अपना दु:ख खुद सहना पड़ता है

रस्ता चाहे कितना लंबा हो,दरिया को तो बहना पड़ता है

तुम हो एक अकेले तो रुक मत जाओ चलो निकलो

रस्ते मे कोई साथी तुम्हारा मिल जाएगा

कवि पुढे म्हणतो की जीवनातील दु:ख आपल्यालाच सहन करायचे हे आपल्याला माहित असतं.मग जीवन हसत हसत जगा.दु:खाचा बाऊ करु नका,दु:ख कुरवाळत बसू नका.नदीला किती दूर वहात जायचे,ह्याची तिला कल्पना नसते.पण तरी ती तिचे वहात राणे थांबवत नाही, वहात जाते.तसे तुम्ही रस्त्यात म्हणजे जीवनाच्या प्रवासात कुठे थांबू नका.चालत रहा कारण एक दिवस, रस्त्यात तुम्हाला तुमचा साथीदार नक्कीच मिळेल.        

 !! अंतरा 2!!    

जीवन तो एक जैसा होता है,कोई हँसता कोई रोता है

सब्र से जीना आसां होता है,फिक्र से जीना मुश्किल होता है

थोड़े फूल है काँटे है जो तकदीर ने बाँटे है

हम को ईन मे से हिस्सा हमारा मिल जाएगा

कवी पुढे म्हणतो जीवन तर सगळ्यांचे एक सारखेच असते.कुणी ते हसत हसत जगतो,तर कुणी कुणी रडत रडत.काळजी करत जगणं खरं तर कठीण जातं.तेच जरा संयम बाळगला आणि विश्वास बाळगला,की एक दिवस माझाही येईल.तर तेच जीवन सोप होतं.नशिबाने आपल्या रस्त्यात थोडे फूलं तर थोडे काटे पेरून ठेवलेत.त्यातील जे काही नशिबात आहे ते आपल्या वाट्याला येईलच.

 थोडक्यात

खरं पाहयला गेले तर ह्यात मानसशास्त्र आहे,थोडे अध्यात्म आहे.पण मला वाटतं की एकंदरीत ह्या गाण्यात सुखी जीवनाचं सार सामावलं आहे.म्हणून हे गाणं मला फार आवडतं. मन्नादांनी सुद्धा ते अप्रतिम गायले आहे. आपल्याला गाता गाता भरून येतं.ह्याची चाल संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी देखिल सुमधुर बांधली आहे. तुम्ही देखिल ऐका आणि आनंद घ्या ह्या आनंद बक्षी यांच्या गाण्याचा. 




अनुरोध ह्या चित्रपटात राजेश खन्नासोबत विनोद मेहराची खूप हृदयस्पर्शी भूमिका होती,ह्या चित्रपटात तो कवि झाला होता आणि हे गाणे चित्रपटात विनोद मेहराने लिहिलेले असते. परवाच त्याचा जन्मदिवस होता. त्या दिवशी त्याच्या बद्दल लिहितांना मला हे गाणे आठवले.                                                 

 

प्रसाद नातु,पुणे 

https://youtu.be/hEB42UzSFIg

                                       

Comments

  1. कई बार यह गाना सुना
    आज इस गाने को पुनः अर्थपूर्ण तरीके से पढ़ना बहुत ही अच्छा लगा -धन्यवाद

    ReplyDelete
  2. छान लिहिलाय सर

    ReplyDelete
  3. 1990 kivha mid 90s paryantachi arthapoorna ani samarnat rahnari gani ani tyanantarchi gani madhe Hach farak ahe. Tum besahara ho to hey gana me vividh bharti var baryach da aikla ahe. Mala vatta this song lacked the populist tag. Of course vividh Bharati ne kadhi ha bhedbhav kela nahi. Mast blog tumhi Artha sangitlyamule ankin arthapoorna jala

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...