Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

भंडाऱ्यातील ‘भ्रुशुंड गणेश’

Blog No.2023/003

Date:- 7th, January,2023. 



नमस्कार मित्रांनो,

          माझ्या विदर्भाच्या फेरफटक्याची एक सकारात्मक बाजू म्हणजे,एखाद दुसऱ्या रस्त्याचा अपवाद वगळता, ड्रायविंग सुखावह करणारे आणि वाटणारे रस्ते. पुण्याच्या आसपास देखिल जायचे म्हणजे ‘मेजर पार्ट’ हा प्रवासात जातो.विरंगुळा म्हणून बाहेर पडावे तर आपल्या विरंगुळयाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी,अक्षरक्ष: संघर्ष करावा लागतो.तिथे पोहोचलो की आराम करण्यात वेळ जातो आणि परत येतांना तेच.म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून जरा सुटका व्हावी,म्हणून पिकनिकला जायचं, पण तसं होतांना दिसत नाही.विदर्भात तसे नाही.काही वेळेस रस्त्यावर माझी एकट्याची कार धावत असल्याचा अनुभव आला,ड्रायविंग करतांना मजा आली.

 माझा पुढचा टप्पा भंडारा     

माझा पुढचा टप्पा होता भंडारा.भंडारा शहर गोंदियाला जातांना येतांना बरेचदा बघितलेले.जाऊन राहयलो नव्हतो.वैनगंगा विदर्भातील एक प्रमुख नदी भंडाऱ्याजवळून जाते.या व्यतिरिक्त विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक गणेश येथे आहे,हे ऐकून माहित होते.त्याचे नावं काय वगैरे ह्याची ह्याची माहिती नव्हती.ह्या वेळेस दर्शन घ्यायचेच हे ठरविले होते.

भ्रुशुंड गणेश आणि त्या बद्दल बरेच काही

ठरविल्याप्रमाणे भंडाऱ्यातील ‘मेंढा’ भागात असणाऱ्या ‘भ्रुशुंड गणेशाच्या’ दर्शनास जाऊन पोहोचलो. मुळ स्वरुपातील ‘हेमाडपंथी’ बांधकामातील हे मंदिर दगडी बांधकामाचे होते.त्या समोर ओटा आणि गणेशाच्या मूर्तीसमोर ‘शिवलिंग आणि मूर्ती’ असे. पण जीर्णोद्धारानंतर मंदिराचा विस्तार करून ‘शिवलिंग आणि मूर्ती’ मंदिरातच इतरत्र  स्थापित करण्यात आल्या. ‘भ्रुमध्यात शुंड: इति भ्रुशुंड’ असे गणेश पुराणात नामकरण केल्याप्रमाणे ‘स्वरूप समाधीत’ असलेली ही एकमेव गणेश मूर्ती रक्ताश्म शिळेवर कोरलेली आहे. गाभार्यात तळापासून 8 फुट उंच आणि 4 फुट रुंद अशी गणेशाची मूर्ती चतुर्भुज आणि मुशकारुढ आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे.मुख्य म्हणजे ह्या गणेश मूर्तीला दाढी आणि मिश्या आहेत.गणेश पुराण आणि मुदगल पुराणातील काही खुणा,शिल्पे आणि पुरावा ह्या मंदिरात आढळून येतो. मंदिराच्या बाहेर चौथाऱ्यावर एक हनुमानाची मूर्ती आहे.उग्र रुपातील डोक्यावर छत नसलेला हा हनुमान किंवा मारुती नवसाला पावतो अशी धारणा आहे.  

लिळाचरित्रातील संदर्भानुसार ई.स. 1130 मधे ‘निळंभट भंडारेकर’ ह्या ग्रामजोशींच्या उपस्थितीत ह्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली.तेव्हापासून जोशी कुटुंबाकडे पूजेची वंशपरंपरागत परंपरा चालत आलेली आहे. कै. विश्वासराव जोशी ह्यांच्या अथक परिश्रमातून ह्या मंदिरास प्रसिद्धी प्राप्त झाली. येथे पौष वद्य सप्तमी पासून ते माघ शुक्ल पंचमी पर्यन्त (वसंत पंचमी) सार्वजनिक गणेशोत्सवास साजरा केला जातो. सामाजिक एकात्मतेचे उत्तम उदाहरण म्हणून हा सार्वजनिक गणेशोत्सव ओळखला जातो. असा हा एक अष्टगणेश आहे.

 विदर्भातील अष्टगणेश किंवा अष्टविनायक:-

पश्चिम महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणे विदर्भात अष्टगणेश किंवा अष्टविनायक आहेत.नागपूर, भंडारा, वर्धा,यवतमाळ आणि चंद्रपूर अशा पाच जिल्ह्यात ही मंदिरे स्थापित आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणे हया गणपतीचे विशिष्ट क्रमाने दर्शन करायला हवे कां,ह्या संबंधी विचारणा केली. पण तत्संबंधी विशेष माहिती मिळाली नाही.हे अष्टगणेश किंवा अष्टविनायक पुढीलप्रमाणे :-

1.       टेकडी गणपती, नागपूर .

2.       शमी विघ्नेश, आदासा, जिल्हा नागपूर.

3.       अष्टदशभुज, रामटेक, जिल्हा नागपूर.

4.       भ्रुशुंड गणेश, मेंढा, भंडारा.

5.       सर्वतोभद्र गणेश, पवनी, जिल्हा भंडारा.

6.       सिद्धीविनायक, केळझर,जिल्हा वर्धा.

7.       चिंतामणी, कळंब, जिल्हा यवतमाळ आणि

8.       वरदविनायक, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर.

आपण भ्रुशुंड गणेश, मेंढा येथे जाऊन दर्शन घ्यावे. गणेशाचं वेगळचं रूप अनुभवाल हे निश्चित.

 

                                                                                                    प्रसाद नातु, पुणे.                                  





Comments

  1. छान माहितीपूर्ण पोस्ट.

    ReplyDelete
  2. Pratyakshat tithing safar ghadvun anlyabaddal khup khup dhanyavaad

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...