Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

बासरचे ज्ञान सरस्वती मंदिर

Blog No. 2023/14

Dated 18th, January 2023 



        मित्रांनो,

      मध्यंतरी मी एक ब्लॉग मध्यप्रदेशातील मुलताई संदर्भात पोस्ट केला होता. आपल्या आसपासच्या प्रदेशात काही वेगळ्या प्रथा आणि काही वेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात.असाच एक वेगळा अनुभव मी 2002 ला राजुरा येथे असतांना घेतला होता. बँकेच्या एका तेलगू ग्राहकाने विचारले की सर तुम्ही आंध्र प्रदेशातील ‘बासर’ बघितले आहे कां? अगदी प्रामाणिकपणे सांगतो, या नावाचे कुठे गांव आहे, हे मला माहित नव्हते.मी म्हटलं नाही,नाही बघितले.तेव्हा तो म्हणाला एकदा जाऊन या सर.

        बासरसाठी प्रस्थान    

राजुरा हे आंध्र प्रदेशाला लागून असल्याने तेलगू लोकही बरेच होते.त्यातूनच कळले कि इथून 250 कि मी वर गोदावरी नदीच्या काठी बासर नावाचे ठिकाण आहे.तिथे ज्ञान सरस्वतीचे मंदिर आहे.अशा प्रकारचे देशातील हे एकमेव देवस्थान.तिकडे एक प्रथा होती.लहान मुलांचा शिक्षणाचा श्री गणेशा बासरला येऊन करतात.तिथे येऊन श्री गणेशा केला कि मुलं अभ्यासात चांगली होतात,अशी त्यांची धारणा.माझ्या मुलांचा शिक्षणाचा श्री गणेशा आधीच झालेला होता.पण सरस्वतीचे मंदिर आहे.दर्शन घेता येईल.नवीन काही तरी अनुभवायला मिळेल,असा विचार करून,एका रविवारी आम्ही बासरला जायचं ठरविल.250 कि मी म्हणजे 5-5.30 तास लागणार आणि परतायचं त्याच दिवशी. म्हणून सकाळी 5.30 ला निघालो. मुलांना पर्यटनाची आवड अगदी माझ्या सारखीच किंवा माझ्या इतकीच आणि बसने जाण्यापेक्षा स्वतःच्या गाडीने जायचे हा माझा आग्रह आणि मुलेही तेच पसंत करतं. 

राजुरा ते आदिलाबादच्या हायवे पर्यंतचा रस्ता फारच खराब होता.त्यानंतर मात्र नॅशनल हायवे नं 7.तो रस्ता जरा बरा होता.आम्ही राजुऱ्याहून निघालो.एक तासातच महाराष्ट्र राज्य सीमा आली.तशी खडतर प्रवासाला सुरूवात झाली. कोरपना हे महाराष्ट्रातील शेवटचे गांव संपल्यावर जंगल सुरू  होत.तेव्हाची आंध्र प्रदेश आणि आताच्या तेलंगणाची सीमा लागल्यावर तेलगू भाषेतील पाट्या सुरू होतात.मग हायवे येईपर्यत कुठलं गाव आहे.हे कळायला थोड अवघडच असायचं. एकदा हायवे लागला की हायसं वाटायचं.आम्ही तेव्हा गमतीने म्हणत असू की रात्री जर प्रवास  केला त्या रोडने,तर केव्हा आंध्र लागला हे झोपेत सुध्दा कळेल.आम्ही  हायवेला लागलो.राष्ट्रीय महामार्ग नं.7 म्हणजे जम्मू ते कन्याकुमारी असा हायवे असल्याने ट्रॅफिक खुप होता.आधी आदिलाबाल लागलं.आदिलाबाद जिनिंग मिल्स साठी प्रसिध्द.महाराष्ट्रात कापूस एकाधिकार योजना कार्यरत असतांना तिथे नेहमीच कापसाला अधिक भाव मिळायचा म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी गुपचुप जाऊन कापूस विकायचे.गुपचुप यासाठी म्हटलं की राज्याबाहेर कापूस विकायला सक्त मनाई होती.आम्ही आदिलाबाद क्रॉस करून बाहेर पडलो.

आदिलाबाद ते निर्मल प्रवास 

            यापुढचं मोठ गांव म्हणजे निर्मल.निर्मल च्या आधी एक घाट लागायचा.डिसेंबर असल्याने सर्व दूर निसर्ग जणू हिरवी शाल ओढून होता.मी ड्राईव करित असल्याने इतरांपेक्षा निसर्गाचे रूप खुप आरामात पहाता येत नसले, तरी मारूती ओमनी मध्ये इतर कारपेक्षा अधिक निसर्ग अनुभवता येतो.थोड्यात वेळांत घाट आला.याला मेहबूब घाटीम्हणत.मेहबूब म्हणजे प्रेमी. हा घाट अनुभवणे हे निसर्ग प्रेमीसाठी वरदानचं.घाटाचा आकार नेकलेस सारखा. पौर्णिमेच्या रात्रीला पहाण्यासारखे असते दृष्य असे लोक सांगत.वळणे अशी की अंगाचा थरकाप उडेल.पूर्ण घाटात सागवानाची झाडं होती.रान फुलं खुप छान दिसत होती.सतत वरवर चढत जाऊन मग एकदम उतरण होती. उतरणीवर उजव्या हाताला हिरवीगार दरी आणि त्यात निळेक्षार नदीचे पाणी होते.हे ईतके सुंदर दिसत होते की,असं वाटून गेले की एखादा छानसा कॅमेरा असता,तर त्या द्दृष्याचेच विविध फोटो काढले असते.उतरण संपल्यावर नदीवरचा पूल लागला.थोड्याच वेळांत निर्मल नावाचं गांव लागलं.गांव बऱ्यापैकी मोठं होत.एक चांगलस हॉटेल पाहून नाश्ता केला.आता हायवे वरील भैसा गांवातून डाव्या हाताला वळायचं होत,बासरसाठी.अजून जवळपास एक तासाचं अंतर कापायचं होत.

 बासरविषयी थोडे काही  

अखेर 11.30 च्या सुमारास आम्ही बासरला पोहोचलो.मंदिर खुप प्रशस्त आहे.साधारणतः दक्षिणेतील मंदिरासारखा कळस. बरीच गर्दी होती.सरस्वतीच्या शेजारीच लक्ष्मीची मुर्ती आहे.इथल्या मंदिरास ज्ञान सरस्वती मंदिर म्हटले जाते.इथे खुप भाविक गण,त्यांच्या मुलांचे प्राथमिक शिक्षण सुरू होण्याचे आधी,त्यांचा "अक्षर अ

भ्यासम" हा सोहळा साजरा करण्यासाठी येतात.इथे ते आधी पुरोहितांच्या मंत्रोचारात अक्षर गिरवायला शिकतात. त्यानंतर नोट बुक,पुस्तक आणि पेन सरस्वती देवीच्या चरणी अर्पण करतात.सरस्वतीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या आतल्या मंडपात आलो.तिथे अविरत मंत्रोचारण चालू होतं.खुप लहान मुलं त्यांच्या पालका सोबत अक्षर गिरवित बसले असल्याचे दिसले.आम्ही थोड्या वेळ थांबून ते सर्व बघत होतो.खरं तर या पूर्वी कधी असं कुठे पाहिलं नव्हतं.छान वाटलं.श्रध्दा बलवान असते.एक आगळे वेगळे काही अनुभवायला मिळाले.मंदिराच्या दक्षिणेकडे आलो.तर गोदावरीचे  पात्र आणि त्यावरील लांबलचक पूलावरून पात्राच्या विस्तिर्णतेची कल्पना येत होती.नदी किनाऱ्यावर विविध सामानाची दुकाने होती.वेगवेगळ्या खाद्य पदार्थाच्या गाड्याही होत्या.तिथे बरेच फोटो काढलेत.मंदिराच्या बाहेर खुप छान बाग आणि जेवणासाठी विशेष जागा होती.तिथे जेवण करून बाहेरुनच सरस्वतीचे दर्शन घेऊन परत यायला निघालो.यावेळेस गाठीशी एक आगळा वेगळा अनुभव घेऊन.राजुरा सुटलं अन नंतर कधी बासरला जाणे झाले नाही.प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते हेच खरं.   

                                                                                                                                                                                                                        प्रसाद नातु,पुणे.           


Comments

  1. बासर च्या आठवणी ताज्या झाल्या.

    ReplyDelete
    Replies
    1. Akshar Abhyasam sohala majya mate pratek Jan lakshat thesis. Suruvat ashi sundar jali tar pudhe chanach hoyil

      Delete
    2. खूप मस्त सर! त्या भागात कधी जण झालं तर जायला हवे एकदा

      Delete
  2. छान माहिती 🙏

    ReplyDelete
  3. It is a very lively place...could you see the monkeys?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...