Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

व्यक्त होणे खरोखर इतके कठीण आहे कां?

 

मित्रांनो,

कालचे माझे ब्लॉग पेज “इस्त्रीचे कपडे की चेहरा?" ला आपण उदंड प्रतिसाद दिलात. या बद्दल खरं तर आपल्या सगळ्यांचे मला आभार मानायचे होते. म्हणून आजचे हे ब्लॉग पेज लिहितोय. त्याच सोबत आणखी एक कारण घडलं. त्या विषयी लिहावे वाटले. आज बऱ्याच दिवसांनी माझी बँक, बँक ऑफ इंडियाला गेलो होतो. माझ्या सोबत ज्यांनी कामं केलं, असे फार कमी स्टाफ सदस्य तिथे आहेत. काहींचे प्रमोशन तर काहींची ट्रान्सफर यामुळे बदलून गेलेत. माझा नुकताच साहित्यातील योगदानाबद्दल कॉसमॉस बँक आणि ग्रीन वर्ड पब्लिकेशन तर्फे सन्मान करण्यात आला. त्याबद्दल माझे सर्वांनी अभिनंदन केले.सर्वांना नाही येतं लिहिता, ही एक कला आहे,असेही काही जणांचे मत पडले. पण कसे लिहावे या बद्दल तुम्ही काही टिप्स आम्हाला देऊ शकाल कां? अशी विचारणा ही केली. मला खूप आनंद झाला की, माझ्या सहकाऱ्यांमध्ये कमीतकमी लिहिण्याची इच्छा झाली.

मी त्यांना सांगितले की, यासाठी तुम्ही काही वाचायला हवे. पुस्तकं घेऊन वाचायला हवीत. हे सांगतांना मी त्यांना हे देखिल सांगितले, कि ठिक आहे. वेळ मिळतं नाही हे खरे आहे. पण आपली बँक विविध सर्क्युलर, वेगवेगळ्या पॉलिसी जारी करीत असते. हे सर्व जर वाचलेत तर त्यातून दोन उद्देश सफल होतील. पहिला हा, की तुम्ही काही तरी वाचाल, त्याने वाचायची सवय होईल. दुसरा हा की विविध सर्क्युलर, वेगवेगळ्या पॉलिसी वाचल्याने, तुमचे बँकेतील कार्यासंबंधीचे ज्ञान वाढेल. ज्याचा तुम्हाला दैनंदिन कामकाजात उपयोग होईल. हे वाचून झाल्यावर त्या संबंधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, उदाहरणार्थ लंचच्या वेळेत सोबत असता, 30 मिनिटातले 10 मिनिटे,त्यावर चर्चा करा. हयातून व्यक्त होणे शिकता येईल. एकदा व्यक्त होता आलं की मग लिहिता येईल.ते त्यांना पटलं.

      दुसरे एक मला वाटतं, जे फेसबूकवर आहेत. त्यांना देखिल खूप वाचायला मिळतं असतं.कुणी आपले वेगवेगळे जीवनविषयक अनुभव पोस्ट करतो. कुणी आपल्या पर्यटनाची माहिती पोस्ट करतो. कुणी काही तरं कुणी काही. अशा चांगल्या पोस्टवर 90% लोक लाइक टाकून मोकळे होतात. हे लाइक तर इतके विचित्र आहे की कुणाचे कुणी मेले आहे तर आम्हाला “भावपूर्ण श्रद्धांजली” लिहायला वेळ नसतो. आपण Like करून मोकळे होतो. कुणाचे मरण Like करण्याइतके आपण संवेदनाहीन झालोत कां?     

      चांगली पोस्ट वाचली की त्या पोस्टवर आपल्या मनातले चार शब्द लिहिलेत, व्यक्त झालात तर खूप फरक पडेल. माणूस आपल्याला काही शारीरिक त्रास किंवा मानसिक त्रास होतोय, नोकरीच्या जागी घुटन होते आहे, चांगले कामं करून appreciation नाही. ह्या गोष्टी अगदी आपल्याला संसारातील जोडीदाराला सांगत नाही. या पायी मानसिक रोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. मन ठिक असेल, तर शारीरिक व्याधीवर मात करता येईल. पण मनच ठिक नसेल तर? माझे एक झोनल मॅनेजर होते. श्री.एस. एल. करंदीकर. एक वेगळच व्यक्तिमत्व.ते म्हणायचे तुम्हाला डायबेटीस आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे. तुमच्या बाजूला बसलेल्या स्टाफला माहित असायला हवे. शारीरिक आजार आहे त्याचा स्वीकार करा,त्याचा कमीपणा बाळगू नका. उद्या अकस्मात तुम्हाला बँकेत असतांना काही झालं, तर घरचे लोक येईपर्यंत, डॉक्टरकडे ॲडमिट केल्यावर, तुमच्या सहकाऱ्यास सांगता यायला हवे, की तुम्हाला काही व्याधी आहेत का? जेणेकरून डॉक्टरांना तुमच्या उपचाराची दिशा ठरविता येईल.

इंटरनेटमुळे जग भलेही जवळ आले असेल,पण माणसं दुरावलीत. हे फारसे चांगले लक्षण नाही. माणसांमधला संवाद संपत चालला आहे. संवाद संपल्यामुळेच व्यक्त होता येण अशक्य झाले आहे. ज्या मानसिक रोगांची आपल्याला माहिती नव्हती, ते मानसिक रोग होऊ लागलेत “मन चंगा तो सब कुछ चंगा” हे लोप पावत चाललयं. मित्रांनो खरंच विचार करायला हवा आहे आणि तेही परिवारातील सर्वांनी एकत्रित बसून.

आपल्या प्रतिक्रिया कृपया कमेंट बॉक्स मधे लिहा किंवा माझा मेल आयडी  pknatoo25360@gmail.com आहे. त्यावर निश्चित कळवा.

 

प्रसाद नातुपुणे.

88888 18589 

Comments

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...