ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
ब्लॉग नं. 2025/297. दिनांकः 22 ऑक्टोबर , 2025. मित्रांनो , बलिप्रतिपदा : दैत्यराज बलीच्या पुनरागमनाचा दिव्य उत्सव 🪔 दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे , आणि या दिवाळीतील चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा.महाराष्ट्रात विशेष श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवसाला बली पद्मिनी , पाडवा , वीरप्रतिपदा किंवा द्युतप्रतिपदा अशी विविध नावे आहेत. हा दिवस केवळ धार्मिकच नाही , तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे.आजचा ब्लॉग याच विषयावर आहे. 🌞 बलिप्रतिपदा म्हणजे काय ? हिंदू पंचांगानुसार , कार्तिक महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच,अमावास्येनंतरच्या पहिल्या दिवशी बलिप्रतिपदा साजरी केली जाते. दिवाळीच्या या चौथ्या दिवशी दैत्यराज महाबली याचा पृथ्वीवर पुनरागमन होत असल्याचा पौराणिक समज आहे. गुजरात , राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही भागांत या दिवसाला नववर्षाचा प्रारंभ मानतात. विक्रम संवत् नववर्षाची सुरुवात या तिथीपासूनच होते. हा दिवस हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मानला जातो,याचा अर्थ म्हणजे कोणतेही शुभकार्य या दिवशी निर्बंधाविना करता य...