ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025. मित्रांनो, डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...
ब्लॉग नं. 2025/297. दिनांकः 22 ऑक्टोबर , 2025. मित्रांनो , बलिप्रतिपदा : दैत्यराज बलीच्या पुनरागमनाचा दिव्य उत्सव 🪔 दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे , आणि या दिवाळीतील चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा.महाराष्ट्रात विशेष श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवसाला बली पद्मिनी , पाडवा , वीरप्रतिपदा किंवा द्युतप्रतिपदा अशी विविध नावे आहेत. हा दिवस केवळ धार्मिकच नाही , तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे.आजचा ब्लॉग याच विषयावर आहे. 🌞 बलिप्रतिपदा म्हणजे काय ? हिंदू पंचांगानुसार , कार्तिक महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच,अमावास्येनंतरच्या पहिल्या दिवशी बलिप्रतिपदा साजरी केली जाते. दिवाळीच्या या चौथ्या दिवशी दैत्यराज महाबली याचा पृथ्वीवर पुनरागमन होत असल्याचा पौराणिक समज आहे. गुजरात , राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही भागांत या दिवसाला नववर्षाचा प्रारंभ मानतात. विक्रम संवत् नववर्षाची सुरुवात या तिथीपासूनच होते. हा दिवस हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मानला जातो,याचा अर्थ म्हणजे कोणतेही शुभकार्य या दिवशी निर्बंधाविना करता य...