Skip to main content

Posts

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

धरतीवरचे त्रिदेव- निंबोणी, पिंपळ आणि वड

ब्लॉग नं.2025/234 . दिनांक: 24  ऑगस्ट, 2025. मित्रांनो, तुम्हाला कदाचित हे विचित्र वाटेल , खरं वाटणार नाही,पण हे सत्य आहे…मागील 68 वर्षांपासून पिंपळ , वड आणि नीम यांची लागवड सरकारी पातळीवर बंद करण्यात आली आहे. 😢 तसं पाह्यला गेलं तर पिंपळ, निंबोणी आणि वड किंवा वटवृक्ष हे तिन्ही अतिशय पर्यावरण पूरक असे वृक्ष आहेत .पण त्याकडे लक्ष देत कोण? आजचा माझा ब्लॉग आहे,याच विषयावर. सविस्तर: पिंपळ,वड आणि नीम किंवा निंबोणी या तिन्ही वृक्षांचे शास्त्रात एक वेगळे सांगितले आहे.आणि याला धार्मिक महत्व देण्यात आले.कारण धार्मिक कारण दिलं की लोकांना पटत असे, पण खरं कारण हे की हे वृक्ष  पर्यावरण संतुलन राखण्याचे,महत्वाचे कार्य करत असतात.कारण  पिंपळ हा कार्बन डाय ऑक्साईडचा  100 % शोषक वृक्ष आहे , वड हा कार्बन डाय ऑक्साईडचा  80 % शोषक वृक्ष आहे तर नीम  किंवा निंबोणी हा 75%. पण यांच्या ऐवजी लोकांनी परदेशी   युकॅलिप्टस   लावायला सुरुवात केली , जो जमिनेला जलविहीन करून टाकतो. 😠 आज सर्वत्र युकलिप्टस , गुलमोहर आणि इतर सजावटी झाडे दिसतात.आता जेव्हा वातावरणात शुद्धीकरण करणारी ...

रोज कमीतकमी 7000 स्टेप्स चाला

ब्लॉग नं.2025/234. दिनांक: 23  ऑगस्ट, 2025. मित्रांनो, 7,000 पावलं दररोज : आरोग्याचा खरा मंत्र " आरोग्य टिकवायचे असेल तर पावलं उचला" – हा मंत्र आज जवळजवळ सर्वत्र ऐकायला मिळतो. अनेक फिटनेस घड्याळे आणि मोबाईलमध्ये आपण दररोज 10 , 000 पावलं  चालण्याचे लक्ष्य पाहतो. पण खरेच इतकी पावलं  चालल्याशिवाय,आपले आरोग्य सुधारू शकत नाही का ? नुकत्याच द लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये,प्रकाशित झालेल्या एका महत्वाच्या संशोधनाने,या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. आणि या निष्कर्षाने अनेकांच्या डोळ्यात प्रकाश पडला आहे – कारण आरोग्य सुधारण्यासाठी 10 ,000 पावलांची गरज नाही , तर 7,000 पावलं  रोज पुरेशी आहेत! यावर आहे आजचा ब्लॉग.   सविस्तर: किती पावलं  चालणे आवश्यक ? संशोधकांनी 31 वेगवेगळ्या अभ्यासांचा डेटा तपासला आणि त्यामध्ये 1 ,60,000  हून अधिक लोकांचा समावेश होता. त्यांना आढळून आले की, जे लोक दररोज केवळ ४ , ००० पावलं  चालतात , त्यांचे आरोग्य फारच बैठ्या जीवनशैलीतील लोकांपेक्षा चांगले होते.दररोज 7 ,000 पावलांनंतर अनेक आरोग्य फायदे मिळतात आणि त्या पुढे फारसा फरक...

ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन व नियमन विधेयक 2025"

ब्लॉग नं: 2025/232. दिनांक: 22 ऑगस्ट ,2025. मित्रांनो , ऑनलाइन गेमिंगवरील नवा कायदा : "ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन व नियमन विधेयक 2025" भारतामध्ये ऑनलाइन गेमिंगबाबतचा दीर्घकाळचा कायदेशीर गोंधळ आता संपणार आहे. "ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन व नियमन विधेयक 2025" हे विधेयक 20 ऑगस्ट रोजी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर,ते 21 ऑगस्टला राज्यसभेत मांडले गेले आणि त्याला राज्यसभेने पास केले आहे.हे केंद्र सरकारचे ऑनलाइन गेमिंगसाठी एकसंध कायदा आणण्याचे,पहिले मोठे पाऊल मानले जात आहे.आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांनी स्वतःचे कायदे केले होते , परंतु त्यांची अंमलबजावणी एकसारखी नव्हती. आता केंद्र सरकारचे मत असे आहे की , डिजिटल प्लॅटफॉर्म "सीमारेषेविना" कार्यरत असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील नियम आवश्यक आहेत. आजचा ब्लॉग या विषयावर आहे. सविस्तर: " ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन व नियमन विधेयक 2025" हे विधेयक,20 ऑगस्ट रोजी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर,ते 21ऑगस्टला राज्यसभेत संमत केले गेले. विधेयकाची प्रस्तावना : दोन महत्त्वाचे मुद्दे 1. ऑनलाइन पैशांचे खेळ ( money games) यामुळे ...

वेदना कमी करण्याची स्मार्ट ट्रिक-कोल्ड पॅक की हिटींग पॅड?

ब्लॉग नं.2025/23 1 . दिनांक: 2 1 ऑगस्ट, 2025. मित्रांनो, वेदना आणि स्नायू ताण – उष्ण पॅड कधी वापरावे आणि थंड पॅक कधी ? आपल्या दैनंदिन जीवनात लहानसहान दुखापती , स्नायू ताण , मुरगळणे किंवा सूज येणे हे प्रकार होतच असतात. अशा वेळी पहिला प्रश्न डोक्यात येतो – हीटिंग पॅड लावायचे की थंड पॅक ? बर्‍याच वेळा आपण चुकीचा पर्याय निवडतो आणि त्याचा फायदा होण्याऐवजी त्रास वाढू शकतो. म्हणूनच योग्य वेळी योग्य उपचारपद्धती वापरणे महत्त्वाचे आहे.आजचा ब्लॉग आहे याच विषयावर की, हीटिंग पॅड लावायचे की थंड पॅक ? सविस्तर:    थंड पॅक ( Cold Pack) म्हणजे काय ? थंड पॅक म्हणजे बर्फाच्या तुकड्यांचा पिशवीत ठेवलेला पॅक किंवा बाजारात मिळणारे खास जेल पॅक. हे थेट त्वचेवर ठेवण्याऐवजी कापड गुंडाळून वापरावे. थंड पॅक कधी वापरावा ? 1 दुखापत झाल्यानंतर पहिल्या 24 ते 48 तासांत, 2 सूज आली असल्यास, 3 मोच ( Sprain), स्नायू मुरगळणे ( Strain) , 4 लिगामेंट ताण, 5 अचानक पडणे , धक्का बसणे किंवा निळसर डाग ( Bruises) , 6 गुडघा , टाच किंवा घोटा वळल्यास. 👉 थंड पॅक रक्तप्रवाह कमी करतो , सूज कमी करतो ...

राय आवळा एक उपयोगी फळ

ब्लॉग नं.2025/230. दिनांक: 20 ऑगस्ट, 2025.  मित्रांनो,             परवा म्हणजे 15 ऑगस्टला स्वतंत्रता दिवस होता,म्हणून त्याचे औचित्य साधत येथून अवघ्या 15-20 किमीवर असलेल्या तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे,तिथे दर्शन घ्यायला गेलो होतो.हे ठिकाण इंद्रायणी नदी आणि भाम आणि भीमा यांच्या संयुक्त प्रहावाच्या संगमावर वसलेले आहे.त्या दिवशी खूपच गर्दी होती.चपला, जोडे आवाराच्या बाहेर काढायला लागतात.एक दाणे वगैरे विकणारी विक्रेती होती. तिच्या दुकानावर त्या निमित्ताने काही घ्यावे म्हणून बघितले, तर राय आवळा विकायला होता. त्या मावशीने लगेच  त्याचे आरोग्य फायदे सांगायला सुरुवात केली,कोल्हापूरला राय आवळा मिळत असल्याने,त्याचे फायदे माहित होते. पण तिने आरोग्य फायदे सांगितल्याने हा ब्लॉग लिहायला सुचले.                            सविस्तर:        ...

मधुमेह नियंत्रणासाठी 3 सोपे पण प्रभावी आहार घटक

  ब्लॉग सं. 2025/229. दिनांक: 19 ऑगस्ट, 2025.       मित्रांनो, मधुमेह नियंत्रणासाठी 3 सोपे पण प्रभावी आहार घटक मधुमेह हा आजच्या काळातील एक महत्त्वाचा जीवनशैलीचा आजार आहे. तो शरीराच्या जवळजवळ सर्व भागांवर परिणाम करतो.दीर्घकाळ रक्तातील साखरेची पातळी जास्त राहिल्यास,मूत्रपिंड , हृदय आणि मेंदू यांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.पण याबाबत घाबरण्याची गरज नाही, कारण हा आजार पूर्णपणे उलट ( Reverse) करणे कठीण असले तरी , योग्य आहार , औषधे आणि जीवनशैलीच्या मदतीने तो प्रभावीपणे व्यवस्थापित करता येतो.मधुमेह नियंत्रणासाठी 3 सोपे पण प्रभावी आहार घटक,तुम्ही जवळ बाळगलेत,तर त्याचा कसा उपयोग होतो,ते आपण आजच्या ब्लॉगमध्ये पहाणार आहोत.   सविस्तर: मधुमेह कसा होतो ? जेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन,योग्य प्रमाणात होत नाही किंवा शरीर त्याचा योग्य वापर करू शकत नाही , तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेह निर्माण होतो.मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारातील बदल खूप महत्त्वाचे आहेत. तज्ज्ञांच्या मते , जर मधुमेहाच्या रुग्णांनी खालील 2 गोष्टी ...

लठ्ठपणा एक गंभीर आरोग्य समस्या

ब्लॉग सं. 2025/228. दिनांक: 18 ऑगस्ट, 2025.         मित्रांनो: 15 ऑगस्टला पंतप्रधान मा नरेंद्र मोदी,यांनी लाल किल्यावरून केलेल्या भाषणात,विविध मुद्द्यांना स्पर्श केलाच,पण त्यासोबत आजच्या एका ज्वलंत प्रश्नाला,तो म्हणजे “मोटापा बढ रहा है”  या वाढत्या लठ्ठपणाच्या प्रश्नाला देखिल हात घातला. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, लठ्ठपणा ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे.भारतात तसेच जगभरात लठ्ठपणा चे प्रमाण,झपाट्याने वाढताना दिसते.एकेकाळी फक्त श्रीमंत वर्गात दिसणारी समस्या,आता ग्रामीण भागातसुद्धा पसरली आहे. लठ्ठपणा म्हणजे शरीरात चरबीचे प्रमाण अनियंत्रित वाढणे.हे फक्त बाह्य रूपावर परिणाम करत नाही तर,शरीरातील अनेक अवयवांवरही त्याचा गंभीर दुष्परिणाम होतो.चला तर आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया, लठ्ठपणा का वाढतो , त्याचे परिणाम काय होतात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येतात. लठ्ठपणा वाढण्याची प्रमुख कारणे: 1.        अयोग्य आहार: फास्ट फूड , तळलेले पदार्थ , जास्त तेलकट व गोड पदार्थ सतत सेवन केल्याने,शरीरात अनावश्यक कॅ...