ब्लॉग नं.2025/234.
दिनांक: 24 ऑगस्ट, 2025.
मित्रांनो,
तुम्हाला कदाचित हे विचित्र वाटेल,खरं वाटणार नाही,पण हे सत्य आहे…मागील 68 वर्षांपासून पिंपळ, वड आणि नीम यांची लागवड सरकारी पातळीवर बंद करण्यात आली आहे. 😢तसं पाह्यला गेलं तर पिंपळ, निंबोणी आणि वड किंवा वटवृक्ष हे तिन्ही अतिशय पर्यावरण पूरक असे वृक्ष आहेत.पण त्याकडे लक्ष देत कोण? आजचा माझा ब्लॉग आहे,याच विषयावर.
सविस्तर:
पिंपळ,वड आणि नीम किंवा निंबोणी या तिन्ही वृक्षांचे शास्त्रात एक वेगळे सांगितले आहे.आणि याला धार्मिक महत्व देण्यात आले.कारण धार्मिक कारण दिलं की लोकांना पटत असे, पण खरं कारण हे की हे वृक्ष पर्यावरण संतुलन राखण्याचे,महत्वाचे कार्य करत असतात.कारण पिंपळ हा कार्बन डाय ऑक्साईडचा 100 % शोषक वृक्ष आहे,वड हा कार्बन डाय ऑक्साईडचा 80 % शोषक वृक्ष आहे तर नीम किंवा निंबोणी हा 75%. पण यांच्या ऐवजी लोकांनी परदेशी युकॅलिप्टस लावायला सुरुवात केली, जो जमिनेला जलविहीन करून टाकतो. 😠
आज
सर्वत्र युकलिप्टस, गुलमोहर
आणि इतर सजावटी झाडे दिसतात.आता जेव्हा वातावरणात शुद्धीकरण करणारी म्हणजे कार्बन
डाय ऑक्साईडचे शोषक वृक्ष उरलेच नाहीत तेव्हा उष्णता तर वाढणारच.
आणि जेव्हा उष्णता वाढेल तेव्हा पाणी वाफ होऊन उडून जाणारच.
👉 जर प्रत्येक 500 मीटर अंतरावर एक पिंपळ वृक्ष लावला, तर येत्या काही वर्षांत भारत प्रदूषणमुक्त होईल… 💞
आणखी एक माहिती अशी की,पिंपळाच्या पानांचा घेरा मोठा असतो,म्हणजे वृक्ष वर मोठा असतो, पण त्याचे खोड हे लहान असते, त्या मानाने बारीक असते.म्हणून शांत हवामानातसुद्धा पाने हलत राहतात आणि शुद्ध ऑक्सिजन देत राहतात. 💞 म्हणूनच पीपळाला "झाडांचा राजा" म्हणतात.
म्हणून पिंपळास वंदन करण्यासाठी एक श्लोक म्हटला जातो,तो खालील प्रमाणे आहे:
मूलं ब्रह्मा, त्वचा विष्णु, सखा शंकरमेव च।
पत्रे पत्रेका सर्वदेवानां, वृक्षराज नमोऽस्तुते।।
आता काय करावे लागेल: … 💞
👉 या जीवनदायी झाडांची जास्तीत जास्त लागवड करण्यासाठी समाजात जागरूकता वाढवा.
👉 बागा तयार करा, झाडे लावा.
👉 बागांना निरर्थक खेळाचे मैदान बनवू नका.
जसे माणसाला हवेसोबत पाण्याची गरज आहे, तशीच झाडांनाही हवेसोबत पाण्याची गरज असते…
🌹 वड एक लावा, पीपळ लावा पाच।
घराघरांत नीम लावा, हेच पुरातन साच।। 🌹
हेच आज सर्वजण मानत आहेत.फक्त ते प्रत्यक्षात यायला हवे. मग प्रदूषण पळून जाईल – हे सर्वांना कळत नाही.
जागतिक ताप नाहीसा होईल, प्रत्येक मन आनंदी होईल.
म्हणूनच म्हणतात धरतीवरचे त्रिदेव आहेत – नीम, पिंपळ आणि वड ।। 🌹
समारोप:
काल सहज नेटवर वेगवेगळ्या पोस्ट वाचत असतांना, ही पोस्ट नजरेस पडली.असं वाटून गेलं की, पिंपळ, वड आणि नीम हे किती महत्वाचे आहेत.ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊस अतिरेकी झाला आहे.या नदीला पूर त्या नाल्याला पूर वगैरे पूर्वी ऐकायला एवढे मिळत नसे,अगदी हे कबूल केली तरी, प्रसार माध्यमे आता खूप वाढली आहे,बातम्या आपल्या पर्यन्त लगेच पोहोचतात, तरी देखिल धो धो पडणारा आणि जागोजागी पूर काढणारा श्रावण महिना माझ्या आठवणीत नाही. नाही तर बालकवींना “श्रावण मानसी हर्ष मानसी,हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येती सरसर शिरवे,क्षणात फिरून ऊन पडे.” सुचलंच नसतं.या सर्वाला थांबवण देखिल आपल्याच हातात आहे.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
✍🏻 लेखक: प्रसाद नातु
🙏RR
ReplyDeleteमहत्वाची माहिती
ReplyDelete