Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

धरतीवरचे त्रिदेव- निंबोणी, पिंपळ आणि वड

ब्लॉग नं.2025/234.

दिनांक: 24 ऑगस्ट, 2025.

मित्रांनो,

तुम्हाला कदाचित हे विचित्र वाटेल,खरं वाटणार नाही,पण हे सत्य आहे…मागील 68 वर्षांपासून पिंपळ, वड आणि नीम यांची लागवड सरकारी पातळीवर बंद करण्यात आली आहे. 😢तसं पाह्यला गेलं तर पिंपळ, निंबोणी आणि वड किंवा वटवृक्ष हे तिन्ही अतिशय पर्यावरण पूरक असे वृक्ष आहेत.पण त्याकडे लक्ष देत कोण? आजचा माझा ब्लॉग आहे,याच विषयावर.

सविस्तर:

पिंपळ,वड आणि नीम किंवा निंबोणी या तिन्ही वृक्षांचे शास्त्रात एक वेगळे सांगितले आहे.आणि याला धार्मिक महत्व देण्यात आले.कारण धार्मिक कारण दिलं की लोकांना पटत असे, पण खरं कारण हे की हे वृक्ष  पर्यावरण संतुलन राखण्याचे,महत्वाचे कार्य करत असतात.कारण  पिंपळ हा कार्बन डाय ऑक्साईडचा 100 % शोषक वृक्ष आहे,वड हा कार्बन डाय ऑक्साईडचा 80 % शोषक वृक्ष आहे तर नीम  किंवा निंबोणी हा 75%. पण यांच्या ऐवजी लोकांनी परदेशी युकॅलिप्टस लावायला सुरुवात केली, जो जमिनेला जलविहीन करून टाकतो. 😠

आज सर्वत्र युकलिप्टस, गुलमोहर आणि इतर सजावटी झाडे दिसतात.आता जेव्हा वातावरणात शुद्धीकरण करणारी म्हणजे कार्बन डाय ऑक्साईडचे शोषक वृक्ष उरलेच नाहीत तेव्हा उष्णता तर वाढणारच.
आणि जेव्हा उष्णता वाढेल तेव्हा पाणी वाफ होऊन उडून जाणारच.

👉 जर प्रत्येक 500 मीटर अंतरावर एक पिंपळ वृक्ष लावला, तर येत्या काही वर्षांत भारत प्रदूषणमुक्त होईल… 💞

आणखी एक माहिती अशी की,पिंपळाच्या पानांचा घेरा मोठा असतो,म्हणजे वृक्ष वर मोठा असतो, पण त्याचे खोड हे लहान असते, त्या मानाने बारीक असते.म्हणून शांत हवामानातसुद्धा पाने हलत राहतात आणि शुद्ध ऑक्सिजन देत राहतात. 💞 म्हणूनच पीपळाला "झाडांचा राजा" म्हणतात.

म्हणून पिंपळास वंदन करण्यासाठी एक श्लोक म्हटला जातो,तो खालील प्रमाणे आहे:    

मूलं ब्रह्मा, त्वचा विष्णु, सखा शंकरमेव च।

पत्रे पत्रेका सर्वदेवानां, वृक्षराज नमोऽस्तुते।।

आता काय करावे लागेल: … 💞

👉 या जीवनदायी झाडांची जास्तीत जास्त लागवड करण्यासाठी समाजात जागरूकता वाढवा.

👉 बागा तयार करा, झाडे लावा.

👉 बागांना निरर्थक खेळाचे मैदान बनवू नका.

जसे माणसाला हवेसोबत पाण्याची गरज आहे, तशीच झाडांनाही हवेसोबत पाण्याची गरज असते…

🌹 वड एक लावा, पीपळ लावा पाच।

घराघरांत नीम लावा, हेच पुरातन साच।। 🌹

हेच आज सर्वजण मानत आहेत.फक्त ते प्रत्यक्षात यायला हवे. मग प्रदूषण पळून जाईल – हे सर्वांना कळत नाही.

जागतिक ताप नाहीसा होईल, प्रत्येक मन आनंदी होईल.

म्हणूनच म्हणतात धरतीवरचे त्रिदेव आहेत – नीम, पिंपळ आणि वड ।। 🌹

समारोप:

            काल सहज नेटवर वेगवेगळ्या पोस्ट वाचत असतांना, ही पोस्ट नजरेस पडली.असं वाटून गेलं की, पिंपळ, वड आणि नीम हे किती महत्वाचे आहेत.ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊस अतिरेकी झाला आहे.या नदीला पूर त्या नाल्याला पूर वगैरे पूर्वी ऐकायला एवढे मिळत नसे,अगदी हे कबूल केली तरी, प्रसार माध्यमे आता खूप वाढली आहे,बातम्या आपल्या पर्यन्त लगेच पोहोचतात, तरी देखिल धो धो पडणारा आणि जागोजागी पूर काढणारा श्रावण महिना माझ्या आठवणीत नाही. नाही तर बालकवींना “श्रावण मानसी हर्ष मानसी,हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येती सरसर शिरवे,क्षणात फिरून ऊन पडे.” सुचलंच नसतं.या सर्वाला थांबवण देखिल आपल्याच हातात आहे.        

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 🏻 लेखक: प्रसाद नातु

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...