Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

लठ्ठपणा एक गंभीर आरोग्य समस्या

ब्लॉग सं. 2025/228.

दिनांक: 18 ऑगस्ट, 2025.       

मित्रांनो:

15 ऑगस्टला पंतप्रधान मा नरेंद्र मोदी,यांनी लाल किल्यावरून केलेल्या भाषणात,विविध मुद्द्यांना स्पर्श केलाच,पण त्यासोबत आजच्या एका ज्वलंत प्रश्नाला,तो म्हणजे “मोटापा बढ रहा है”  या वाढत्या लठ्ठपणाच्या प्रश्नाला देखिल हात घातला.आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत,लठ्ठपणा ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे.भारतात तसेच जगभरात लठ्ठपणाचे प्रमाण,झपाट्याने वाढताना दिसते.एकेकाळी फक्त श्रीमंत वर्गात दिसणारी समस्या,आता ग्रामीण भागातसुद्धा पसरली आहे.लठ्ठपणा म्हणजे शरीरात चरबीचे प्रमाण अनियंत्रित वाढणे.हे फक्त बाह्य रूपावर परिणाम करत नाही तर,शरीरातील अनेक अवयवांवरही त्याचा गंभीर दुष्परिणाम होतो.चला तर आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया,लठ्ठपणा का वाढतो,त्याचे परिणाम काय होतात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येतात.

लठ्ठपणा वाढण्याची प्रमुख कारणे:

1.       अयोग्य आहार:

फास्ट फूड,तळलेले पदार्थ,जास्त तेलकट व गोड पदार्थ सतत सेवन केल्याने,शरीरात अनावश्यक कॅलरींचा साठा होतो.हे कॅलरीज चरबीच्या स्वरूपात साठवल्या जातात.

2.       शारीरिक श्रमाचा अभाव:

आधुनिक जीवनशैलीत बसून काम करण्याचे प्रमाण वाढले आहे.दिवसातून आवश्यक तेवढे चालणे,व्यायाम करणे कमी झाले.परिणामी घेतलेल्या कॅलरीज खर्च न होता शरीरात जमा होतात.

3.       ताणतणाव व मानसिक कारणे:

बरेचदा ताण,नैराश्य किंवा एकटेपणामुळे,लोक जास्त खाण्याकडे वळतात.याला इमोशनल ईटिंग म्हणतात.हे लठ्ठपणाचे एक लपलेले कारण आहे.

4.       अनुवंशिकता (Genetics):

काही लोकांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती आनुवंशिक असते.परंतु योग्य आहार व जीवनशैली पाळल्यास ते नियंत्रणात ठेवता येते.

5.       हॉर्मोन्सचे असंतुलन:

थायरॉईड,पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) यांसारखे आजार, इन्सुलिन रेसिस्टन्स ही कारणे वजन वाढवू शकतात.

6.       औषधोपचाराचे दुष्परिणाम:

काही औषधांमुळे (उदा.स्टेरॉइड्स,काही अँटीडिप्रेसंट्स) वजन वाढण्याचा धोका जास्त असतो.

लठ्ठपणाचे दुष्परिणाम:

लठ्ठपणा हा फक्त बाह्य रूपाशी संबंधित प्रश्न नसून,तो संपूर्ण आरोग्य बिघडवणारा आजार आहे.

  • हृदयविकाराचा धोका : कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराईड्सचे प्रमाण वाढल्याने ब्लॉकेज होऊ शकते.
  • मधुमेह (Diabetes) : इन्सुलिन रेसिस्टन्स वाढल्याने टाईप २ मधुमेहाचा धोका वाढतो.
  • संधिवात व पाठदुखी : जास्त वजनामुळे गुडघे व कंबर यांवर ताण येतो.
  • उच्च रक्तदाब : लठ्ठपणामुळे रक्तदाब वाढतो,ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
  • श्वसनाचे आजार : झोपेत श्वास अडखळणे (Sleep Apnea) ही गंभीर समस्या मोटाप्यात दिसते.
  • मानसिक परिणाम : स्वतःविषयी कमीपणा वाटणे, आत्मविश्वास घटणे, नैराश्य येणे.
  • आयुर्मान कमी होणे : दीर्घकाळ लठ्ठपणा राहिल्यास अकाली मृत्यूची शक्यता वाढते.

लठ्ठपणा नियंत्रणासाठी उपाययोजना:

लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते.जलद वजन कमी करणाऱ्या कृत्रिम पद्धती तात्पुरत्या असतात. योग्य आहार, व्यायाम व जीवनशैलीत बदल हेच खरे उपाय आहेत.

1.       संतुलित आहार:

o   ताज्या भाज्या, फळे, डाळी,कडधान्ये, कमी तेल व कमी साखर असलेले पदार्थ आहारात घ्या.

o   पॅकेज्ड व फास्ट फूड टाळा.

o   दिवसभरात छोटे-छोटे पण पौष्टिक आहार घ्या.

o   पुरेसे पाणी प्या.

2.       नियमित व्यायाम:

o   दररोज किमान 30-45 मिनिटे चालणे, धावणे, योगा किंवा सायकलिंग करा.

o   वजन कमी करण्यासाठी कार्डिओ व्यायामाबरोबरच थोडे स्ट्रेंग्थ ट्रेनिंग सुद्धा उपयुक्त ठरते.

3.       झोप व विश्रांती:

o   अपुरी झोप व ताणतणावामुळे वजन वाढते. दररोज 7-8 तासांची चांगली झोप घ्या.

o   ध्यान व प्राणायाम ताण कमी करण्यात मदत करतात.

4.       लक्ष्य ठरवा आणि नोंद ठेवा:

o   वजन कमी करण्यासाठी छोट्या-छोट्या उद्दिष्टांची नोंद ठेवा.

o   नियमित वजनकाटा तपासा, पण अति अवलंबून राहू नका.

5.       वैद्यकीय सल्ला:

o   काही वेळा हॉर्मोन्स व औषधोपचारांमुळे वजन वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

o   आवश्यक असल्यास डाएटिशियन कडून आहार योजना करून घ्या.

समारोप:

लठ्ठपणा हा फक्त शरीराचा आकार वाढवणारा प्रश्न नसून,एक गंभीर आरोग्य समस्या आहे.तो वाढण्यामागे चुकीची जीवनशैली,आहारातील त्रुटी आणि ताणतणाव हे मुख्य घटक आहेत.लठ्ठपणामुळे हृदयविकार,मधुमेह, उच्च रक्तदाब,संधिवात यांसारखे आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.परंतु हे सर्व टाळता येऊ शकते, जर आपण योग्य आहार,नियमित व्यायाम,पुरेशी झोप व तणावमुक्त जीवनशैली अंगीकारली तर.आपले आरोग्य आपल्या हातात आहे – आजपासूनच जागरूक व्हा आणि लठ्ठपणाला आपल्या आयुष्यातून हद्दपार करा.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 🏻 लेखक: प्रसाद नातु

(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...