Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन व नियमन विधेयक 2025"

ब्लॉग नं:2025/232.

दिनांक: 22 ऑगस्ट,2025.

मित्रांनो,

ऑनलाइन गेमिंगवरील नवा कायदा : "ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन व नियमन विधेयक 2025"

भारतामध्ये ऑनलाइन गेमिंगबाबतचा दीर्घकाळचा कायदेशीर गोंधळ आता संपणार आहे. "ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन व नियमन विधेयक 2025" हे विधेयक 20 ऑगस्ट रोजी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर,ते 21 ऑगस्टला राज्यसभेत मांडले गेले आणि त्याला राज्यसभेने पास केले आहे.हे केंद्र सरकारचे ऑनलाइन गेमिंगसाठी एकसंध कायदा आणण्याचे,पहिले मोठे पाऊल मानले जात आहे.आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांनी स्वतःचे कायदे केले होते, परंतु त्यांची अंमलबजावणी एकसारखी नव्हती. आता केंद्र सरकारचे मत असे आहे की,डिजिटल प्लॅटफॉर्म "सीमारेषेविना" कार्यरत असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील नियम आवश्यक आहेत. आजचा ब्लॉग या विषयावर आहे.

सविस्तर:

"ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन व नियमन विधेयक 2025" हे विधेयक,20 ऑगस्ट रोजी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर,ते 21ऑगस्टला राज्यसभेत संमत केले गेले.

विधेयकाची प्रस्तावना : दोन महत्त्वाचे मुद्दे

1. ऑनलाइन पैशांचे खेळ (money games) यामुळे गंभीर सामाजिक, आर्थिक आणि मानसिक परिणाम होतात — कर्जबाजारीपणा, आत्महत्या, बेकायदेशीर पैशांचे व्यवहार इत्यादी.

2. ई-स्पोर्ट्स आणि नॉन-मॉनेटाइज्ड सोशल गेम्स यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

विधेयकातील पाच प्रमुख मुद्दे:

1. पैशांच्या खेळांवर संपूर्ण बंदी:

या कायद्याने "रियल-मनी गेम्स" म्हणजेच,पैशांच्या आधारावर खेळल्या जाणाऱ्या,सर्व प्रकारच्या ऑनलाइन गेम्सना थेट बंदी घातली आहे.कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपनीला असे खेळ चालवणे,किंवा त्यांचा प्रचार करणे मनाई आहे.यासाठी शिक्षा कठोर आहेत – कमाल 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड.

2. केवळ ऑपरेटरच नव्हे, तर इतरांनाही जबाबदार ठरवले जाईल.

या कायद्याच्या कक्षेत गेमिंग कंपन्यांसोबतच जाहिरातदार, प्रायोजक आणि पेमेंट सेवा पुरवठादार यांनाही आणले आहे.अशा खेळांची जाहिरात करणाऱ्यांना 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा 50 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. डिपॉझिट किंवा विथड्रॉलसाठी व्यवहार उपलब्ध करून देणाऱ्या पेमेंट कंपन्यांनाही ऑपरेटरसारखीच शिक्षा होईल.

3. ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंगसाठी स्वतंत्र जागा:

केंद्र सरकारने पैशांच्या खेळांना बंदी घालताना,ई-स्पोर्ट्स आणि सामाजिक गेम्स यांना प्रोत्साहन देण्याची,स्पष्ट भूमिका घेतली आहे.ई-स्पोर्ट्स, कौशल्याधारित स्पर्धात्मक खेळ,तसेच साधे सामाजिक गेम्स हे नवीनता,कौशल्यविकास आणि आर्थिक प्रगती वाढवतात.आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की, सरकार अशा खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आणणार आहे.

4. विशेष गेमिंग प्राधिकरणाची स्थापना:

या विधेयकानुसार एक नवीन "ऑनलाइन गेमिंग प्राधिकरण" स्थापन करण्यात येणार आहे.या प्राधिकरणाच्या कामांमध्ये पुढील बाबी असतील:

a.गेम्सची नोंदणी व प्रमाणपत्र देणे.

b.एखादा खेळ पैशांच्या आधारे आहे का हे निश्चित करणे.

c.खेळांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करणे.

d.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्लॅटफॉर्मना ब्लॉक करण्याचे आदेश देणे.

5. देशाबाहेरील सेवा देखील कक्षेत:

विधेयकात स्पष्ट केले आहे की,भारतात उपलब्ध असलेल्या सर्व ऑनलाइन गेमिंग सेवांवर,हे कायदे लागू होतील,मग त्या सेवा भारतात असोत किंवा विदेशातून,पुरवल्या जात असोत.त्यामुळे परदेशी सर्व्हरवरून चालणारे गेमिंग ऑपरेटरही या कायद्याच्या कक्षेत येतील.

समारोप:

"ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन व नियमन विधेयक 2025",हे भारतातील डिजिटल गेमिंग जगतातील एक ऐतिहासिक बदल ठरणार आहे.एका बाजूला पैशांच्या आधारे होणारे धोके रोखले जातील,तर दुसऱ्या बाजूला ई-स्पोर्ट्स व कौशल्याधारित गेमिंगला चालना मिळेल.या विधेयकामुळे गेमिंग क्षेत्राला कायदेशीर व सुरक्षित चौकट मिळून "जबाबदार डिजिटल गेमिंग संस्कृती" विकसित होण्याची शक्यता आहे.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 🏻 लेखक: प्रसाद नातु

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...