Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

रोज कमीतकमी 7000 स्टेप्स चाला

ब्लॉग नं.2025/234.

दिनांक: 23 ऑगस्ट, 2025.


मित्रांनो,

7,000 पावलं दररोज : आरोग्याचा खरा मंत्र

"आरोग्य टिकवायचे असेल तर पावलं उचला" – हा मंत्र आज जवळजवळ सर्वत्र ऐकायला मिळतो. अनेक फिटनेस घड्याळे आणि मोबाईलमध्ये आपण दररोज 10,000 पावलं  चालण्याचे लक्ष्य पाहतो. पण खरेच इतकी पावलं  चालल्याशिवाय,आपले आरोग्य सुधारू शकत नाही का? नुकत्याच द लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये,प्रकाशित झालेल्या एका महत्वाच्या संशोधनाने,या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. आणि या निष्कर्षाने अनेकांच्या डोळ्यात प्रकाश पडला आहे – कारण आरोग्य सुधारण्यासाठी 10,000 पावलांची गरज नाही, तर 7,000 पावलं  रोज पुरेशी आहेत! यावर आहे आजचा ब्लॉग.  

सविस्तर:

किती पावलं  चालणे आवश्यक?

संशोधकांनी 31 वेगवेगळ्या अभ्यासांचा डेटा तपासला आणि त्यामध्ये 1,60,000  हून अधिक लोकांचा समावेश होता. त्यांना आढळून आले की, जे लोक दररोज केवळ ४,००० पावलं  चालतात, त्यांचे आरोग्य फारच बैठ्या जीवनशैलीतील लोकांपेक्षा चांगले होते.दररोज 7,000 पावलांनंतर अनेक आरोग्य फायदे मिळतात आणि त्या पुढे फारसा फरक पडत नाही.7,000 पावलं चालल्याने डिमेन्शियाचा धोका 38% नी, पडण्याचा धोका 28% नी, तर कर्करोगाचा धोका 9% नी कमी होतो.याचा अर्थ असा की लहान बदल देखील मोठा फरक घडवतात. फक्त दररोज 1 ,000 पावलं  वाढवली तरी आरोग्य सुधारते.

चालण्याचे शरीरावर परिणाम:

चालण्याला "सोप्पा व्यायाम" म्हटले जाते. पण त्याचे फायदे फारच व्यापक आहेत.हृदय निरोगी ठेवतेवेगाने चालल्याने रक्ताभिसरण सुधारते, हृदयाचे ठोके नियंत्रित होतात.रक्तदाब कमी करतोसतत चालणाऱ्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.मधुमेह नियंत्रणात ठेवतोटाइप 2 डायबेटीस होण्याचा धोका कमी होतो. मानसिक आरोग्यासाठी उपयुक्तचालल्याने ताणतणाव कमी होतो, नैराश्याचा धोका कमी होतो. वजन कमी करण्यात मदतदररोज ठराविक पावलं  चालल्याने कॅलरी बर्न होतात.

10,000 पावलं  का सांगितली जातात?

10,000 पावलांचा आकडा हा वैज्ञानिक अभ्यासावर आधारित नव्हता.1960 च्या दशकात जपानमध्ये एका कंपनीने फिटनेस प्रमोशनसाठी,हा आकडा लोकप्रिय केला आणि तोच हळूहळू "मंत्र" बनला. मात्र नवीन संशोधन दाखवते की खऱ्या अर्थाने 7,000 पावलं  पुरेशी आहेत.

तज्ञ काय सांगतात?

आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे की फक्त पावलं  मोजणे पुरेसे नाही, तर चालण्याचा वेग आणि सातत्यही महत्वाचे आहे.आठवड्यातून किमान 150 मिनिटे जलद चालणे किंवा सायकलिंग किंवा 75 मिनिटे जोरदार व्यायाम,हे दोन्ही प्रकार आरोग्यासाठी लाभदायी आहेत.

तुमच्यासाठी संदेश:

आजच्या धावपळीच्या आयुष्यात रोज 10,000 पावलं चालणे सगळ्यांना जमतेच असे नाही.पण यामुळे निराश होण्याचे कारण नाही. 7000 पावलं रोज हे अधिक वास्तववादी आणि साध्य ध्येय आहे.कामाच्या मधल्या वेळेत थोडा फेरफटका मारा,लिफ्टऐवजी जिने वापरा,जवळची अंतरं गाडीऐवजी चालत जा.हे छोटे-छोटे बदल तुमच्या आरोग्याला मोठा फायदा देऊ शकतात.

समारोप:

"10,000 पावलं  चालल्याशिवाय आरोग्य सुधारत नाही" किंवा रोज 10,000 पावलं चालायलाच पाहयजे  हा गैरसमज आहे.7,000 पावलं  रोज चालल्याने हृदयरोग, मधुमेह, कर्करोग आणि डिमेन्शियाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो.म्हणूनच आजपासून तुमचे लक्ष्य रोज 7,000 पावलांवर केंद्रित करा. दररोज थोडं चालायला लागा आणि शरीर-मन निरोगी ठेवा. 🌿

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 🏻 लेखक: प्रसाद नातु

(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

 

 

Comments

  1. अत्यंत उपयुक्त माहिती
    मी दररोज ८००० पावले चालतो
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete
  2. छान माहिती. इथे एक सांगावेसे वाटते की ज्याच्या चालण्याचा घेर मोठा आहे त्याच्या स्टेप्स कमी राहतील. त्यामुळे प्रत्येकाने अमुकच स्टेप्स चालायला हव्यात असेही नाही. अगोदर हे दहा हजार होते. मला नातू सरांचे म्हणणे पटते की 7000 स्टेप्स चालणे ओके आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...