ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025. मित्रांनो, डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...
Blog No.2024/014. Date: -19 th , January,2024. मित्रांनो, भारतातील श्रीमंत लोकांमध्ये भर पडत आहे आणि मुख्य म्हणजे त्यात नवश्रीमंताची संख्या अधिक आहे.आपल्या देशातील लोकांचा हॅचबॅक म्हणजे अगदी प्रायमरी कार,त्यानंतर मोडणारी म्हणजे सेडान यापेक्षा सध्या लोकांचा एसयुव्ही म्हणजे मोठ्या गाड्या,उंची कार खरेदी करण्यामागचा कल हेच दर्शवितो.या संबंधात आपण आज चर्चा करणार आहोत. प्रास्ताविक गोल्डमन सॅचही एक आघाडीची जागतिक वित्तीय संस्था आहे.जिचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात असे म्हटले आहे की भारताचा श्रीमंत वर्ग हा अर्थव्यवस्थेतील उपभोग्य वस्तूंच्या बाजारावर हुकूमत गाजविणार आहे.त्यांचा अंदाज आहे की भारतातील 60 दशलक्ष लोक असे आहे की ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे सरासरी 8 लाख आहे आणि ही लोकसंख्या 2027 मधे म्हणजे तीनच वर्षांनी 1 00 दशलक्षपर्यंत वाढेल.यासाठी त्यांनी यावर्षी फाइल झालेल्या इन्कम टॅक्स रिटर्नचा आधार घेतला आहे. गेल...