Blog No.2024/009.
Date: -12th, January,2024.
मित्रांनो,
मेट्रो रेल्वेचे आकर्षण वेगळीच गोष्ट आहे. सुरेख दिसणाऱ्या रेल्वे गाड्या शहरांत उंचावर शांपणे फिरत असतात. आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळून आपल्याला शहरात जिथे जायचे असते,त्या गंतव्यस्थानी (Destination) पोहोचविण्याचे काम करत असतात.शहर एक विकसित शहर असल्याचा आभास त्यामुळे निर्माण होतो.पण अशा या आकर्षक मेट्रोमुळे खरोखर वाहतुकीची समस्या दूर व्हायला मदत झाली आहे कां? हे आज आपण पहाणार आहोत.
प्रास्ताविक
भारत मेट्रोच्या बांधकामात आज अग्रेसर आहे.
सरकारने गेल्या दशकात यासाठी सुमारे ₹90,000 कोटी राखून ठेवले आहेत.भारतात दर
महिन्याला ६ किमीचे नवीन ट्रॅक सुरू करत आहोत आणि लवकरच भारत हे मेट्रोचे जगातील
दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क असेल.म्हणजे आपण फक्त चीनच्या मागे असू.
मेट्रो उभारण्याचे काम जोरात सुरु आहे,पण
मेट्रोतून प्रवास करणाऱ्याची संख्या मात्र त्या प्रमाणात वाढत नाही.ही एक समस्या आहे.आयआयटी
दिल्लीतील काही प्राध्यापकांनी यावर संशोधन केले आणि त्यांचा अहवाल धक्कादायक आहे.दिल्ली
मधे अंदाजाच्या तुलनेत बघितले तर प्रवाश्यांचे प्रमाण हे 47% आहे,मुंबई आणि
कोलकाता येथे 30 % आहे आणि बेंगळुरूमध्ये हे प्रमाण तर केवळ 6% आहे.
हा अहवाल जेव्हा द इकॉनॉमिस्टने प्रकाशित
केला तेव्हा प्रचंड खळबळ उडाली. सरकारने एक निवेदन जारी केले आणि दावा केला की
दैनंदिन मेट्रो प्रवासी संख्या आता 10 दशलक्ष आहे आणि दिल्लीत 2023 च्या प्रवासी संख्येने
प्रोजेक्शनला मागे टाकले आहे.
प्राध्यापकांच्या या श्वेतपत्राने असे
म्हटलेले नाही की हे प्रवाश्यांचे आकडे किंवा संख्या भयावह आहे.त्यांनी असे म्हटले
की मेट्रो प्रकल्प हे दररोज सेवा वापरणार्या ठराविक संख्येवर आधारित होते.अशा
प्रकारे नेटवर्क सेट करण्यासाठी प्रचंड खर्च न्याय्य होता आणि त्यामुळेच या प्रोजेक्टना
सुरुवातीला हिरवा कंदील मिळाला.पण जेव्हा ते अंदाज गाठले जात नाही तेव्हा त्यामुळे
मेट्रो प्रकल्प धोक्यात येऊ शकतात. याचा अर्थ मेट्रो स्वतःला आर्थिकदृष्ट्या
टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी कमाई करत नाही आणि असेच चालू राहिल्यास महानगरांची
आर्थिक व्यवहार्यता धोक्यात येऊ शकते.
दुसरे म्हणजे, केवळ या श्वेतपत्रिकेने हा रायडरशिपचा मुद्दा समोर आणला नाही.तर सरकारचे लेखापरीक्षक, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांनी काही वर्षांपूर्वी दिल्ली मेट्रोबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मार्च 2020 पर्यंत, मेट्रोची प्रवासी संख्या त्याच्या सुरुवातीच्या अहवालात जे अंदाज व्यक्त केले होते त्यापेक्षा खूप कमी होती असे निदर्शनास आणले आहे. एका संसदीय समितीने लखनौच्या मेट्रो रेल्वेचा अभ्यास केला आणि सांगितले की कर्जाची परतफेड करण्यासाठी या प्रकल्पाला दररोज 200,000 प्रवाश्यांची आवश्यकता आहे. पण त्यात रोज फक्त 85,000 प्रवासी होते.हे आश्चर्य नाही की भारतातील बहुतेक मेट्रो प्रकल्प फायदेशीर नाहीत हे तज्ञांनी निदर्शनास आणले आहे.
याची कारणे काय असू शकतात?
त्याचे एक कारण लास्ट-माईल
कनेक्टिव्हिटीची समस्या हे असू शकते.जसे की अनेक प्रवाश्यांसाठी घरापासून
मेट्रोपर्यंत पायी चालत जावे लागते किंवा मेट्रो स्टेशन पासून ऑफिस पर्यंत.शहरात सर्व
काही इतस्ततः विखुरलेले असते.त्यामुळे पायी
चालणे अनिवार्य होऊन बसते.भारतीय ते ही शहरातील लोकांना विशेष चालण्याची सवय नसते आणि पायी चालण्यासाठी आपल्याकडे
रुंद फूटपाथ आणि सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे मेट्रो स्टेशनवर जाण्यासाठी
ऑटोरिक्षा घेणे आवश्यक होऊन बसते.त्यामुळे खर्च वाढतो.
यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग
म्हणजे फीडर बसेस,ज्या मेट्रो स्थानकापर्यंत तुम्हाला घेऊन जातील आणि मेट्रो स्थानकाला
ऑफिसेस जोडणाऱ्या असतील.दुर्दैवाने भारतातील बहुतांश महानगरे याकडे लक्ष देण्यात
अपयशी ठरल्या आहेत. दिल्लीबद्दल कॅगच्या अहवालात लिहिले आहे की बसच्या कमतरतेमुळे
एकूण मंजूर मार्गांपैकी फक्त 44% बस सेवा उपलब्ध होत्या. या गैरसोयीमुळे लोकांना
मेट्रो वापरण्यास प्रवृत्त करता येत नाही. दुसरे
कारण असे आहे की मेट्रो रेल्वे या 10 km पेक्षा
जास्त लांबीचा प्रवास असल्यासच फायदेशीर आहेत.म्हणजे जर तुम्ही पुण्यात रहात असाल,आणि तुम्ही खराडी बाय पास येथील तुमच्या घरापासून हिंजवडीतील तुमच्या
ऑफिसपर्यंत प्रवास केल्यास ते फायदेशीर ठरू शकते.कारण हे अंतर साधारण 27 किमी आहे. पण समस्या अशी आहे की
भारतातील जवळपास 70% मेट्रो लाइन्स 10km पेक्षा कमी अंतराच्या
आहेत. त्यामुळे वेळ वाचवण्याचे आकर्षण कमी अंतरासाठी फारसे योग्य ठरत नाही.
विशेषत: जर तुम्ही स्थानकावरील सुरक्षेतून जाण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता,ट्रेनची वाट पहात असाल आणि नंतर शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी समस्यांना
सामोरे जात असाल तर.
पण म्हणून याला पर्याय बस व्यवस्था होऊ शकते कां? नाही.म्हणून श्वेतपत्रिका मेट्रो रेल्वे पूर्णतः बंद केली पाहिजे असे सांगत नसून मेट्रो या लांब पल्ल्याच्या असाव्या.आणि प्रवाश्यांना लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.म्हणजेच मेट्रो स्थानकापर्यंत तुम्हाला घेऊन जातील आणि मेट्रो स्थानकाला ऑफिसेस जोडणाऱ्या असतील.अशा बसेस उपलब्ध झाल्या तर निश्चितपणे मेट्रोची प्रवासी संख्या वाढेल आणि मेट्रो फायदेशीर होईल.
समारोप
यावरुन तुमच्या लक्षांत एक गोष्ट आली असेल की वरवर चमकणारी गोष्ट ही तेवढीशी चमकदार
असतेच असे नाही. पण शहरातील वाहतूक कोंडीवर मेट्रो इतका दूसरा परिणामकारक उपाय किंवा
तोडगा नाही. म्हणूनच सरकारने लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीची व्यवस्था करण्यास सुरुवात
केली आहे.जसे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो सुरु झाल्यानंतर तिथून
थेट विमानतळाला जाण्यासाठी फीडर बसेस सुरु करणार असल्याचे ऐकिवात आहे.
तुम्हाला आजचा
ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
Chan abhyaspurna blog
ReplyDelete