Skip to main content

ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही? 2106

  ब्लॉग नं. 2026/1 72.   दिनांक: 21 जून, 2026.   मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...

आपल्या परिवाराचं भविष्य सुरक्षित करा

ब्लॉग नं. 2024/282

दिनांक:- 21 नोव्हेंबर, 2024.

मित्रांनो,

            विमा त्यातही आयुर्विमा हे नांव ऐकलं तर लोक तुमच्यापासून दूर पळतांनाचे दिवस पाहिलेत मी. चांगले मित्र देखिल मित्र राह्यलेले नाहीत हे देखिल पाह्यले नाही.आजही परिस्थिति फारशी वेगळी आहे असं मला वाटतं नाही.पण इतक्यात मी सहज एक चेंज म्हणून पाच दिवस एक प्रसिद्ध विमा कंपनीच्या पाच दिवसांच्या वर्क शॉपला गेलो होतो. गेल्या पाच वर्षात मी 12 कथासंग्रह आणि 2 कादंबऱ्या लिहिल्या. थोडी मरगळ आली होती.ती  घालवायची म्हणून जायचं ठरवलं.रोज वाघोलीहून रामवाडीला जायचं,तिथून मेट्रो पकडून आनंदनगरला जायचं,अन तिथून विमा कंपनीच्या ऑफिसला जायचं असा दिनक्रम आणि प्रवास मस्त मजेत पार पडला.यावर आहे आजचा ब्लॉग.

सविस्तर:

     आश्चर्य म्हणजे हे वर्क शॉप मला पटवून गेलं की इन्शुरन्स केवळ कारचा,हौसहोल्ड गुडसचा आणि घराचा महत्वाचा नसतो तर आयुर्विमा देखिल महत्वाचा असतो. अर्थात कोविड 2019 ही जागतिक महामारी देखिल बऱ्याच लोकांना आयुर्विम्याचे महत्व शिकवून गेली.त्या इन्शुरन्स कंपनीचा कोर्स तसा डिझाईन केला होता हे कारण नव्हतच मुळी, पण कधी कधी कुणाकुणाची समजवून सांगण्याची हातोटी इतकी जबरदस्त असते की नीरस आणि कंटाळवाणा विषय देखिल सोपा आणि मनोरंजक होऊ शकतो.

            या वर्क शॉपमध्ये आम्हाला म्हणजे माझ्या सोबत 21 जण होते.त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री. विनीत गडकरी नांवाचे उत्कृष्ठ मार्गदर्शक होते.त्यांनी इन्शुरन्स हा विषय आमच्यासमोर छान उलगडून दाखविला.हसत खेळत त्यांनी आमच्या मनाचा ताबा घेत,जे काही मनावर गरुड केलं होतं. ते केवळ जबरदस्त एवढचं म्हणता येईल.

        आता मूळ विषयाकडे येऊ या.इतक्यात मी जे काही शिकलो,त्यातून टर्म इन्शुरन्स कां घ्यावा याचे मला झालेले आकलन मी आपल्यापुढे ठेवत आहे.

टर्म इन्शुरन्स: तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा

   आयुष्य अनिश्चित आहे, आणि या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी टर्म इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. टर्म इन्शुरन्स म्हणजे एका विशिष्ट कालावधीसाठी घेतलेले जीवनविमा संरक्षण. या पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. विशेष म्हणजे, ही योजना तुलनेने कमी प्रीमियममध्ये जास्त संरक्षण देणारी असते.

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

टर्म इन्शुरन्स ही एक शुद्ध जीवनविमा पॉलिसी आहे.जर पॉलिसीच्या कालावधीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर त्यांच्या नॉमिनीला निश्चित रक्कम (सम अॅश्युअर्ड) दिली जाते.जर पॉलिसीधारक ठरलेल्या कालावधीमध्ये जिवंत राहिला, तर त्याला कोणतेही परतावे मिळत नाहीत. ही योजना प्रामुख्याने कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी तयार केली जाते.

टर्म इन्शुरन्सचे वैशिष्ट्ये:

1 कमी प्रीमियम:-

इतर जीवनविमा योजनांपेक्षा टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम कमी असतो.

2.जास्त सम अॅश्युअर्ड:  u

कमी प्रीमियममध्ये मोठी विमा रक्कम उपलब्ध होते. उदाहरणार्थ प्रती वर्ष रु. एक लाखात एक कोटीचा विमा. (हे फक्त उदाहरणा दाखल दिले आहे,प्रत्यक्ष प्रीमियम आणि विम्याची राशी या संबंधात विमा कंपनीसही संपर्क प्रस्थापित करावा.)   

3. टॅक्स फायदे:

आयकर कलम 80C, 10 (10 D) अंतर्गत पॉलिसीधारकाला कर सवलतीचा लाभ मिळतो.

4. अतिरिक्त पर्याय:

अॅक्सिडेंटल डेथ, क्रिटिकल इलनेस, किंवा इनकम रिप्लेसमेंटसाठी अतिरिक्त कव्हर जोडता येते.

5. टर्म इन्शुरन्स का घ्यावा?

अ. कुटुंबाची आर्थिक सुरक्षा:

तुम्ही नसल्यासही तुमच्या कुटुंबाचे जीवनमान कायम राहावे, यासाठी टर्म इन्शुरन्स उपयुक्त आहे.

ब. कर्ज आणि देणी फेडण्यासाठी मदत:

पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कर्जाची जबाबदारी कुटुंबावर येऊ नये म्हणून.

क वैयक्तिक आयुष्यातील निरधास्तता:  

टर्म इन्शुरन्स घेतल्याने आयुष्य अधिक निर्धास्त आणि शांत बनते.

योग्य टर्म इन्शुरन्स योजना कशी निवडाल?

1.       तुमच्या आर्थिक गरजा आणि कुटुंबाच्या भविष्याचा विचार करा.

2.       प्रीमियम आणि विमा रक्कमेतील संतुलन तपासा.

3.       कंपनीची विश्वासार्हता आणि क्लेम सेटलमेंट रेशो बघा.

4.       ऑनलाइन योजना खरेदी करताना सवलतींचा विचार करा.

समारोप:

            टर्म इन्शुरन्सवर मी जे शिकलो ते म्हणणे बरोबर नाही,मला जे समजलं ते मी लिहिलंय.माझे तेथील मार्गदर्शक हा ब्लॉग वाचतीलच,त्यांचा यावर अभिप्राय येईलच.वाचकांनी आपल्या मुलांपर्यंत हे पोहोचवाव,म्हणजे कुणाच्या कामी आल्याचं समाधान मिळेल.   

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु, पुणे.  


Comments

  1. Term insurance explained in very simple way that too with benefits … 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment