Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

महाराष्ट्रातील निवडणूक निकाल (Maharashtra Election Results)

ब्लॉग नं. 2024/284

दिनांक: 24 नोव्हेंबर, 2024  

मित्रांनो

            महाराष्ट्रातील महायुतीच्या महाविजयाने,गेल्या दोन अडीच वर्षात कानावर पडणारे खोका, मिंद्धे सरकार, गद्दार, बाप चोरला,चिन्ह चोरले इत्यादि इत्यादि, हे यापूर्वी कधीही न ऐकलेले शब्द यापुढे कानावर पडणार नाहीत अशी आशा आहे.महाराष्ट्रातील जनतेने,जी या पाच वर्षात झालेल्या घटनांमुळे जेरीस आली होती. या वेळेस महायुतीला ऐतिहासिक कौल देऊन त्या अस्थिरतेचा सोक्षमोक्ष लावला आहे.या विषयावर आहे आजचा हा दूसरा ब्लॉग.

सविस्तर:

            मी शेवटची बातमी वाचली तेव्हा महायुती 221 आणि भारतीय जनता पक्षाला 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी पक्षाला (अजित पवार) 50 जागा अशी स्थिती होती. भारतीय जनता पक्षाला आजवरच्या सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना विशेष जागा मिळाल्या नाहीत. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या जागांत विदर्भाचा वाटा मोठा आहे.महाविकास आघाडीतल्या एकाही विरोधी पक्ष नेता पद मिळेल, एवढ्या सुद्धा जागा मिळविता आल्या नाही. विरोधी पक्ष नेता पद मिळविण्यासाठी,विरोधी पक्षाला, विधानसभेतील एकूण जागा 288 आहेत,त्याच्या दहा टक्के एवढ्या जागा मिळवाव्या लागतात. म्हणजेच 29 जागा हव्यात, तेवढ्याही जागा कॉंग्रेस,शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार) गट यांना मिळविता आल्या नाहीत. इतकी नामुष्की या तीन पक्षांच्या वाटेला आली आहे.

            महाविकास आघाडीतील पक्षांनी नेहमी प्रमाणे एव्हीएमला शिव्या शाप देणे सुरू केले आहे. यापूर्वी 40 वेळा एव्हीएमला चॅलेंज केले गेले आणि प्रत्येक वेळी एव्हीएम यातून तावून सुलाखून बाहेर पडले आहे. तरी देखिल हा विषय पुनः पुनः कां चघळला जातो आहे? असा विचार मनात येतो. त्यामागचे कारण हे की दुसरे कुठले कारण त्यांना सापडत नाही.पण मग विरोधी पक्षांच्या पराभवाची कारणे नेमकी काय हे जाणून घेऊ या. अंतर्गत धुसफूस: महायुतीत सर्व आलबेल होते असे नाही,पण त्यांचे वाद चव्हाट्यावर आले नाहीत. मुख्यमंत्री कोण असावा,या वरुन कॉंग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यातील वाद,नाना पटोले यांच्यातील वाद, कित्येक ठिकाणी जागा कुणी लढवायची यावर झालेला वाद असे अनेक प्रसंग सांगता येतील.

1.       अतिशय बेताल भाषणे: महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आपला ताल आणि तोल सोडून केलेली भाषणे.याचा विपरीत परिणाम झाला.

2.       महायुतीचा अप्रत्यक्ष प्रचार: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीचे कार्यक्रम हे आपले लक्ष ठरविले आणि वारंवार तेच केल्यामुळे महायुतीचा अप्रत्यक्ष प्रचार झाला.

3.       योग्य असा जाहीरनामा नव्हता :- महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपला जाहीरनामा आणल्या नंतर तो भाषणांमधून पुढे मांडण्याऐवजी महायुतीच्या जाहीरनाम्यावर भाषणे देऊन वेळ घालविला.

4.       महायुतीचा योजनाबद्ध प्रचार: महायुतीतील नेत्यांनी खूप सुसूत्र प्रचार केला. पंतप्रधान मोदी, अमित शहा,राजनाथ सिंह,नितीन गडकरी,जे. पी. नड्डा, योगी आदित्यनाथ आदि बिनीचे नेते प्रचारासाठी उतरविले होते.कॉंग्रेसकडे राहूल गांधी यांच्याशिवाय कुणी मोठा नेता,कॉंग्रेसकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आला नव्हता.     

5.       महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव: महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला.त्यांनी आघाडीतील आपल्या सहयोगी पक्षाच्या सभा घेतल्याचे अभावानेच आढळले.

6.       भूतकाळातील कामांचा अभाव: महाविकास आघाडीकडे भूतकाळात त्यांनी केलेले कुठलेही काम सांगण्यासारखे नव्हते. कोविड 19 हा काळ जनतेने अनुभवला होता आणि त्याच्या कडू आठवणी जनतेच्या चांगल्याच लक्षात होत्या.      

7.       मनोज जरांगे यांचे आंदोलन:    1977 ला सत्तेतील जनता पक्षातील लोकांनी इंदिरा गांधी यांना टार्गेट केलं, त्याचा विपरीत परिणाम होऊन इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. त्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून त्यांच्या वर अतिशय विखारी प्रचार केला,याचा उलट परिणाम झाला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या.

8.       एक है तो सेफ है ला उत्तर नव्हते:    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा “एक है तो सेफ है” ला काऊंटर करणे महाविकास आघाडीतील नेत्यांना जमले नाही.

समारोप:

            विविध वाहिन्यांनी मुख्यमंत्री पदावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात कलह लावण्याचा भरपूर प्रयत्न करून पाहिला,पण महायुतीतील नेत्यांनी अतिशय संयम बाळगत हा विषय सहज टोलविला. महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे स्थिरता राहील आणि एवढा मोठा mandate दिला आहे तर जनतेच्या हिताची कामे करतील अशी अपेक्षा आणि आशा आहे.  

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,      


Comments

  1. मोजक्या शब्दात संपूर्ण विश्लेषण. मला जाणवलेले अजून एक कारण, हिंदुत्व. हिंदुत्व म्हणजे अन्य धर्मियांचा द्वेष नव्हे. महाआघाडीतील काही हिंदु नेते, गोल टोप्या घालून, मुस्लिमांच्या अयोग्य मागण्या मान्य करण्याच्या भाषा करतात, तेव्हा हिंदु नाराज होणे स्वाभाविक आहे.

    ReplyDelete
  2. One of the important reason is increase in voting percentage .
    RRJ

    ReplyDelete
  3. लाडक्या बहिणीने भावाला मस्त सपोर्ट केला.

    ReplyDelete
  4. अत्यंत योग्य विश्लेषण. मला वाटते महविकास आघाडी कधीही जिंकण्यासाठी लढत नव्हती. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास स्वतःला जाणते राजे, पुरोगमी, महाराष्ट्राचा तारणहार समजणारे शरद पवार यांचा प्रचारसभा मधून ह्याला पदा, त्याला पदा अशा विखारी प्रचार जनतेला रीचल्स नाही. याउलट देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केलेली विकास कदम, पुढील पाच वर्षातील मशारश्ट्रचे व्हिजन लोकांसमोर ठेवले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...