ब्लाॅग नं.2026/100. दिनांकः 10 एप्रिल, 2026. मित्रांनो मी आज आहारतज्ज्ञ अदिती प्रभू यांच्या मतांवर आधारित एक माहितीपूर्ण ब्लॉग लेख लिहीत आहे.तर सविस्तर जाणून घेऊ त्यांचे मत काय आहे ते. सविस्तरः 🍚 महिनाभर भात सोडला तर शरीरात काय बदल होतात ? आहारतज्ज्ञ अदिती प्रभू यांचे महत्त्वपूर्ण मत भारतीय जेवणात ' भात ' हा अविभाज्य भाग आहे. पण वजन कमी करण्याच्या नादात अनेकजण सर्वात आधी भात खाणे बंद करतात. सोशल मीडियावर याबद्दल अनेक मते पाहायला मिळतात. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अदिती प्रभू यांनी महिनाभर भात न खाल्ल्यास शरीरावर नेमके काय परिणाम होतात , यावर सविस्तर प्रकाश टाकला आहे.जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी भात पूर्णपणे सोडण्याचा विचार करत असाल , तर हा ब्लॉग तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 🚫 भात पूर्णपणे बंद केल्यावर काय होते ? अदिती प्रभू यांच्या मते , जेव्हा तुम्ही अचानक महिनाभर भात खाणे बंद करता , तेव्हा शरीरात काही तात्कालिक बदल दिसतात: * वजन कमी झाल्याचा भास : सुरुवातीला तुम्हाला वजन कमी झाल्यासारखे वाटू शकते. पण हे लक्षात घ्या की हे ' फॅट लॉस ' नसून ...
ब्लॉग नं. 2026/093. दिनांक: 3 एप्रिल,2026. मित्रांनो, आजच्या ब्लॉगचे शीर्षक वाचून कदाचित तुम्हाला वाटलं असेल की, मी सध्या ईराण-अमेरिका आणि इस्राइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर,मला ही गॅस टंचाईची भीती वाटते आहे किंवा अशा अफवांवर विश्वास ठेवून मी ब्लॉग लिहिला आहे. पण तसं नाही मित्रांनो. या गोष्टींवर यासाठी माझा विश्वास नाही,कारण अजून लग्न,साखरपुडे इत्यादि कार्यक्रम जोरात सुरू आहेत,त्यावर बंदी आलेली नाही. पेट्रोल,डिझेल किती भरायचं यावर रेशनिंग नाही. आणि माझे एक जवळचे नातेवाईक एचपीसीएलशी संबंधित आहेत,त्यांच्याकडून मला अलर्ट मेसेज आलेला नाही.मी एक बँकर म्हणून किंवा पर्यावरणाविषयी जागरूक आहे,म्हणून कुठलीही गोष्ट केल्याने,काही बचत होत असेल तर त्याचा आधी विचार करतो. त्याच दृष्टिकोनातून,आज हा ब्लॉग मी लिहिला आहे. सविस्तर: मला असं वाटतंय की,आज पर्यन्त 1125 लिहून झालेत,पण मी दृष्टिकोन हा शब्द मी वापरला नाही. राजकीय नेत्यांकडून त्याचा इतका आणि नको त...