Skip to main content

टाइप 5 मधुमेह

ब्लाॅग नं.2025/150 दिनांकः 31 मे, 2025. मित्रांनो,  मधुमेहाचा नवा प्रकार: प्रकार ५ मधुमेह – एक नवा दृष्टिकोन एप्रिल २०२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने (IDF) मधुमेहाच्या एका नवीन प्रकाराला अधिकृत मान्यता दिली – प्रकार ५ मधुमेह. या नवीन प्रकारामुळे जगभरातील आरोग्य क्षेत्रात नवी जागरूकता निर्माण झाली आहे. प्रकार ५ मधुमेह विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. अंदाजानुसार, सुमारे २० ते २५ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. प्रकार ५ मधुमेह म्हणजे काय? प्रकार ५ मधुमेहाला "गंभीर इन्सुलिन-कमी असलेला मधुमेह" (Severe Insulin-Deficient Diabetes - SIDD) म्हणूनही ओळखले जाते. हा मधुमेह इतर प्रकारांपेक्षा वेगळा आहे. कुपोषणामुळे होणाऱ्या चयापचय विकारांशी त्याचा थेट संबंध असून, विशेषतः किशोरवयीन आणि तरुण प्रौढांवर त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो. दीर्घकाळ कुपोषणामुळे शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. परिणामतः, शरीर इन्सुलिनची निर्मिती पुरेशा प्रमाणात करू शकत नाही. यामुळे चयापचय स्थिरता राखणे कठीण होते. टाइप १ आणि ...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043  

दिनांक: 12 फेब्रुवारी,2025. 

मित्रांनो,

            नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही.

सविस्तर:

            पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन केल्यावर अमरत्व प्राप्त करता येईल. हा अमृत भरलेला कलश किंवा घट, गरुड वाहून नेत असता,काही थेंब हे प्रयागराज, हरिद्वार,उज्जैन आणि नासिक येथे नद्यांमद्धे पडले. म्हणून तेथील स्नानाला पवित्र स्नान म्हटले जाते.याचा संबंध गुरु हा ग्रह 12 राशीतून भ्रमण करत असता,जेव्हा ऋषभ राशीत येतो,तेव्हा कुंभमेळा साजरा केला जातो. याला कारण गरुडाच्या कलशातून जेव्हा अमृताचे थेंब प्रयागराज येथे पडले तेव्हा गुरु ग्रह वृषभ राशीत होता आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करता झाला होता.सूर्य मकर राशीत प्रवेश करतो,त्याच दिवशी उत्तरायण सुरू होते,म्हणजेच सूर्य उत्तरेकडे सरकायला लागला आहे,असे आपल्याला भासते.

            दर 12 वर्षांनी गुरु हा वृषभ राशीत प्रवेश करतो,तेव्हा कुंभमेळा साजरा केला जातो.हा योग 12 वर्षांनी 12 वेळा म्हणजेच 12 X 12=144 वर्षांनी महाकुंभ साजरा केला जातो.सगळ्यात सुरुवातीला महाकुंभ केंव्हा साजरा करण्यात आला त्याविषयी माहिती उपलब्ध नाही.पण एकंदर कॅलक्युलेशन केले तर महाकुंभ पहिल्यांदा साजरा केला त्यानंतर 144 वर्षांनी,असे कॅलक्युलेशन केले तर 2025 हे वर्ष येत असावे असे वाटते. म्हणून या वर्षी हा कुंभमेळा साजरा केला जात आहे.

रिवा ते प्रयागराज:

            ठरल्याप्रमाणे आम्ही 4 फेब्रुला नागपूरहून यात्रेसाठी रवाना झालो. त्याआधी प्रयागराज येथे हॉटेलचा शोध घेतला पण सगळेच हॉटेल्स बूक झालेले होते.म्हणून आम्ही थांबण्यासाठी मध्य प्रदेशातील रिवा (Rewa) हे स्थान निवडले. नागपूरहून रिवाचे अंतर 503 किमी असून तिथे पोहोचण्यासाठी साधारण, स्वतःच्या कारणे 9 तास लागतात.आम्ही रिवा येथे मुक्काम केला आणि सकाळी लवकर प्रयागराजकडे प्रस्थान केले.रिवाहून प्रयागराज केवळ 133 किमी दूर आहे,पण वाहनांची प्रचंड गर्दी असल्याने गूगलच्या 2 तास 50 मिनिटे या अंदाजापेक्षा बरेच जास्त म्हणजे चार तास लागले.     

प्रयागराज येथील अरेल घाट:

            विविध यूट्यूब चॅनलवर आधी कळले होते की, उत्तर प्रदेश सरकारने स्नान करण्यासाठी एकूण 42 घाट उभारले होते,त्यापैकी अरेल घाट हा अतिशय विस्तीर्ण असा घाट आहे,जिथे आरामात स्नान करणे शक्य होते.अरेल घाटावर जाण्यापूर्वी,आम्हाला आमचे वाहन अरेल घाटाच्या पार्किंगवर सोडावे लागले.पार्किंगपासून घाट 3-3.50 किमी एवढा दूर होता,ते अंतर पायी चालत जायचे होते.आम्ही अरेल घाटावर पोहोचलो आणि तेथील दृश्य पाहून अचंबित झालो. अरेल घाटावर बरीच गर्दी होती,भाविक तिथे नदीच्या पाण्यात डुबकी मारत होते.आम्ही स्नानाला जेव्हा उतरलो,तेव्हा लक्षात आलं की पाणी प्रचंड थंड होते,जरी वातावरणात तेवढा गारवा नव्हता.अगदी बर्फाचे पाणी वाटत होते.पाणी स्वच्छ होते.घाट स्वच्छ होता. सर्व काही शांतपणे पार पडत होते. त्याच दिवशी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगमावर स्नान केले.नदीच्या आंत बऱ्याच दूर पर्यन्त वाळूची पोती टाकून नदीचे पाणी उथळ केले होते.घाटावर स्नान झाल्यावर कपडे चेंज करण्यासाठी टेंट लावले होते.पण गर्दी बरीच होईल,म्हणून आम्ही आमचा स्वतःचा लहानसा टेंट नेला होता.जो Amazon वर उपलब्ध आहे.सगळीकडे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सगळे काही पार पडत होते आणि त्यामुळे तिथे 29 जानेवारीला झालेल्या दुख:द प्रसंगाचे सावट जाणवत नव्हते.

पवित्र स्नान, मोक्षप्राप्ती आणि पुण्यप्राप्ती:

            प्रयागराज येथे गंगा,यमुना आणि सरस्वती (गुप्त स्वरूपात) या तीन नद्यांचा संगम असल्याने येथे स्नान करणे पवित्र मानले जाते.म्हणूनच हरिद्वार,उज्जैन आणि नासिकमधील कुंभमेळयापेक्षा येथील कुंभमेळयाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.144 वर्षांनी हा महाकुंभ साजरा केला जातोय,त्यामुळे त्याचे महत्व अधिक आहे.कारण हा काही पिढ्यांच्याच वाट्याला येणारा  एक अद्भुत सोहळा आहे.मी 144 वर्षे,या संकल्पनेकडे या नजरेतून पहातो.कारण माझ्या आधीच्या अनेक पिढ्या या प्रसंगापासून वंचित राहिल्यात आणि येणाऱ्या कित्येक पिढ्या या अद्भुत अशा सोहळ्याला मुकणार आहे.

            आता राह्यला प्रश्न मोक्षप्राप्ती आणि पुण्यप्राप्तीचा.माझ्या पुरते सांगायचे झाल्यास मी या गोष्टीचा विशेष विचार केला नाही.पण पवित्र स्नान,या संकल्पनेकडे मी वेगळ्या नजरेने पहातो.आपण जीवनात कधीही एवढ्या प्रचंड गर्दीच्या साक्षीने स्नान करत नाही.तेथे येणारा प्रत्येक यात्रेकरू म्हणा भाविक म्हणा आपल्याला स्नान केल्यावर काही तरी प्राप्त होईलच या सकारात्मक विचाराने म्हणजेच positive vibes घेऊन आलेला असतो.त्यामुळे सकारात्मक उर्जेने भारलेल्या या वातावरणात आपल्यात positive vibes जागृत होतात आणि आधी असतील तर वाढीस लागतात.असे माझे मत आहे. आणि positive vibes काय काय करू शकतात,हे प्रत्येकाला ठाऊक आहे.म्हणूनच तिथे स्नान केल्यावर प्रत्येकाला एका वेगळ्या अनुभूतीचा अनुभव येतो,ती वेगळी अनुभूति म्हणजेच positive vibes.     

समारोप:

            प्रयागराज येथे महाकुंभ 45 दिवस साजरा करण्यात येणार आहे,म्हणजेच आता 16 दिवस उरलेत. महाकुंभात 13-14 जानेवारी (मकर संक्रमण अर्थात संक्रात), 29-30 जानेला मौनी अमावस्या, 2-3 फेब्रुला वसंत पंचमी, आता 12-13 फेब्रुला माघी पौर्णिमा आणि 26 फेब्रुला महाशिवरात्र,हे पाच दिवस महत्वाचे आहेत.असे म्हटले जाते की 15 फेब्रुवारीपासून ते 23 फेब्रुवारीपर्यन्त तिथे विशेष गर्दी नसणार,म्हणून माझे सांगणे आहे की या दिवसांत तुम्हीही जरूर जाऊन या. आता तेथील व्यवस्थेविषयी.तिथे येणारी प्रचंड गर्दी पहाता,उत्तर प्रदेश सरकारने या महासोहळ्याचे खूप सुरेख,शिस्तबद्ध आयोजन केले आहे.या बद्दल सरकारला माझ्याकडून 100 गुण.येथे होणाऱ्या दुर्घटनांविषयी बोलायचे झाले तर लोक जेव्हा अनियंत्रित होतात आणि बेशिस्त,बेताल वागतात,तेव्हा असे प्रसंग घडतात.     

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा आणि एक जागरूक रहा. 

 

प्रसाद नातुपुणे. 

Comments

  1. उत्तम 👌🏼

    ReplyDelete
  2. Very nice to read your experience Raja. You are lucky since rush is increasing day by day. Happy to read about arrangements made by UP Govt. Opposition is busy only in criticizing Govt. Hearty congratulations.

    ReplyDelete
  3. Good experience. There are six Shahi Snana. 02/03 February 2025 was one being Vasant Panchami. We all were blessed for the Almighty made it possible.

    ReplyDelete
  4. खूप सुंदर निवेदन ऐकून अगदी जायची इच्छा होते पाहूया जमतं का ते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...