Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

अनोखी कहाणी मनस्वी तरुणाची

ब्लॉग नं. 2025/121.

दिनांक: 22 एप्रिल, 2025.

मित्रांनो,

            मी सध्या एक मानसशास्त्राचा कोर्स करतोय, हे 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षात माझ्या ब्लॉगमधून मानसशास्त्राचा म्हणण्यापेक्षा वाढत्या मानसिक आजारांचा उल्लेख केला होता.जीवन धकाधकीचं झालंय आणि अशात मला वाटतं की कमी अधिक प्रमाणात आपण सारेच मानसिक आजारांचे शिकार होऊ लागलो आहे.कुठल्याही गोष्टीत कधी काही चांगलं दिसतं नाही,हा देखिल मला मानसिक आजार वाटतो. राजकीय पुढारी तरी मानसिक आजाराचे शिकार झाले आहेत.Abnormal या शब्दाची व्याख्या करायची झाल्यास ती शब्दकोषात Different from What is normal अशी आहे.मानसशास्त्रात Abnormal Personality Disorders आहेत. आपल्याला ते कुठले माहित झाले की,लक्षात येईल आपल्या आजूबाजूला Abnormal Personality Disorders चे असंख्य रोगी आहेत हे आढळून येईल.यावर मी एक कादंबरी लिहिली आहे, “खेळ कुणाला दैवाचा कळला” ते kindle Amazon वर ई-बूक स्वरूपात प्रकाशित झालीय.आज हा ब्लॉग त्यासाठीच.

सविस्तर:

माणसाच्या मनांत काही तरी प्राप्त करण्याची इच्छा झाली की त्यासाठी तो प्रयत्न करू लागतो. या प्रयत्नांमुळे स्पर्धा वाढते, कारण असे प्रयत्न अनेक लोक करत असतात आणि जशी स्पर्धा वाढली की,त्या सोबत ताण तणाव वाढणे अपेक्षित असते,क्रमप्राप्त होते.पण यातून मानसिक आजार जन्म घेतात आणि आज काल मानसिक रोग्यांची संख्या वाढत आहे.पण या सोबत मानसिक रोगतज्ञ वाढले कां? नाही. मानसिक रोग्यांना तो मानसिक रोगी आहे हे सांगणे किंवा पटविणे तेवढे सोपे नाही. तसेच त्याच्या नातेवाईकांना समजावून सांगणे सोपे नाही.बऱ्याचदा तो असाच आहे,तो abnormal च आहे,वेडा झाला आहे तो,किंवा आमच्या प्रत्येक पिढीत कुणी ना कुणी असा असतोच,इथपर्यंत सांगण्यात येते.मानसिक आजारांची लोकांना ओळख करून देण्यासाठी आपण ही काही तरी केलं पाह्यजे या विचारातून या कादंबरीचा जन्म झाला.

          या विषयावर कादंबरी लिहिण्याचे जेव्हा मनांत आले,त्याच वेळी मी मानसशास्त्राच्या डिग्री कोर्ससाठी अॅडमिशन घेतलेली होती आणि माझ्या पहिल्या सेमेस्टर मध्ये मला पर्सनल डिसऑर्डर्स विषयी माहिती मिळाली.पण या कादंबरीचा विषय कसा बनवायचा, कथाबीज कसे तयार करायचे हा विचार मनांत येत होता.एक दिवस अचानक हे कथाबीज मला मिळाले.मी ओला टॅक्सीमधून प्रवास करत असतांना,ड्रायव्हरला कुणाचा तरी फोन आला आणि तो फोनवर त्या डॉक्टरांकडे कसे पोहोचायचे हे समोरच्याला समजावून सांगत होता.त्याच्या बोलण्यात खूप आत्मियता वाटली मला.

          त्याचा फोन झाल्यावर मी त्याला विचारले की,तुमचे कुणी नातेवाईक होते कां फोनवर? तुम्हाला कसे माहित हे डॉक्टर चांगले आहेत? तेव्हा त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली.तो म्हणाला,मी एकदा मुंबईहून पुण्याकडे एक जोडपे आणि त्यांचा मुलगा यांना घेऊन येत होतो.मुलाला काही तरी त्रास होता.ते पुण्याचेच होते,म्हणजे नागपूरहून मुलाच्या नोकरीसाठी पुण्याला शिफ्ट झालेले.त्यांना पुण्यात कुठले डॉक्टर चांगले,हे माहित नव्हते.ते आपसांत चर्चा करत होते,कुणाकडे जावं,आपलं पुण्यात कुणी ओळखीचं नाही की त्यांना विचारता येईल.मी त्यांना आता ज्यांचा पत्ता सांगत होतो,त्या डॉक्टरांचे नांव सुचविले.
          मी विचारले,पण तुम्हाला कसं माहित ते डॉक्टर चांगले आहेत म्हणून? तेव्हा तो म्हणाला,साहेब गेली दहा वर्षे टॅक्सी चालवतो आहे.या दहा वर्षात बऱ्याच जणांना त्या डॉक्टरांकडे सोडले आहे आणि तिथून बऱ्याच जणांना दवाखान्यातून घरी सोडले आहे.जातांना ते लोक  बोलत असतात,डॉक्टर खूप चांगले आहेत, ताबडतोब गुण आला वगैरे.बस असे माहित झाले ते डॉक्टर.मला त्याचं कौतुक वाटलं.मी पुण्याचाच असल्याने,मला ते डॉक्टर चांगले आहेत,हे माहित होतं. पण इथेच ठरलं की माझ्या कादंबरीचा नायक असेल,हाच टॅक्सी ड्रायव्हर.फक्त तीच्या बोलण्यात डॉक्टर एवढेच होते,मी त्यांना मानसशास्त्रज्ञ बनविलं आणि त्या नंतर जे सुचत गेलं,
मी फुलवत गेलो आणि मी जे फुलविलं ते या कादंबरीतून तुम्हाला वाचायला मिळेल. तुम्हाला निश्चितपणे आवडेल.आणि वाचता वाचता मानसिक आजारांची ओळख होईल.

समारोप:

            ही लघु कादंबरी सध्या तरी ई-बूक स्वरूपात आहे.पण मी लवकरच याची पेपर बॅक घेऊन येणार आहे.त्या सोबत हिच्या ई-बूकची कॉपी जे kindle चे सभासद नसतील त्यांना कशी उपलब्ध करून देता येईल यावर सध्या मी काम करत आहे.हा प्रयोग जमला तर मग तुम्हाला,तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर ही कादंबरी वाचता येईल.  

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 

प्रसाद नातु,पुणे. 

Comments

  1. मानसशास्त्र या माझ्या आवडत्या विषयाचा आपण अभ्यास करत आहात हे वाचून खूप आनंद झाला.
    खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...