Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

दिर्घायुषी निरोगी जिवन जगण्यासाठी काय करावे?

Blog No 2024/251.

दिनांक:23,ऑक्टोबर2024 



मित्रांनो,

            आज काल तसेही मनुष्याचे आयुष्यमान वाढले आहे. त्यात आयुष्य निरोगी व्यतित करणे जवळपास अशक्य झाले आहे. कारण आपण किती ही प्रयत्न केला तरी सकस अन्न आपल्याला मिळत नाही. Pesticides आणि insecticides चा वापर  करून पिकविलेले अन्न त्याचे काही दुष्परिणाम घेऊन येतच. हवा तर नाहीच पण पाणी शुद्ध मिळत नाही,आपण वॉटर प्युरिफायर वापरुन शुद्ध पाणी प्यायल्याचे समाधान बाळगत असतो पण पाणी शुद्ध करतांना,पाण्यातील बरेचसे शरीराला पोषक आणि आवश्यक घटक देखिल नष्ट होत असतात.माझ्या वाचनात निरोगी दीर्घायुष्य जगण्याच्या उपायांबद्दल माहिती आली,ती आजच्या ब्लॉग मध्ये पोस्ट करत आहे.त्यातील बऱ्याचशा गोष्टी कृतीत आणणे अवघड असले तरी करून पहिल्याने भलेच होणार आहे. तर बघू या, काय आहेत हे मूलमंत्र.

सविस्तर: 

आपल्या शरीरात वात,पित्त आणि कफ असतात, यांना समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी असणे म्हणतात. यांना दोष यासाठी म्हटले आहे की यांच्या संतुलनात काही बिघाड झाला की त्याचे रूपांतर आजारांत होते.यासाठी आपल्याला आपल्या जिवनशैली मधे थोडा बदल करावा लागतो.तो केला की त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात.

आधीचे लोक हे अनेक वर्षे आणि तेही तंदुरुस्त जिवन जगत. काय होते त्यांच्या जीवनाचे रहस्य किंवा मूलमंत्र,ते आपण पाहू या. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील.  

1) सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 4.30 ते 5.00 या वेळेत उठावे.                     

2) दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जाईल.याप्रमाणे 1 ते 3  ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)

3) पाणी प्यायल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातिर्विधी आटोपून घ्यावा.

4) त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन) दंत रोग दूर राहतात

5) नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरु नये.

6) सकाळी 7.30 ते 9.30 च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो,त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे केव्हाही फायदेशीर आहे. (अन्न पचन उत्तम होते)

7) जेवणाच्या 45 मिनीट अगोदर आणि जेवणानंतर एक तासाने पाणी  प्यावे. जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही.

8) सकाळी फळांचा ज्युस प्या, दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या आणि  झोपताना देशी गाईचे तूप व हळद टाकुन प्या.

9) नेहमी पाणी पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे,उभे राहून, गड़बडीने पाणी पिऊ नये.

( शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते. त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

10) नेहमी जेवण केल्यावर 10-15 मिनीटे वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (२० मिनीटे झोपावे) घ्यावी. आणि संध्याकाळी जेवण केल्यावर 3 तास झोपू नये व शतपावली करावी.

11) ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व काहीही खाऊ नये. ॲल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय.

12) भोजन करतांना नेहमी तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा. 

13) झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे,असेच झोपावे किंवा विष्णु मुद्रेत, आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले,पोटावर झोपु नये.

14) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.लाकडी घाणीचे तेलच वापरा.  (रिफाईन्ड तेल/ डबल रिफाईन्ड  विष आहे)

15) सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा. (साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)

16) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा.

17) जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

18) कमीत कमी 6 ते 7 तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे.

19 ) दररोज एक तास प्राणायाम, 15 मिनीट योगासने, व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे.

20) प्राणायाम मात्र नियमित करणेच चांगले. 

21) रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा. तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी, कोबी यांचा वापर करावा.

22) जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे, उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील. 

23) भारतीय रस म्हणजे उसाचा रस, कोकम सरबत,आवळा रस, लिंबू सरबत, फळांचा ज्युस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत. 

24) भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो पांढराच असावा.

25) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये ८४ प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.

युरीनला जावे वाटले की थांबवू नये,अश्रू बाहेर येवू द्यावेत, रडायला आले तर ऱडावेच, हसायला आले की भरपुर हसावे, जांभई आली की द्यावीच, शिंक आली की बिनधास्त द्यावी,अपानवायू आला की तसाच बाहेर येऊ द्यावा,

26) कफ कधीच गिळू नये.

वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकतो.

समारोप:

            माझ्या मनात आलं की मी लिहिलंय खरं,पण यातील बऱ्याच गोष्टींचे पालन करणे अवघड आहे.पण यातील काही गोष्टी सुरुवात म्हणून आपण करू शकतो आणि त्या मी करायचं ठरविले आहे.त्यातील सकाळी 4.30 ते 5.00 मधे उठणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे,तिच्या पासून सुरुवात करू शकतो.हळूहळू या गोष्टी करत गेल्यास त्याचे फायदे अनुभवायला मिळू शकतात.तुम्ही देखिल सुरुवात करून बघा.       

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु,पुणे.             


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...