ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
Blog No 2024 /200. दिनांक:31 ऑगस्ट, 2024 मित्रांनो, लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 11 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात , भारतीय नागरिकांसाठी उत्तराधिकार आणि विवाह यासह वैयक्तिक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ' धर्मनिरपेक्ष (किंवा एकसमान) नागरी संहिता ' लागू करण्याची मागणी केली.ते म्हणाले , सर्वोच्च न्यायालयाने “वारंवार या समस्येकडे लक्ष वेधले आहे.” “धर्माच्या आधारे आपल्या देशाचे विभाजन करणाऱ्या आणि भेदभाव वाढवणाऱ्या कायद्यांना आधुनिक समाजात स्थान नाही” असे मोदी म्हणाले. सविस्तर: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 44 मध्ये असे म्हटले आहे की , देशाने देशभरातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता ( UCC) सुनिश्चित करण्यासाठी कार्य केले पाहिजे. UCC वर्तमान वैयक्तिक कायद्यांची जागा घेईल जे धर्म आणि समुदायानुसार बदलतात आणि त्याऐवजी वैयक्तिक जीवनातील विविध पैलूंसाठी एकसमान कायदे प्रस्थापित करेल , जसे की विवाह , घटस्फोट , दत्तक घेणे आणि वारसा. एखाद्या व्यक्तीच्या धर्माची पर्वा न करता लागू होणारे कायदे असणे हे ध्येय आहे....