Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

कुरकुरीत कांदा भजी

Blog No. 2024/ 164.  

Date: 26th ,July 2024

मित्रांनो,

            महाराष्ट्रात गेल्या 2-3 दिवस इतका पाऊस झाला आहे की,मला आज चक्क कांद्याच्या भज्याची रेसिपी मेलवर आली आहे. आणि या सारखा चांगला पदार्थ या दिवसांसाठी दुसरा नाही. बहुतेक गृहीणींना कांद्याच्या भज्याची रेसिपी माहित असणार.पण कदाचित ब्लॉग वाचून पुरुषांना देखिल कांद्याची भजी करण्याची इच्छा होईल आणि समजा नाही झाली तरी खाण्याची निश्चितच होईल म्हणून आजचा ब्लॉग.

सविस्तर:         

कुरकुरीत कांदा भजी,ज्याला कुरकुरीत कांद्याचे पकोडे देखील म्हणतात.हा एक लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे.ही  कांद्याची भजी पावसाळी दिवसांसाठी किंवा कोणत्याही समारंभात स्टार्टर म्हणून एकदम योग्य आहेत.भजी  बनवायला सोपी आणि अत्यंत स्वादिष्ट असतात.

साहित्य:

- 2 मोठे कांदे

- 1 कप बेसन

- 2 चमचे टेबलस्पून तांदूळ पीठ

- 1 चमचा ओवा

- 1 चमचा जिरे

- 1 चमचा तिखट

- ½  चमचा हळद

- ½ चमचा गरम मसाला

- एक चिमूटभर हिंग

- चवीनुसार मीठ

- आवश्यकतेनुसार पाणी

- तळण्यासाठी तेल

- ताजी कोथिंबीर (ऐच्छिक)

तयार करण्याची कृती:

1. तयारी:

   - कांदे सोलून पातळ चकत्या करा.

   - ताजे कोथिंबीर बारीक चिरा, जर वापरत असाल तर.

2. भज्याचे पीठ :

   - एका मिक्सिंग बाउलमध्ये बेसन, तांदूळ पीठ, ओवा, जिरे, तिखट, हळद, गरम मसाला, हिंग, आणि मीठ एकत्र करा.

   - कांद्याच्या चकत्या करून त्यात व्यवस्थित मिसळा, जेणेकरून कांद्याच्या चकत्यांना कोरडे मिश्रण समान रीतीने लागेल.आधी पीठ कांद्याच्या चकत्यांमधून निघालेल्या पाण्यात भिजू द्या.   

   - हळूहळू थोडे पाणी अगदी आवश्यक वाटल्यास घालून जाड पीठ तयार करा. पीठ इतपत पातळ असे असावे की ते कांद्याच्या चकत्यांना चिकटून राहील.

3. तळणे:

   - मध्यम आचेवर एका खोल तळणीच्या पॅनमध्ये तेल गरम करा.

   - पिठामध्ये बुडवलेल्या कांद्याच्या चकत्या छोटे छोटे भाग करून गरम तेलात सोडा.

   - भजी तळून घ्या, पण पॅनमध्ये जास्त भजी घालू नका.

   - सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा, आणि अधूनमधून उलट-सरळ करा.

   - भजी छिद्र असलेल्या झाऱ्याने काढा आणि पेपर टॉवेलवर ठेवा ज्यामुळे जास्तीचे तेल निघून जाईल.

5. सर्व्हिंग:

   - कुरकुरीत कांद्याची भजी गरम गरम चटणी, चिंच चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.भजी ताजे आणि गरम असताना सर्वोत्तम लागतात.

तळटीप:

 - भजी तेलात सोडण्यापूर्वी तेल चांगले गरम झाले आहे याची खात्री करा; अन्यथा, भजी जास्त तेल शोषून घेतील आणि चविष्ट वाटणार नाहीत.

 अधिक चविष्ट बनवण्यासाठी पिठामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा कोथिंबीर घाला.

समारोप

            मला खात्री आहे की तुम्ही ब्लॉग वाचत असतांना कुरकुरीत भज्याचा आनंद घेत असाल किंवा उद्या चवथा शनिवार म्हणजे सगळ्यांना,अगदी बँकवाल्यांना सुद्धा,सुट्टी आहे तर उद्याचा बेट ठरविला असणार.पण पाऊस नाही, पाऊस नाही म्हणता म्हणता,पाऊस आला आणि अगदी धसमुसळेपणा करीत आला.भज्याची मजा तेव्हा अधिक असते जेव्हा,रिमझिम रिमझिम पाऊस सुरू असतो आणि या किंचित ओल्या पार्श्वभूमीवर आपण कुरकुरीत भज्याचा आनंद घेत असतो.आता पाऊस निदान शनिवारी रविवारी तरी तो तसा येवो,हिच त्याला प्रार्थना.                  

            तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.     

 

 

प्रसाद नातु, पुणे


 

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...