Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

दारिद्रय रेषेखालील लोकांची संख्या कमी झाली आहे कां?

 Blog No.2024/040

Date: -29th, February,2024. 

मित्रांनो,

            तुम्ही इतक्यात बऱ्याच वेळा हे ऐकले असेल की,गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या वर आले आहेत.यासाठी एक दारिद्र्य रेषा आखून दिलेली असते.ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे त्या रेषेखाली असेल ते  दारिद्रय रेषेखाली जगणारे लोक.केंद्रीय मंत्रिमंडळाने अधिकृत केलेल्या पद्धतीनुसार,बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) यादी अंतर्गत लाभार्थी होण्यासाठी घरगुती उत्पन्न मर्यादा अंदाजे रु. 27,000 प्रति वर्ष आहे. एखाद्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 27,000/- पेक्षा जास्त असल्यास कुटुंबाचा बीपीएल यादीत समावेश केला जाणार नाही.वर्षाला रु. 27,000/- म्हणजे महिन्याला रु.2250.00. पण आजकाल आणखी एका पद्धतीचा यासाठी वापर केला जातो. आजच्या ब्लॉगमध्ये त्या विषयी थोडे काही. 

सविस्तर

            आजकाल एक वेगळा सिद्धांत मांडला जातो आहे,तो म्हणजे  एका परिवाराचा अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध, अंडी इ. खरेदी वरील खर्च किती. 2011-12 मध्ये, ग्रामीण परिवाराचा अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध, अंडी इ. खरेदी वरील सुमारे 53% इतका होता. 2022-23 मध्ये तो कमी होऊन 46.4% पर्यंत खाली आला. सर्वेक्षणाच्या इतिहासात ही संख्या ५०% च्या खाली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरी भारतातही, एकूण खर्चात अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध, अंडी इ. खरेदी वरील ४२.६% वरून ३९.२% पर्यंत घसरला आहे. 

पण मग याचा दारिद्र्य रेषेचा काय संबंध

तर 1857 ला अर्न्स्ट एंजेल नावाच्या जर्मन सांख्यिकीशास्त्रज्ञाने गरीब, मध्यम आणि श्रीमंत कुटुंबे त्यांच्या बजेटचे कसे व्यवस्थापन करतात,याचा सखोल अभ्यास केला.आणि असा निष्कर्ष काढला की "एखादे कुटुंब जितके गरीब असेल तितका अन्नावर जास्त खर्च केला जातो." दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जसजसे कौटुंबिक उत्पन्न वाढते,तसतशी अन्नावर खर्च केलेल्या उत्पन्नाची टक्केवारी कमी होते. हे निरीक्षण आता अर्थशास्त्राच्या जगात “Engel’s Law” म्हणून लोकप्रिय आहे.

थोडे अधिक स्पष्ट करून सांगतो,गरिबांनी त्यांच्या उत्पन्नाचा बराचसा भाग अन्नावर खर्च केला, तर त्यांना आरोग्य आणि शिक्षणात सुधारणा करण्यासाठी खर्च करावयास जास्त पैसे उरणार नाही.ज्याचा अंतिम परिणाम म्हणजे त्यांना गरिबीच्या चक्रातून बाहेर पडणे कठीण जाईल.आणि एंजेलच्या मते,लोकसंख्येचे जीवनमान सुधारत आहे की नाही हे मोजण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे अन्नासाठी होणारा खर्च तपासणे. जेवढा  अन्नावरील खर्च कमी होत जाईल,तेवढा जिवनाच्या इतर गोष्टींसाठी खर्च करण्यास अधिक पैसा उपलब्ध असेल.  ज्याने जिवनमान उंचावण्यास मदत होईल.भारतात नेमके आता हेच घडत आहे.भारतातील परिवारांचा अन्नधान्यावरील,भाजीपाला,फळे,दूध इत्यादिवरील दरडोई खर्च कमी होत आहे. याचा अर्थ  भारत योग्य दिशेने वाटचाल करत आहे,असा होतो.

त्यामुळे निती आयोगाच्या सीईओने ताबडतोब निष्कर्ष काढला की देशातील फक्त 5% लोक आता दारिद्र्यरेषेखाली राहतात.या निष्कर्षाचा मागील तर्क काय ते सांगतो. 2012 मधे अधिकृत दारिद्र्यरेषेची व्याख्या अशी होती की,ज्या ग्रामीण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.850.00 पेक्षा कमी असेल,ते कुटुंब दारिद्र्यरेषेखाली असे समजण्यात येईल. ही व्याख्या एका समितीने केली,जिचे नेतृत्व तेंडुलकर यांनी केले होते.म्हणून ही रेषा  ‘तेंडुलकर दारिद्र्यरेषा’ म्हणून प्रसिद्ध आहे.जर आपण वर्षानुवर्षे सरासरी वार्षिक 6% महागाई गृहीत धरली तर, आज हे उत्पन्न किमान . 1460.00 असायला हवे. नवीन सर्वेक्षणाचा विचार केल्यास आजकाल एकूण लोकसंख्येच्या फक्त 5% लोकांचे वार्षिक उत्पन्न किमान . 1460.00 पेक्षा कमी आहे.

सरासरी ग्रामीण MPCE (Marginal Per Capita Expenditure) दरडोई सीमान्त खर्च हा ₹ 3,773  आहे. पण काही लोकांचा दरडोई सीमान्त खर्च हा जास्त असेल तर तो सरासरी दरडोई सीमान्त खर्चावर परिणाम करू शकतो.तसे जरी असले तरी, लक्षात ठेवण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे ग्रामीण आणि शहरी भारतातील दरडोई खर्चाचे प्रमाण कमी झाले आहे. 2011-12 मध्ये शहरी भारताने त्यांच्या ग्रामीण भागांपेक्षा 84% जास्त खर्च केला होता, तो आता फक्त 71% जास्त आहे. याचा अर्थ ग्रामीण भारत झपाट्याने शहरी भारताला गाठत  आहे. 

याची कारणे काय?

            सर्वेक्षणात या मागील कारणे देण्यात येत नसली तरी,काही अहवालांचा असा अंदाज आहे की,असे असू शकते की कामगारांचं वाढत्या प्रमाणात शहरांमध्ये स्थलांतरित होत आहे आणि ते त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी घरी पैसे पाठवतात.ग्रामीण भागातील 30% खर्च अशा देशांतर्गत रेमिटन्समुळे होतो.ग्रामीण भागातील लोक स्थलांतर करत आहेत, कारण ग्रामीण भागात उत्पन्न वाढवण्यासाठी पुरेसे चांगले काम उपलब्ध नाही.परंतु, हे पैसे गरिबी कमी करण्यास कारणीभूत होत आहे,तसेच  ग्रामीण लोकांना व्यावसायिक कामांमध्ये गुंतवणूक करण्यास मदत करत आहे आणि त्यांना चांगल्या आरोग्य सेवा आणि शिक्षणापर्यंत पोहोचण्यास मदत करत आहेत. 

समारोप

            अशा रीतीने अर्थव्यवस्था विकसित होत असताना, उपभोगाच्या वस्तूंमध्ये केवळ अन्नधान्यावरील खर्च कमी होत नसून,इतर गोष्टींवरचा जसे आरोग्य,शिक्षण, राहणीमान उंचावणे या गोष्टींवरील खर्च वाढत आहे.आणि हे देशाचा प्रगतीचे लक्षण आहे.अन्नधान्याची MPCE वरुन देशाची लोकसंख्या दारिद्र्य रेषेच्यावर आली आहे.असा जो दावा केंद्र सरकार कडून केला जात आहे,त्यात तथ्य नाही असे नाही.सोबत रोजगार वाढत असल्याचे हे अप्रत्यक्ष लक्षण आहे असे म्हणता येईल.

            मित्रांनो,मी काही मोदी सरकारचा प्रवक्ता नाही,पण जे काही दावे केले जातात,ते एक सुजाण नागरिक म्हणून,त्यांचे तथ्य तपासून पाहून ते लोकांसमोर आणणे मी गरजेचे मानतो.या सर्वात MPCE हे देखिल दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या मोजण्याचे एक साधन असू शकते, हे देखिल या निमित्ताने माहित झाले.  

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे             

Comments

  1. All things explained very well and it's a sweet welcome news to everyone's ears. However the point of further persisting with subsidies and it's contribution to wasteful expenditure in consumption of liquor and other wasteful expenditure needs to be explained

    ReplyDelete
  2. छान विश्लेषण🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...