Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

पंकज उधास राह्यले नाहीत

 Blog No.2024/03. 

Date: -26th, February,2024. 

मित्रांनो,

            “चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल,एक तुही धनवान है गोरी बाकी सब कंगाल” म्हणणारे पंकज उधास आज आपल्यात नाहीत. गझल गायकीसाठी लागणारा आवाज त्यांच्याकडे होता. त्या जोरावर त्यांनी गझलला जरा वेगळ्या पद्धतीने पेश केलं.ते लोकांना आवडलं.आणि पहाता पहाता हा गायक प्रसिद्धीस पावला.आजच्या  ह्या ब्लॉगने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू या. 

सविस्तर

          मला ते दिवस आठवतात. मी नुकताच बँकेत जॉइन झालो होतो.आणि मी ज्या एका खोलीत (बॅचलर कॉटेज) रहात होतो,त्या घर मालकांच्या घरातून बाहेर जायला रस्ता होता.पंकज उधास यांची कॅसेट नुकतीच आली होती आणि त्यातील काही गाणी सुपर हीट झाली होती.मी सकाळी चहा पिण्यासाठी जात असे तेव्हा आमचे घर मालक त्यांच्या दुकानात बसलेले असायचे आणि सकाळी सकाळी “चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल” हे गाणं ऐकत बसलेले ऐकायचे.त्यांचे वय बरेच होते.आधी पंकज उधास यांच्या या कॅसेट मधील गाणी न ऐकलेल्या मला,त्यांना ती गाणी लावून ऐकतांना पाहून गंमत वाटायची.पण रोज रोज ऐकल्यावर ती गाणी सहज ओठांवर रुळावली. सुरेख चाल, सुंदर शब्द, वाद्यांची सुरेल साथ आणि पंकज उधास यांचा मदभरा आवाज. गाणी घर करून राहयली.                                      

चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल, झिलमे चाँद नजर आये, थोडी थोडी पिया करो, एक तरफ उसका घर ही त्यांची सुरुवातीची गाणी. त्या नंतर त्यांचा आवाज ऐकून चित्रपटात त्यांना गाणी मिळाली. आज फिर तुमपे प्यार आया है, ना कजरे की धार ,जिये तो जिये कैसे बिन आपके ही गाणी खूप हीट झाली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी “नाम” चित्रपटासाठी गाणे गाण्यास आमंत्रित केले.1986 मध्ये आलेल्या 'नाम' चित्रपटात पंकज उधास यांनी "चिठ्ठी आयी है, आयी है, चिठ्ठी आयी है, हे गाणे जबरदस्त हिट झाले. त्यानंतरही अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. 2006 मध्ये, पंकज उधास यांना पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.पंकज उधास यांचे दोन्ही भाऊ निर्मल उधास आणि मनहर उधास हे देखील गायक आहेत. 

मृत्यू

काल 26 फेब्रुवारी ला सकाळी 11 च्या सुमारास त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 72 वर्षाचे होते.  त्यांच्या मुलीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये कर्करोगामुळे त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी इंस्टाग्रामद्वारे शेअर केली. 

समारोप

          एक आणखी मोठा गायक काळाच्या पडद्याआड निघून गेला. त्यांच्या गझलच्या रूपाने ते आपल्यात असतीलही.पण माणसाचे असणं ही एक मोठी गोष्ट असते मग ते कार्यरत नसतील तरी ते आपल्यात आहेत,ही भावना नेहमीच सुखद असते.ही रुखरुख लावून पंकज उधास गेले. त्यांना माझ्या तर्फे आणि माझ्या ब्लॉगच्या असंख्य वाचक मित्रांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. 

 

प्रसाद नातु, पुणे

 

Comments

  1. Informative blog and apt tribute to the Ghazal Maestro

    ReplyDelete
  2. One more song was very popular that time viz. Sabko malum hai main sharabi nahi... Bhavpurna Shradhanjali to Pankaj Udhas.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...