Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

तुमचा ईको तुम्ही निवडा

 Blog No. 2023/163       

Date: 25th, June 2023.


 

मित्रांनो  

          आज कालच्या जगात लोकांना प्रेरणा देणं,प्रोत्साहन देणं हे सुद्धा बऱ्याच लोकांचे करिअर झाले आहे.याला कारण जीवनात अनेक कारणांनी येणारी निराशा, वैफल्य. खरं तरं निराशा किंवा वैफल्य यायची कारणे अनेक आहेत. काही अगदी सामान्य कारणे देखिल असतात. कदाचित जीवनापासून आपल्या अपेक्षा पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. किंवा सध्याची जी व्यवस्था आहे, तिला तोंड देण्यास किंवा सामोरे जाण्यास आपण कमी पडतो,सक्षम नाही आहोत.पण एकंदरीत, motivational speaker ना महत्व आले आहे किंवा आपणच ते प्रदान केले आहे.आज आपण एक अशीच गोष्ट बघणार आहोत.ती जीवनाकडे बघायला शिकवते.

 

आपला ईको स्वतः निवडा                      

            एकदा एक माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन गावाजवळच्या जंगलात फिरायला गेला. जंगलात फिरता फिरता अचानक मुलाला काही तरी टोचलं,रुतलं. त्याच्या मुखातून सहजच “आsss” बाहेर पडले.त्याच्या कानी दुरवरच्या डोंगरावरुन “आsss” असाच प्रतिध्वनि कानी आला.त्याला आश्चर्य वाटलं.कारण यापूर्वी त्याला या गोष्टीचा अनुभव आला नव्हता. आलेला प्रतिध्वनि हा त्याचा पहिलाच अनुभव होता.

            कुतुहुलापायी तो पुन्हा एकदा जोरात ओरडला, “तू कोण आहेस?” त्याला तिकडून पुन्हा “तू कोण आहेस?” हेच उत्तर मिळाले.त्याला ते उत्तर ऐकून राग आला. तो पुन्हा मोठ्याने ओरडला, “तू भित्रा आहेस.” त्याला पुनः डोंगरातून तेच उत्तर आले. “तू भित्रा आहेस.” आता मात्र त्याला असे वाटले की कुणी तरी आपल्याला मुद्दाम चिडवतं आहे. त्याने त्याच्या वडिलांना विचारलं “बाबा, हे काय चाललं आहे? मी जे काही म्हणतो आहे पलीकडून तसाच आवाज येतो आहे.तो असं कां करतोय?तो मला चिडवतो आहे कां,बाबा?”

            त्याचे बाबा हसले आणि त्याला म्हणाले, “बेटा,लक्षात घे,त्याच्याशी काही तरी चांगलं बोल बरं.” मग त्याचे बाबा स्वतःच ओरडले “आय लव यू”. लगेच तिकडून प्रतिध्वनि आला “आय लव यू”. मुलगा आश्चर्यचकित झाला.पण तो गोंधळलेला होता. ते बघून त्याचे बाबा पुनः एकदा निसर्गाशी संवाद साधतात. “तू अदभूत आहेस!”  तिकडून पुनः “तू अदभूत आहेस!” असा आवाज आला ते ऐकून मुलगा रोमांचित झाला.पण अजूनही त्याला काय चालले आहे ते समजत नव्हते.तेव्हा त्याला त्याचे बाबा म्हणतात, “मुला याला “ईको” म्हणतात.तुला इतक्यात समजणार नाही. पण खरं तर हेच आयुष्य आहे.तुम्ही इतरांना जे देता तेच हे आयुष्य,हे जीवन तुम्हाला परत करीत असतं.जीवन हा तुमच्या कृतींचा आरसा आहे.”

            मुलाच आता आपल्या बाबांकडे लक्ष नसतं तो आपल्या विश्वात रममाण झालेला असतो. त्याचे बाबा स्वगत बोलल्यासारखे बोलत असतात. “जर तुम्हाला जीवनात प्रेम हवे असेल तर प्रेम द्या.अधिक दयाळूपणा हवा असेल तर तुम्ही अधिक दयाळूपणे वागा. तुम्हाला कुणी समजून घ्यायला हवे असेल तर इतरांना समजून घ्यायला शिका. तुम्हाला आदर हवा असेल तर इतरांना आदर द्या. तुमच्या चुकांना माफी हवी असेल तर इतरांना त्यांच्या चुकांसाठी माफ करा.”

 

सारांश

            निसर्गाचा हा ईको किंवा प्रतिध्वनिचा नियम हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलुला लागू होतो.आपल्याला जीवनात इतरांकडून म्हणा किंवा जीवनाकडून जे हवे आहे, ते ते तुम्ही इतरांसाठी करा.कारण तुम्ही जे देता तेच आयुष्य किंवा जीवन तुम्हाला परत करीत असतं.तुमचे जीवन हा योगायोग नसून तुमच्या कर्माचा आरसा आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे ईको ऐकायचा आहे ना,मग तुमचा ईको तुम्ही स्वतःच निवडा.मी माझा ईको निवडला आहे. माझा ईको “प्रेम,ज्ञान,माहिती,आदर,मैत्री,सदभाव आहे. तुम्ही तुमचा निवडा.”      

    आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे.     


फोटो सौजन्य@ science ABC                               

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...