Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

तुमचा ईको तुम्ही निवडा

 Blog No. 2023/163       

Date: 25th, June 2023.


 

मित्रांनो  

          आज कालच्या जगात लोकांना प्रेरणा देणं,प्रोत्साहन देणं हे सुद्धा बऱ्याच लोकांचे करिअर झाले आहे.याला कारण जीवनात अनेक कारणांनी येणारी निराशा, वैफल्य. खरं तरं निराशा किंवा वैफल्य यायची कारणे अनेक आहेत. काही अगदी सामान्य कारणे देखिल असतात. कदाचित जीवनापासून आपल्या अपेक्षा पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. किंवा सध्याची जी व्यवस्था आहे, तिला तोंड देण्यास किंवा सामोरे जाण्यास आपण कमी पडतो,सक्षम नाही आहोत.पण एकंदरीत, motivational speaker ना महत्व आले आहे किंवा आपणच ते प्रदान केले आहे.आज आपण एक अशीच गोष्ट बघणार आहोत.ती जीवनाकडे बघायला शिकवते.

 

आपला ईको स्वतः निवडा                      

            एकदा एक माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन गावाजवळच्या जंगलात फिरायला गेला. जंगलात फिरता फिरता अचानक मुलाला काही तरी टोचलं,रुतलं. त्याच्या मुखातून सहजच “आsss” बाहेर पडले.त्याच्या कानी दुरवरच्या डोंगरावरुन “आsss” असाच प्रतिध्वनि कानी आला.त्याला आश्चर्य वाटलं.कारण यापूर्वी त्याला या गोष्टीचा अनुभव आला नव्हता. आलेला प्रतिध्वनि हा त्याचा पहिलाच अनुभव होता.

            कुतुहुलापायी तो पुन्हा एकदा जोरात ओरडला, “तू कोण आहेस?” त्याला तिकडून पुन्हा “तू कोण आहेस?” हेच उत्तर मिळाले.त्याला ते उत्तर ऐकून राग आला. तो पुन्हा मोठ्याने ओरडला, “तू भित्रा आहेस.” त्याला पुनः डोंगरातून तेच उत्तर आले. “तू भित्रा आहेस.” आता मात्र त्याला असे वाटले की कुणी तरी आपल्याला मुद्दाम चिडवतं आहे. त्याने त्याच्या वडिलांना विचारलं “बाबा, हे काय चाललं आहे? मी जे काही म्हणतो आहे पलीकडून तसाच आवाज येतो आहे.तो असं कां करतोय?तो मला चिडवतो आहे कां,बाबा?”

            त्याचे बाबा हसले आणि त्याला म्हणाले, “बेटा,लक्षात घे,त्याच्याशी काही तरी चांगलं बोल बरं.” मग त्याचे बाबा स्वतःच ओरडले “आय लव यू”. लगेच तिकडून प्रतिध्वनि आला “आय लव यू”. मुलगा आश्चर्यचकित झाला.पण तो गोंधळलेला होता. ते बघून त्याचे बाबा पुनः एकदा निसर्गाशी संवाद साधतात. “तू अदभूत आहेस!”  तिकडून पुनः “तू अदभूत आहेस!” असा आवाज आला ते ऐकून मुलगा रोमांचित झाला.पण अजूनही त्याला काय चालले आहे ते समजत नव्हते.तेव्हा त्याला त्याचे बाबा म्हणतात, “मुला याला “ईको” म्हणतात.तुला इतक्यात समजणार नाही. पण खरं तर हेच आयुष्य आहे.तुम्ही इतरांना जे देता तेच हे आयुष्य,हे जीवन तुम्हाला परत करीत असतं.जीवन हा तुमच्या कृतींचा आरसा आहे.”

            मुलाच आता आपल्या बाबांकडे लक्ष नसतं तो आपल्या विश्वात रममाण झालेला असतो. त्याचे बाबा स्वगत बोलल्यासारखे बोलत असतात. “जर तुम्हाला जीवनात प्रेम हवे असेल तर प्रेम द्या.अधिक दयाळूपणा हवा असेल तर तुम्ही अधिक दयाळूपणे वागा. तुम्हाला कुणी समजून घ्यायला हवे असेल तर इतरांना समजून घ्यायला शिका. तुम्हाला आदर हवा असेल तर इतरांना आदर द्या. तुमच्या चुकांना माफी हवी असेल तर इतरांना त्यांच्या चुकांसाठी माफ करा.”

 

सारांश

            निसर्गाचा हा ईको किंवा प्रतिध्वनिचा नियम हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलुला लागू होतो.आपल्याला जीवनात इतरांकडून म्हणा किंवा जीवनाकडून जे हवे आहे, ते ते तुम्ही इतरांसाठी करा.कारण तुम्ही जे देता तेच आयुष्य किंवा जीवन तुम्हाला परत करीत असतं.तुमचे जीवन हा योगायोग नसून तुमच्या कर्माचा आरसा आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे ईको ऐकायचा आहे ना,मग तुमचा ईको तुम्ही स्वतःच निवडा.मी माझा ईको निवडला आहे. माझा ईको “प्रेम,ज्ञान,माहिती,आदर,मैत्री,सदभाव आहे. तुम्ही तुमचा निवडा.”      

    आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे.     


फोटो सौजन्य@ science ABC                               

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...