Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

महाशिवरात्र

Blog No. 2023/41      

Date: 18th, February 2023. 


मित्रांनो 

            महाशिवरात्र हा एक हिंदू सण आहे.जो देशभर साजरा केला जातो. तसे तर शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात शिवरात्र ही साजरी केली जाते.पण हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या आगमनापूर्वी (फेब्रुवारी/मार्च) महिन्यात येणारी शिवरात्र ही महाशिवरात्र म्हणून साजरी केली जात असते. महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले होते असे मानले जाते.     

महाशिवरात्रीच्या पूजेसंबंधी थोडे काही  

            महाशिवरात्रीला पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप,शेण,गोमूत्र आणि दहयाने शिवलिंगाला अभिषेक केला जातो.त्या नंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. भगवान शंकराची पूजा, आराधना केली जाते. ॐ नम: शिवाय ह्या जपाची एक माळ म्हणजे 108 वेळा म्हटलं जातो. त्या सोबत शंकराच्या पिंडीवर 108 बेल पत्र वहाण्याची देखिल परंपरा आहे असे म्हटले जाते. महाशिवरात्रीच्या रात्री देशातील काही भाविक भजन करून त्या नंतर दूधामधे भांग मिसळून त्याचे सेवन करतात. तर काही ठिकाणी दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते दूध पितात.ह्या दुधाला थंडाई असे म्हटले जाते. मी गोंदिया येथे असतांना भजन आणि त्या नंतर थंडाई पिण्याची जी प्रथा आहे ती अनुभवली.


 भारतातील विविध भागात सण साजरा कसा होतो

            आता आपण भारताच्या विविध भागात हा सण कसा साजरा केला जातो,हे बघूया.     

दक्षिण भारतात शिवरात्रीच्या आदल्या दिवशी एकभुक्त राहून हे व्रत साजरे केले जाते. पण महाशिवरात्रीला नदीत स्नान करून शंकराचे दर्शन घेऊन शंकराला तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. यजुर्वेदाचे पठन आणि बेलाची पाने आणि तील घातलेल्या भाताचा नैवेद्य असे विविध प्रकार आहेत. काश्मीर मधे महाशिवरात्रीला होणारी बर्फवृष्टी शुभ मानली जाते. शंकराचार्य टेकडी मंदिरात भक्त दिवसभर दर्शन घेतात.शंकराला कमळाची फुले वाहण्याची प्रथा आहे. तर ईशान्य भारतात आसामात शुक्रेश्वर मंदिर, उमानंद मंदिर येथे भाविक दर्शनाला जातात. तिथे यात्रेचे आयोजन केले जाते. उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त भाविक राजस्थान,मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन पोहोचतात आणि शिवाला अभिषेक करतात. बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी देखिल महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .

 महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा  

            महाराष्ट्रात बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या पाच ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. पण त्या शिवाय खालील ठिकाणी यात्रा भरतात.

अहमदनगर जिल्ह्यात  श्री अगस्ती मंदिर, अकोले येथे,ठाणे जिल्ह्यात बरनाथ येथे, गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी जवळील महादेवगढ मंदिरात तसेच कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील मंदिरात, गडचिरोली जिल्ह्यात मार्कंडादेव  मंदिरात,औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ लेण्यांजवळील गरुडेश्वर मंदिर, खडकेश्वर मंदिर, कोल्हापूर जवळ कण्हेरी मठातील शिव मंदिरात, कोल्हापूर जवळील रामलिंग मंदिरात, पुणे जिल्ह्यात वेल्हे येथील धान्येश्वर मंदिर, वाघोली येथील वागेश्वर मंदिर, मुंबई जवळील घारापुरी लेण्या, अकोला येथील राजराजेश्वर मंदिर, राजापूर जवळील धुतपापेश्वर मंदिर,सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ, सातारा जिल्ह्यात कोटेश्वर मंदिर, सोलापूर येथील काड सिद्धेश्वर अशा विविध ठिकाणी यात्रा भरविली जाते.यात्रा हा एक खरेदी विक्री करण्याच्या जागेव्यतिरिक्त नवीन पिढीला आपल्या संस्कृती आणि परंपरेची ओळख होते.ह्या यात्रा आणि विविध सण हे साजरे करण्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे बारा बलुतेदारांना काम मिळते.मंदिरातील ब्राम्हण, पूजा सामान विकणारे,फूल विकणारे,हॉटेल व्यावसायिक, पूर्वीच्या काळी आणि अजूनही काही भागात त्या त्या ठिकाणी निर्माण केली जाणारी लाकडाची खेळणी तयार करून विकणारे, स्वयंपाकायोग्य वस्तूंची खरेदी देखिल ग्रामीण भागातील लोक अजूनही यात्रेतून करीत असतात.अशा ह्या अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या ह्या यात्रा आणि परंपरा पुढे न्यायला हव्या.

            सर्व वाचकांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो.

 

 

  प्रसाद नातु,पुणे.                      

                    




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...