Skip to main content

विटामिन D ची कमतरता घातक

ब्लॉग नं.2025/15 3 दिनांक: 3 मे, 2025. मित्रांनो, सध्याच्या जीवनशैलीत व्हिटामीन डी ची कमतरता सामान्य झाली आहे.सतत टेन्शन येणे , डिप्रेशनमध्ये जाणे , कंबरदुखी , पाठदुखी किंवा मसल्स क्रॅम्प्स येणे ही लक्षणे दिसली तर तुमच्या शरीरात व्हिटामीन डी कमी आहे का , याची तपासणी करणे गरजेचे आहे. कारण व्हिटामीन- D ची कमतरता शरीराला आतून पोकळ बनवते ; यासाठी काय खायला हवे, हे आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. सविस्तर: व्हिटामीन डी का महत्त्वाचे ? व्हिटामीन डी केवळ हाडांसाठीच नाही,तर मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी च्या अहवालानुसार , या व्हिटामीनच्या अभावामुळे मानसिक स्थितीवर परिणाम होतो , आणि डिप्रेशन होण्याची शक्यता वाढते.जर तुम्हाला उन्हात जाणे शक्य नसेल , तर काही खाद्यपदार्थांच्या मदतीने तुम्ही व्हिटामीन डी ची पूर्तता करू शकता. तज्ञांच्या मते , व्हिटामीन डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.त्याआधी व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे,शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात.हे आपण पाहू या.     1. हाडांची समस्या: ...

सक्षम आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांची कपात

 Blog No. 2023/24 

Date,30th,  January 2023 . 

मित्रांनो, 

            परदेशांत आलेली मंदी आणि मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आलेली नोकरी कपात.ह्याच्या वार्ता आजकाल मोठ्या प्रमाणात ऐकायला येत असतांना एक गोष्ट काळजी लावणारी आहे. ती म्हणजे ही कपात करतांना एखादा कर्मचारी सक्षम आणि निष्ठावंत आहे.त्याला ही नोकरीतून कमी केले जात आहे.भारतात मंदी नाही आणि भारतात अशी परिस्थिति नसली तरी, परदेशातील घडणाऱ्या गोष्टींचे अंधानुकरण करीत,ते जे करीत असतात,त्या मागे काही उदात्त हेतु आहे.असे मानणाऱ्यांची खुळचट लोकांची संख्या आपल्या देशात कमी नाही.म्हणून काळजी वाटते.  

 Experience Quotient (EQ) देखिल महत्वाचा          

वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांच्या जागी तेवढ्या पगारात 2 ते 3 नवीन कर्मचारी ठेवता येतील,अशी ही कृती देखिल अशीच बिनडोक पणाची आहे. कारण intelligent quotient (IQ ) सोबत तेवढाच Experience Quotient (EQ) देखिल महत्वाचा आहे.विशेषतः जिथे decision making चा प्रश्न आहे. तिथे वरिष्ठ कर्मचारी असणे गरजेचे आहे.कारण त्यांच्या पाठीशी अनुभवाची शिदोरी असते.ती महत्वाची असते.

 सक्षम आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांवर होणारे दुष्परिणाम

            तर गोष्ट आहे सक्षम आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची.आधीच नव्या जगांत निष्ठा नावाची चीज फारशी कुठे उरली नाही.अशात कर्मचारी एखादी संस्था आपली मानून तिच्यावर निष्ठा ठेऊन काम करीत असेल.तर त्याच्यात कंपनी/संस्थे प्रति एक समर्पणाची वृत्ती म्हणा भावना म्हणा जागृत होते.अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यास कंपनीने त्याला,जे कर्मचारी कार्यक्षम आणि निष्ठावान नाहीत,अशा लोकांसोबत कंपनीतून कमी केले तर त्याच्यावर निश्चितपणे परिणाम होईल.त्याच्यावर होणाऱ्या परिणामांची यादी खाली प्रमाणे:-

1.त्या कर्मचाऱ्याच्या मनात नैराश्याच्या भावनेचा उदय.

2.नवीन कंपनीत तो कर्मचारी अलिप्तपणे काम करेल.आपली कंपनी समजून काम करणार नाही.

3.तो स्वतःहून कुठलेही काम न करता do as directed किंवा सांगकाम्या सारखा काम करेल. अर्थात जे काम सांगितले जाईल तेवढे काम करेल.

4. नवीन कंपनीत जास्तीची मेहेनत घेऊन कुठलेही काम करणार नाही.

5.त्याच्यातील झोकून देऊन काम करण्याची वृत्ती लोप पावेल.

6.ही कंपनी देखिल आपल्याला कमी करणार नाही ना असा एक विचार नेहमी त्याच्या मनात घोळत राहील ज्याचा परिणाम त्याच्या कार्यक्षमतेवर होईल.

7. कमजोर मनाचा व्यक्ती मानसिक रोगाला देखिल बळी पडू शकतो.

8. काम न करण्याची वृत्ती/भावना इतर कर्मचाऱ्यांमध्ये बळावत जाईल.

9.ह्याचा एकत्रित परिणाम म्हणजे हळूहळू समर्पण वृत्ती आणि निष्ठा लोप पावेल.

 खासगीकरणाला होणाऱ्या विरोधाचे कारण

मी ह्या गोष्टीचा संबंध राष्ट्रीयकृत बँका म्हणा इतर वित्तीय संस्था जसे एलआयसी, जनरल इन्शुरेंस क्षेत्रातील   खासगीकरणाशी जोडू पहातो. खासगीकरणाला विरोध हा प्रामुख्याने जॉब सेक्युर्टी राहील की नाही ह्या विचाराने अधिक होत आहे. कुठल्याही क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, समर्पणाची भावना ही जॉब सेक्युर्टी असेल तरच असते अशी धारणा ह्या क्षेत्रातील कर्मचाऱ्याची असेल तर त्यात चूक काही म्हणता येणार नाही.पण जर आपली काम न करण्याची वृत्ती सरकारी कंपनीत जोपासली जात असते म्हणून जर खासगीकरणाला विरोध असेल,  तर ते मात्र चुकीचे आहे.

एकंदरीत काय तर सक्षम आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना असू नये आणि काम न करणाऱ्याला काही शिक्षा नाही असा विचार असू नये.ह्याचा विचार मॅनेजमेंट विशेषतः एच.आर. विभाग ह्यांनी करायला हवा. हेच खरे.


प्रसाद नातु,पुणे.

 

                                                                                                         

Comments

  1. मी कॉर्पोरेट दिंडी या पुस्तकात याचा उहापोह केला आहे आणि उपाय सुचविला आहे.

    ReplyDelete
  2. ज्वलंत प्रश्न आहे

    ReplyDelete
  3. Very Nicely Explained Raja !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...