Skip to main content

विटामिन D ची कमतरता घातक

ब्लॉग नं.2025/15 3 दिनांक: 3 मे, 2025. मित्रांनो, सध्याच्या जीवनशैलीत व्हिटामीन डी ची कमतरता सामान्य झाली आहे.सतत टेन्शन येणे , डिप्रेशनमध्ये जाणे , कंबरदुखी , पाठदुखी किंवा मसल्स क्रॅम्प्स येणे ही लक्षणे दिसली तर तुमच्या शरीरात व्हिटामीन डी कमी आहे का , याची तपासणी करणे गरजेचे आहे. कारण व्हिटामीन- D ची कमतरता शरीराला आतून पोकळ बनवते ; यासाठी काय खायला हवे, हे आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. सविस्तर: व्हिटामीन डी का महत्त्वाचे ? व्हिटामीन डी केवळ हाडांसाठीच नाही,तर मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी च्या अहवालानुसार , या व्हिटामीनच्या अभावामुळे मानसिक स्थितीवर परिणाम होतो , आणि डिप्रेशन होण्याची शक्यता वाढते.जर तुम्हाला उन्हात जाणे शक्य नसेल , तर काही खाद्यपदार्थांच्या मदतीने तुम्ही व्हिटामीन डी ची पूर्तता करू शकता. तज्ञांच्या मते , व्हिटामीन डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.त्याआधी व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे,शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात.हे आपण पाहू या.     1. हाडांची समस्या: ...

आर्थिक साक्षरता म्हणजे काय आणि महत्व

Blog No. 2023/23 

Date,29th,  January 2023. 

मित्रांनो,  

            भारताची digitalisation  कडे मोठी झपाट्याने वाटचाल सुरु असतांना,काही गोष्टी ऐकायला मिळाल्या की,वाटते की त्या सोबत आर्थिक साक्षरतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.अधून मधून एखाद्याच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचे,एटीएम कार्ड ची सविस्तर माहिती विचारून अकाऊंट पूर्णपणे खाली केल्याचे,ऐकायला मिळते.बँकांकडून आणि रिजर्व बँकेकडून टी.व्ही.“जानकार बनिये सतर्क राहिये” अशी जाहिरात दाखविल्यानंतर लगेच बातम्यामधून कुणाचे तरी अकाऊंट हॅक झाले.पूर्ण पैसे काढून घेतले सारखी बातमी ही पहायला/ऐकायला  मिळते ही किती विडंबना आहे.अजूनही सुशिक्षित घरातील स्त्रिया ह्या एटीएम कार्ड वापर करीत नाहीत किंवा यूपीआयचा वापर करु शकत नाही. त्यांना रोख (कॅश) जवळ बाळगणे जास्त सोयीचे वाटते.          

 आर्थिक साक्षरता कां गरजेची    

आज ही बाब ब्लॉग साठी निवडण्याचे कारण असे की, माझ्या पावणे सहा वर्षाच्या नातवासाठी,मी जेम्स चॉकलेटचा बॉल मिळतो,तो त्याला विकत घेऊन दिला.त्यात एक स्क्रॅच कार्ड होते ते त्याने मला दिले आणि तो मला म्हणाला की आबा हे स्क्रॅच कार्ड मोबाइल वरुन स्कॅन केले,तर मोबाइलवर एक गेम डाउनलोड करता येईल.मी सहज प्रयत्न करून पाहिला. खरं तर मोबाईल त्याला द्यायचा नाही हे ठरलेले.त्यामुळे तो गेम डाउनलोड करण्यासाठी माझा जीमेल आयडी आणि पासवर्ड द्यावा लागणार होता.त्याला ते सांगितले तो म्हणाला,पेटीएम चा पासवर्ड मागतो आहे का? तो देऊ नका तो तुमचे सगळे पैसे काढून घेईल.त्याला आज ह्या लहान वयात माहित झाले आहे.अशा अशा लहान मुलांना आतापासून जर आर्थिक व्यवहाराचे ज्ञान झाले,तर भविष्यात ते त्या मुलाला आणि देशाला फायदेशीर आहे.

आर्थिक साक्षरता म्हणजे काय आणि महत्व       

आर्थिक साक्षरता म्हणजे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन, बजेट आणि गुंतवणूक यासह विविध आर्थिक कौशल्ये समजून घेण्याची आणि प्रभावीपणे वापरण्याची क्षमता.आर्थिक साक्षरतेचा अर्थ हा तुमच्या पैशाशी असलेल्या नातेसंबंधाचा पाया आहे आणि तो शिकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.सोप्या शब्दात आर्थिक साक्षरता म्हणजे पैश्याचा योग्य आणि सुरक्षित उपयोग किंवा वापर. 

आर्थिक साक्षरता महत्व आणि उपयोग

    तुम्ही आर्थिक साक्षर असाल तर,तुमच्या मासिक उत्पन्नाचे बजेट तुम्ही अधिक परिणामकारक पद्धतीने करु शकता.आज मासिक उत्पन्नाचे बजेट करतांना मुलांचे शिक्षण,उच्च शिक्षण, त्यांना प्रस्थापित करून देणे,त्यांचे लग्न करून देण्यासाठीचे नियोजन आणि स्वतःच्या सेवनिवृत्ती पश्चात जीवनासाठीचे नियोजन ह्याचा समावेश व्हायला हवा.

    पर्यटन हा देखिल आज जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.धकाधकीच्या जीवनात चार क्षण निवांत घालवता यावे यासाठी पर्यटन हवहवेसे वाटते.त्यासाठी खर्च बराच होतो.त्याचे नियोजनही मासिक उत्पन्नाचे बजेट बनवितांना झाले पाहिजे.                   

    आज काल जीवनात बँकाकडून अथवा वित्तीय संस्थांकडून विविध कारणांसाठी कर्ज घेणे अनिवार्य झाले आहे.त्या कर्जासाठी लागणारे मार्जिन,त्या कर्जाचे हफ्ते वेळेवर परत करण्यासंबंधीचे नियोजन आर्थिक साक्षर असलेल्या व्यक्तीस कठीण जात नाही.ही साक्षरता आपल्या देशांत अजिबात नाही अशातला भाग नाही.पण जग बदलत आहे आणि ह्या बदलांचा योग्य पद्धतीने सामना करण्यासाठी नविन पिढी तयार करणे गरजेचे आहे.

     बँकेचे व्यवहार अजूनही लोक व्यवस्थितपणे करु शकत नाहीत आणि मग बँकेत योग्य सेवा मिळतं नाही वगैरे ओरड सुरु होते.ह्याला कारण असे की,अजूनही बऱ्याच मुलांना बँकेची पहिली ओळख ही शैक्षणिक कर्ज घेतले तर होते किंवा बँकेत पगार जमा होणार म्हणून अकाऊंट उघडावे लागते,त्या वेळेस होते.जे लोक आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत ते सर्वसाधारणपणे आर्थिक फसवणुकीला कमी बळी पडतात.

 आर्थिक साक्षरता कशी वाढेल

त्यामुळे आर्थिक साक्षरता ही अगदी प्राथमिक शाळांमधून शिकवायला सुरु करणे गरजेची आहे.त्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात त्याचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याचे नुकतेच वाचले.पण तुम्हीही आपल्या मुलांना,नातवांना आर्थिक साक्षर करण्यासाठी प्रयत्न सुरु करा. यासाठी त्यांना पैश्याची ओळख करून द्यायला हवी.कारण आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे.         

 

 

प्रसाद नातु, पुणे 

Comments

  1. योग्य माहिती आणि खरंय बँक च काम काय हे अजून जास्त लोकांना माहिती नाही मला ही पूर्ण माहिती नाही
    पण आजकालची पिढी फार चतुर चाणाक्ष आहेत आपल्या देशाचे पुढचे भविष्य खरंच उज्वल आहे
    तुमच्या सारखे मार्गदर्शक असल्याने त्यांचे ही

    ReplyDelete
  2. आर्थिक साक्षरते संबंधीचा लेख खूप छान आहे.
    अनिल जोगळेकर

    ReplyDelete
  3. उपयोगी माहिती
    बैंकिंग साक्षरता सर्वाना आवश्यक🙏
    रा रा जोशी वर्धा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...