Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

कविता संग्रह वाचन






कविता संग्रह आजकाल  कुणी वाचत की नाही  माहित नाही.  पण मी आज वाचून काढला. ज्याचे नांव आहे "तुझे गीत गाण्यासाठी". सुप्रसिध्द कवी मंगेश पाडगांवकर यांचा हा कविता संग्रह. कवितेचे रूप ,स्वरूप आणि अंतरंग वेगवेगळे असते.  या कवितासंग्रहात एकूण 104 कविता आहेत. यातील 30 कवितांना माझ्या माहिती प्रमाणे स्वरसाज चढवून त्यांचे गाण्यांत रूपांतर करण्यांत आले आहे. ही गाणी बहुतेक सर्वांना माहित आहे. 
"तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे या" गीताने त्यांनी कविता संग्रहाची सुरूवात केली आहे. हे गाणे सुधीर फडकेंनी अजरामर केले. तर "माझे जीवन गाणे व्यथा असो आनंद असू दे" या पं. जितेंद्र अभिषेकीनी गाईलेल्या गीताने समारोप. पाडगांवकरांचे वैशिष्ठ हे की त्यांनी प्रेम गीत असो, विराणी असो. भक्तीगीत वा गझल वा युगुल गीत असो  सर्वाना न्याय दिला. कवितेच्या कुठल्याही प्रकारात त्यांचे शब्द कमी पडले नाहीत यातच त्यांचे मोठेपण जाणवते. या कविता संग्रहात "श्रावणांत घननिळा मध्ये एका कडव्यांत पाडगांवकर म्हणतात 'गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा' किंवा 'लाजून हासणे अन् हासून ते पहाणे' या गीतातील 'हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, र्हदयांत बाण जाता त्यालाच दुखः ठावे'. "शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी" मधील  'लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा, अंतरीच्या स्पंदनाने अन थरारे ही हवा' असो वा "या जन्मावर या जगण्यावर शतदः प्रेम करावे" मधील 'रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतुंचे सहा सोहळे येथे भान हरावे' तसेच "नीज माझ्या नंदलाला ,नंदलाला रे" मध्ये 'सावल्यांची तीट गाली चांदण्याला नीज आली ,रातराणीच्या फुलांचा गंध आला, नंदलाला रे. ह्या अशा कल्पना केवळ कवीच करू शकतो. "धरिला वृथा छंद" मधे पाडगांवकर विचारतात 'नव्हतेच जर फुल कोठून मकरंद' तर "दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे" मधे पाडगांवकर लिहीतात 'शब्द फुले वेचित रचला चांद तु जुईचा म्हणालीस, चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा ,फुलातल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे.' 
पाडगांवकरांनी "दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे" मधे 'मोजावी नभाची खोली घालावी शपथ ओली ,श्वासात चांदणे भरायचे' म्हटले आहे.
"उंबरठ्यावर माप उलटुनी तुझ्या दारी मी आली" या कवितेत म्हटलयं 'आज फुले हसली माझ्याशी , सुख आले फुलुनी हृदयासी, पाश जुने तोडूनी तुझ्यास्तव प्रथमच आज निघाले.'
 अशा प्रकारे अभंग, गझल, भावगीत, या सगळ्याच काव्य प्रकारांना त्यांनी न्याय दिला आहे.


                                            प्रसाद नातु

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...