ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025. मित्रांनो, डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...
कविता संग्रह आजकाल कुणी वाचत की नाही माहित नाही. पण मी आज वाचून काढला. ज्याचे नांव आहे "तुझे गीत गाण्यासाठी". सुप्रसिध्द कवी मंगेश पाडगांवकर यांचा हा कविता संग्रह. कवितेचे रूप ,स्वरूप आणि अंतरंग वेगवेगळे असते. या कवितासंग्रहात एकूण 104 कविता आहेत. यातील 30 कवितांना माझ्या माहिती प्रमाणे स्वरसाज चढवून त्यांचे गाण्यांत रूपांतर करण्यांत आले आहे. ही गाणी बहुतेक सर्वांना माहित आहे.
"तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे या" गीताने त्यांनी कविता संग्रहाची सुरूवात केली आहे. हे गाणे सुधीर फडकेंनी अजरामर केले. तर "माझे जीवन गाणे व्यथा असो आनंद असू दे" या पं. जितेंद्र अभिषेकीनी गाईलेल्या गीताने समारोप. पाडगांवकरांचे वैशिष्ठ हे की त्यांनी प्रेम गीत असो, विराणी असो. भक्तीगीत वा गझल वा युगुल गीत असो सर्वाना न्याय दिला. कवितेच्या कुठल्याही प्रकारात त्यांचे शब्द कमी पडले नाहीत यातच त्यांचे मोठेपण जाणवते. या कविता संग्रहात "श्रावणांत घननिळा मध्ये एका कडव्यांत पाडगांवकर म्हणतात 'गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा' किंवा 'लाजून हासणे अन् हासून ते पहाणे' या गीतातील 'हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, र्हदयांत बाण जाता त्यालाच दुखः ठावे'. "शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी" मधील 'लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा, अंतरीच्या स्पंदनाने अन थरारे ही हवा' असो वा "या जन्मावर या जगण्यावर शतदः प्रेम करावे" मधील 'रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतुंचे सहा सोहळे येथे भान हरावे' तसेच "नीज माझ्या नंदलाला ,नंदलाला रे" मध्ये 'सावल्यांची तीट गाली चांदण्याला नीज आली ,रातराणीच्या फुलांचा गंध आला, नंदलाला रे. ह्या अशा कल्पना केवळ कवीच करू शकतो. "धरिला वृथा छंद" मधे पाडगांवकर विचारतात 'नव्हतेच जर फुल कोठून मकरंद' तर "दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे" मधे पाडगांवकर लिहीतात 'शब्द फुले वेचित रचला चांद तु जुईचा म्हणालीस, चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा ,फुलातल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे.'
पाडगांवकरांनी "दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे" मधे 'मोजावी नभाची खोली घालावी शपथ ओली ,श्वासात चांदणे भरायचे' म्हटले आहे.
"उंबरठ्यावर माप उलटुनी तुझ्या दारी मी आली" या कवितेत म्हटलयं 'आज फुले हसली माझ्याशी , सुख आले फुलुनी हृदयासी, पाश जुने तोडूनी तुझ्यास्तव प्रथमच आज निघाले.'
अशा प्रकारे अभंग, गझल, भावगीत, या सगळ्याच काव्य प्रकारांना त्यांनी न्याय दिला आहे.
प्रसाद नातु
खुप छान.
ReplyDelete