Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

अमिताभचे आजारपण आणि मी






आजकाल फारसा मी न्युज चॅनेल पहात नाही. आधी न्यूज चॅनेल यासाठी पहात होतो की रोज जगभरांत ज्या घडामोडी होतात त्या आपल्याला माहित असाव्यात. आपण  अपडेट असावं. पण आजकाल एक तासाच्या अवधीत 40 मिनिटे  जाहिराती आणि उरलेल्या वेळांत बातम्या असतात. त्या देखिल वारंवार त्याच त्या दाखविल्या जातात.  पण रविवारी अचानक ए बी पी माझा बघितले आणि अमिताभ बच्चन यांना कोरोना लागण झाल्याची बातमी ऐकायला मिळाली. पाठोपाठ अभिषेक ,  ऐश्वर्या आणि आराध्याला ही संसर्ग झाल्याची बातमी आली. सोमवारी दिवसभर तिच बातमी फिरवत होते. त्यांत अमिताभ संकटातून आजपर्यंत कसा बाहेर आला. वय 77 आहे. लिव्हर 75% च काम करतयं. त्यांच्या एरियांत कोरोनाचा  किती  प्रभाव आहे. एवढच नाही तर त्या एरियात किती लोक मृत्युमुखी पडलेत. काय चाललंय काही  कळत नाही. माणसं या थराला कशी जाऊ शकतात. दुसर्या दिवशी सोशल मिडीयावर बेगळेच काही . म्हणे नानावटीला उभारी देण्याचा अमिताभचा प्रयत्न आहे. त्यासोबत डबा द्यायला जया जाणार की रेखा आणि असल्या पोस्ट यायला सुरूवात झाली. 
कुठे चाललो आहोत आपण. परिस्थिती किती गंभीर आहे. रोज होणार्या बाधितांचा 10000 चा आकडा 25000 च्या वर पोहोचलाय. म्हणून कपाळाला हात लावून , हतबल होऊन बसायचं अस नाही म्हणत मी. पण विचार करायची पध्दत  बदलायली हवीय. 
अमिताभ बच्चनच्या गत आयुष्यात काय झालंय याचा विचार करायची  गरज नाही वाटत मला. पण सिनीयर सिटीझन झाल्यापासून अमिताभचे आयुष्य जगणं . अतिशय शिस्तबध्द असेच आहे. हे 25 टक्के  लिव्हर वर जगणार्या , पण तरीही एवढं एनर्जीटिक असणार्या ,  क्षय रोगाचा प्रादुर्भाव होऊन गेलेल्या माणसाच्या जीवन शैली वरून सहज लक्षांत येण्यासारखे आहे. एका आलिशान बंगल्यांत वास्तव्य , पैशाला काही कमी नाही. दिवसातून दहा वेळा सॅनिटाईज करता येईल एवढा पैसा आणि मनुष्यबळ. जो व्यक्ती कोरोना पासून बचाव कसा करावा हे लोकांना समजावतो. एवढच नाही तर आरोग्य सेतू मध्ये ज्याचा व्हिडीओ आहे. असा व्यक्ती बेफिकीर पणे वागला असेल, या गोष्टी वर माझा तरी विश्वास नाही. असा व्यक्ति जर कोविडने ग्रस्त होत असेल तर ते निश्चितपणे विचार करण्यासारखे आहे. विचार करायला लावणारे आहे आणि कोरोनाची दाहकता दर्शविणारे आहेत. आपण आपली अधिक काळजी घ्यायला हवी.
हा आपल्या प्रत्येकाच्या जीवन मरणाशी निगडित असा मुद्दा आहे. आपण त्यावर जोक्स करतोय. आपण हसायचं नाही जोक्स् करायचे नाही अस कुठे आहे. फक्त एवढ्या गंभीर मुद्द्यावर  आपण तेवढ्याच गंभीरपणे   प्रतिक्रिया द्यायला हवी. एवढचं म्हणणं आहे. कदाचित सर्वाना नाहीही पटणार. पण हे गृहित धरूनच पोस्ट करतोय.


Comments

  1. Very true. At this moment, the entire mankind seems to be under Corona grip. At this moment, only precautionary steps are in the hands of mankind. As you rightly said the veteran actor must have definitely taken due precautions. Still he couldn't escape means that we are yet to resolve the corona mystery. We can only pray the advent of successful corona vaccine or treatment. Definitely this pandemic has taught humankind a great lesson. Excuse for not using Marathi as the google linguistic keyboard not working on this mobile.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...