Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

अमिताभचे आजारपण आणि मी






आजकाल फारसा मी न्युज चॅनेल पहात नाही. आधी न्यूज चॅनेल यासाठी पहात होतो की रोज जगभरांत ज्या घडामोडी होतात त्या आपल्याला माहित असाव्यात. आपण  अपडेट असावं. पण आजकाल एक तासाच्या अवधीत 40 मिनिटे  जाहिराती आणि उरलेल्या वेळांत बातम्या असतात. त्या देखिल वारंवार त्याच त्या दाखविल्या जातात.  पण रविवारी अचानक ए बी पी माझा बघितले आणि अमिताभ बच्चन यांना कोरोना लागण झाल्याची बातमी ऐकायला मिळाली. पाठोपाठ अभिषेक ,  ऐश्वर्या आणि आराध्याला ही संसर्ग झाल्याची बातमी आली. सोमवारी दिवसभर तिच बातमी फिरवत होते. त्यांत अमिताभ संकटातून आजपर्यंत कसा बाहेर आला. वय 77 आहे. लिव्हर 75% च काम करतयं. त्यांच्या एरियांत कोरोनाचा  किती  प्रभाव आहे. एवढच नाही तर त्या एरियात किती लोक मृत्युमुखी पडलेत. काय चाललंय काही  कळत नाही. माणसं या थराला कशी जाऊ शकतात. दुसर्या दिवशी सोशल मिडीयावर बेगळेच काही . म्हणे नानावटीला उभारी देण्याचा अमिताभचा प्रयत्न आहे. त्यासोबत डबा द्यायला जया जाणार की रेखा आणि असल्या पोस्ट यायला सुरूवात झाली. 
कुठे चाललो आहोत आपण. परिस्थिती किती गंभीर आहे. रोज होणार्या बाधितांचा 10000 चा आकडा 25000 च्या वर पोहोचलाय. म्हणून कपाळाला हात लावून , हतबल होऊन बसायचं अस नाही म्हणत मी. पण विचार करायची पध्दत  बदलायली हवीय. 
अमिताभ बच्चनच्या गत आयुष्यात काय झालंय याचा विचार करायची  गरज नाही वाटत मला. पण सिनीयर सिटीझन झाल्यापासून अमिताभचे आयुष्य जगणं . अतिशय शिस्तबध्द असेच आहे. हे 25 टक्के  लिव्हर वर जगणार्या , पण तरीही एवढं एनर्जीटिक असणार्या ,  क्षय रोगाचा प्रादुर्भाव होऊन गेलेल्या माणसाच्या जीवन शैली वरून सहज लक्षांत येण्यासारखे आहे. एका आलिशान बंगल्यांत वास्तव्य , पैशाला काही कमी नाही. दिवसातून दहा वेळा सॅनिटाईज करता येईल एवढा पैसा आणि मनुष्यबळ. जो व्यक्ती कोरोना पासून बचाव कसा करावा हे लोकांना समजावतो. एवढच नाही तर आरोग्य सेतू मध्ये ज्याचा व्हिडीओ आहे. असा व्यक्ती बेफिकीर पणे वागला असेल, या गोष्टी वर माझा तरी विश्वास नाही. असा व्यक्ति जर कोविडने ग्रस्त होत असेल तर ते निश्चितपणे विचार करण्यासारखे आहे. विचार करायला लावणारे आहे आणि कोरोनाची दाहकता दर्शविणारे आहेत. आपण आपली अधिक काळजी घ्यायला हवी.
हा आपल्या प्रत्येकाच्या जीवन मरणाशी निगडित असा मुद्दा आहे. आपण त्यावर जोक्स करतोय. आपण हसायचं नाही जोक्स् करायचे नाही अस कुठे आहे. फक्त एवढ्या गंभीर मुद्द्यावर  आपण तेवढ्याच गंभीरपणे   प्रतिक्रिया द्यायला हवी. एवढचं म्हणणं आहे. कदाचित सर्वाना नाहीही पटणार. पण हे गृहित धरूनच पोस्ट करतोय.


Comments

  1. Very true. At this moment, the entire mankind seems to be under Corona grip. At this moment, only precautionary steps are in the hands of mankind. As you rightly said the veteran actor must have definitely taken due precautions. Still he couldn't escape means that we are yet to resolve the corona mystery. We can only pray the advent of successful corona vaccine or treatment. Definitely this pandemic has taught humankind a great lesson. Excuse for not using Marathi as the google linguistic keyboard not working on this mobile.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...