ब्लॉग नं. 2026/177 दिनांक: 26 जून,2026. मित्रांनो, सत्य , संस्कार आणि नात्यांचा घसरता स्तर: लोहगड दुर्घटनेतून समोर आलेले भीषण वास्तव पूर्वीच्या काळी,म्हणजे पुराणात देव,राक्षस आणि मानव यांचे पृथ्वीवर वास्तव्य होते.आज काल फक्त मानव बघायला मिळतात.मधून मधून आपल्या चांगुलपणाने वागणाऱ्या काही लोकांत आपल्याला देवाचे दर्शन होत असतं.आणि राक्षस, ते ही दिसतात, आजकाल मोठ्या प्रमाणात दिसताहेत.कारण राक्षस ही जमात नसून,ती एक प्रवृत्ती आहे.आणि अशा प्रवृत्ती वेळोवेळी आपले अस्तित्व दाखवून देतात. नुकतीच पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून , एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.केतन अग्रवाल नावाचा एक तरुण किल्ल्यावरून , तब्बल 450 मीटर खोल दरीत कोसळला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.सुरुवातीला हा अपघात वाटत असला , तरी पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर , जे सत्य समोर येत आहे , ते अत्यंत धक्कादायक आणि विचार करायला लावणारे आहे.केतनची होणारी मंगेतर सिय...
ब्लॉग नं. 2026/1 72. दिनांक: 21 जून, 2026. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...