ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...
ब्लॉग नं: 2025/173. दिनांक: 23 जून , 2025. मित्रांनो , आपल्याला ठराविक अवधि नंतर हेल्थ रिपोर्ट घ्यावे लागतात.या हेल्थ रिपोर्ट रक्ताचे sample घेतांना दंडात सुई टोचून रक्त घेतले जाते.रक्त घेणाऱ्याचा हात हलका असेल तर, त्याचा त्रास होत नाही.हात जड असल्यास वेदना होतात. काही वेळा नस न सापडल्याने तो ट्रायल आणि एरर पद्धतीने विविध ठिकाणी सुई डोकहून रक्त घेण्याचा प्रयत्न करतो,हे सारं त्रासदायक असतं,त्यामुळे रक्त तपासणीसाठी रुग्णालयात जाणे, म्हणजे अनेकांसाठी भीतीदायक अनुभव ठरतो. पण जर रक्त काढण्याची गरजच उरली नाही , तर ? हो आजचा ब्लॉग या विषयावर आधारित आहे. सविस्तर: हैदराबादच्या निलोफर हॉस्पिटलने,भारतातील पहिले एआय-आधारित , नॉन-इनवेसिव्ह म्हणजे सुई न टोचता,रक्त निदान साधन तयार केले आहे. ‘अमृत स्वस्थ भारत’ नावाचा हा नवा तंत्रज्ञान चमत्कार,केवळ एका सेल्फीद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी करू शकतो. तंत्रज्ञान कसे कार्य करते ? या प्रक्रियेचा आधार म्हणजे फोटोप्लेथिस्मोग्राफी ( PPG) तंत्रज्ञान.सोप्या भाषेत , हे तंत्र त्...