Skip to main content

Posts

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

STEM क्षेत्रामध्ये महिलांची संख्या 40%

  Blog No. 202 4 /   053.    Date:22 nd , March 202 4 .   मित्रांनो,               राजकारण , मीडिया , नोकरशाही , क्रीडा आणि STEM म्हणजे विज्ञान , तंत्रज्ञान , अभियांत्रिकी आणि गणित) यांसारख्या तथाकथित पुरुषप्रधान क्षेत्रांमध्ये अधिकाधिक स्त्रिया प्रवेश करत्या झाल्या आहेत आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,त्यामुळे भारतीय कार्यस्थळातील त्यांच्या संख्येत लक्षणीय बदल होत आहेत.यावर आहे आजचा ब्लॉग.   सविस्तर इतक्यात RCB संघातील महिला क्रिकेटपटूंचा नुकताच झालेला विजय असो किंवा चित्रपटांमधील तिच्या चांगल्या कामासाठी महिला दिग्दर्शिका-विजेता पुरस्कार असो , समाजाच्या आणि राष्ट्राच्या वाढीसाठी योगदान देताना महिला रूढी आणि स्वतःच्या मर्यादांवर मात करत असल्याचे आपण पाहत आहोत.   STEM क्षेत्रामध्ये महिलांची संख्या 40% STEM म्हणजेच विज्ञान , तंत्रज्ञान , अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 40% एवढी झाली आहे.भारतासाठी हा एक जागतिक विक्रम आह...

जम्मू आणि काश्मीर बदलते आहे.

  Blog No. 202 4 /   052.    Date:20 th , March 202 4 .   मित्रांनो,             भारत सरकारने 2019 मधे कलम 370 हटविले. त्या वेळेस विरोधी पक्ष आणि अनेक संघटनांनी याचा विरोध केला होता. कलम 370 ने जम्मू आणि काश्मीर राज्याला भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळा दर्जा दिलेला होता.भारतीय संघराज्यात केलेले कायदे जम्मू आणि काश्मीरला लागू होत नव्हते.भारतातील कुठल्याही व्यक्तीस या राज्यात स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार नव्हता.एक प्रकारे ते एक वेगळं राष्ट्र असल्यासारखे होते.कलम 370 हटविल्यानंतर खऱ्या अर्थाने जम्मू आणि काश्मीर भारतात विलीन झाले. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या माजी नेत्या शेहला रशीद यांची नुकत्याच CNN-News 18 च्या रायझिंग भारत समिट या कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली,त्या संबंधात लिहिण्यासाठी आज हा दूसरा ब्लॉग.   सविस्तर जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या माजी नेत्या शेहला रशीद यांची 19 मार्च रोजी CNN-News 18 च्या रायझिंग भारत समिट या कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली. या कार्यक्रमात तिने...

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) दोषयुक्त आहे कां?

Blog No. 202 4 /   051.    Date:20 th , March 202 4 .   मित्रांनो,             निवडणुकीचे निकाल मनाप्रमाणे लागले नाहीत,की दोष हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) वर टाकून राजकीय पक्ष मोकळे होत असतात.पूर्वीसारखी पक्षाची कार्यकारिणी बसून निकालाचे आत्मपरीक्षण वगैरे गोष्टींना अर्थ नसल्यासारखे झाले आहे. या निवडणुकीच्या निकालाच्या आत्मपरीक्षणात आपण कां हरलो,आपलं कुठे चुकलं,पुढील निवडणुकीत काय सुधार करायला हवा,या गोष्टीचा खल होत असे.आजकाल इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनला दोष देऊन मोकळे व्हायचे आणि पुढच्या वेळेस पुन्हा हारायचे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची संपूर्ण माहिती देणारा हा ब्लॉग आज मुद्दाम देत आहे. कारण निवडणुका आता जवळ आल्यात.   सविस्तर ईव्हीएम म्हणजे काय ?             इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हे मत नोंदवण्याचे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे,ज्यामध्ये दोन युनिट्स असतात - एक कंट्रोल युनिट आणि एक बॅलेटिंग युनिट.केरळच्या 70- परूर विधानसभ...

स्त्रियांसाठी हार्मोनल बॅलन्सिंग महत्वाचे

  Blog No. 202 4 /   050.    Date: 18 th , March 202 4 .   मित्रांनो,             माणसाचा सगळ्यात मोठा शिक्षक जर कुणी असेल तर आपलं जिवन.स्वभावाला औषध नाही असं म्हणतात. पण मला नाही वाटतं असं काही असतं. म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो.मी अविवाहित असतांना नोकरीत माझ्या महिला साथीदारांचे लवकर घरी निघून जाणे किंवा फलाना काऊंटर हेवी आहे,तो तिला नको. तिला सोपं काऊंटर देऊ वगैरे आमच्या बॉसने म्हटलं की माझं डोकं तापत असे.मी अगदी समान हक्क हवेत तर जबाबदारी समान हवी असे म्हणत असे.अर्थात कारणही होतं,माझी आई मृत्यु शय्येवर होती पण माझी ट्रान्सफर होत नव्हती.माझ्या पेक्षा जूनियर स्त्री कर्मचाऱ्यांच्या ट्रान्सफर माझ्या आधी होत होत्या.असो.पण हळूहळू मला जाणवायला लागलं की नाही,महिलांना काही सवलती द्याव्या लागतात.कारण स्त्री आणि पुरुष यांच्यात जो शारीरिक फरक आहे,त्यामुळे स्त्रीच्या शरीराला अधिक त्रास भोगावा लागतो.आज हा ब्लॉग अशा एका त्रासावर, हार्मोनल असंतुलनवर आहे.   सविस्तर     ...

केप टाऊन आणि बंगळुरू, धडा घ्यायला हवा

  Blog No. 202 4 /   049.    Date: 17 th , March 202 4 .   मित्रांनो,             काल दोन बातम्या वाचनांत आल्या,ज्या विचार प्रवर्तक तर होत्या पण चिंताजनक देखिल होत्या. पहिली बातमी ही की आपल्या देशातील बंगळुरू हे पाण्याच्या संकटाचा सामना करत आहे आणि दुसरी आहे दक्षिण आफ्रिकेची राजधानी “केपटाऊन” हे 14 एप्रिल नंतर जगातील पहिले पाणी नसलेले शहर म्हणून घोषित करण्यात येणार आहे.मित्रांनो,आपल्याला “जे मुबलक प्रमाणात मिळत असतं,त्याचं किंवा त्याला कधीच मूल्य नसतं” हा अर्थशास्त्रीय नियम जरी खरा असला तरी,पाण्याच्या बाबतीत आपण त्याला अपवाद करायला हवं.पाण्याला मोल देणे आपल्याला शिकावच लागेल.कारण ते जर दिलं नाही तर,आज *केपटाऊन*चं झालं ते आपल्या शहराचं व्हायला वेळ लागणार नाही.   सविस्तर             काही वर्षापूर्वी मी दक्षिण आफ्रिकेची राजधानी “केपटाऊन” बद्दल जरूर ऐकलं होतं,की तिथे लोकांना पाण्याचा तुडवडा जाणवतोय.पण आता ती बातमी येऊन ठेपली आहे,ज्या बाबत काही व...