Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

एक अनोखा फाॅरेस्ट मॅन



ब्लाॅग नं.2025/249.
दिनांकः 7 सप्टेंबर, 2025.


मित्रांनो,

 

एका माणसाने घडवलेले जंगल – जादव ‘मोलाई’ पायेंग यांची अनोखी कहाणी

कधी कधी एकच माणूस इतिहास घडवतो. आपल्या अढळ इच्छाशक्तीने आणि साध्या कृतीने तो संपूर्ण जगासाठी प्रेरणा बनतो.आजच्या ब्लॉगमध्ये वाचू या,आसाममधील जादव ‘मोलाई’ पायेंग यांची कथा ही अशाच एका अपूर्व कार्यकर्त्याची आहे.

सविस्तर:

मृत्यूच्या दृश्यातून जन्माला आलेली जिद्द

सुमारे 35 वर्षांपूर्वी,अवघ्या 16 वर्षांच्या जादवने एक हृदयद्रावक दृश्य पाहिले.नदीकिनारी हजारो प्राण्यांचे मृतदेह विखुरलेले होते.पुरापासून वाचण्यासाठी झाडांशिवाय आसरा न मिळाल्याने,त्या निरपराध प्राण्यांचा शोकांत मृत्यू झाला होता.शेकडो मृत सापांचे, हरणांचे, रानडुकरांचे आणि इतर प्राण्यांचे निर्जीव डोळे जादवच्या मनावर कोरले गेले.त्या रात्री जादव झोपू शकला नाही. गावातील एका वृद्धाने सांगितलेले शब्द त्याच्या मनात ठसले –

"जंगल नसले, तर प्राणी कुठे जातील? त्यांना अन्न कुठे मिळेल?"याच क्षणी त्याने प्राण्यांसाठी जंगल उभारण्याची प्रतिज्ञा केली.

जंगल घडवणारा एकटा माणूसः

फक्त 50 बिया आणि 25 बांबूंची रोपे घेऊन,जादव नदीकाठावर पोहोचला.दिवसेंदिवस तो सायकलने 5 किमी प्रवास करत असे,नदी ओलांडून दुसऱ्या बाजूला रोपे लावून पुन्हा घरी परतत असे. वर्षानुवर्षे, पावसाळा-उन्हाळा-थंडी यांची पर्वा न करता ही साधना सुरू राहिली.आज त्या प्रयत्नांचे फलस्वरूप म्हणजे 1360 एकरांवर पसरलेले दाट जंगल – मोलाई फॉरेस्ट.

प्राण्यांसाठी सुरक्षित आसराः

या जंगलात आज बंगाल वाघ, 150 हत्ती, गेंडे, 100 हून अधिक हरणे, रानडुक्कर, साप आणि असंख्य पक्षी व वन्य प्राणी आनंदाने वावरतात. हे जंगल फणस, साग, साल, गुलमोहर, आंबा, जांभूळ, सीताफळ, अननस, बांबू, औषधी वनस्पती अशा विविध झाडांनी समृद्ध आहे.

ओळख न मिळालेला हिरवा योद्धाः

विस्मयकारक बाब म्हणजे,हे अद्भुत काम करणारा हा साधक 2010 पर्यंत देशाला माहितच नव्हता. वन्य छायाचित्रकार जीतू कलिता यांनी बनवलेल्या “द मोलाई फॉरेस्ट” या माहितीपटातून,जगभर त्यांची ओळख झाली.त्यानंतर आरती श्रीवास्तव यांचा “फॉरेस्टिंग लाइफ” आणि “फॉरेस्ट मॅन” या चित्रपटांनी त्यांची कीर्ती पसरवली.

पद्मश्री पुरस्काराने गौरवलेलेः

सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत न मिळालेल्या या कर्मयोग्याला,अखेर 2020 मध्ये देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार “पद्मश्री” देऊन सन्मानित करण्यात आले. तरीही जादव पायेंग आजही आसाममधील एका छोट्याशा बांबूच्या झोपडीत राहतात आणि त्यांच्या जुन्या साधनेत, झाडे लावण्यात मग्न आहेत.

त्यांचा संदेशः

जादव म्हणतात –

"तुम्ही जंगले नष्ट करता, तर जंगले तुम्हाला नष्ट करतील."

समारोपः

त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की सरकारी योजना, कोटींचा खर्च किंवा मोठे प्रकल्प यापेक्षा एका व्यक्तीची निष्ठा आणि सातत्य अधिक परिणामकारक असते.जादव  ‘मोलाई’ पायेंग यांची कहाणी ही फक्त जंगल घडवण्याची नाही, तर ती एका माणसाच्या करुणेची, जिद्दीची आणि नि:स्वार्थ सेवाभावाची आहे.माणूस ठरविलं तर काय काय करू शकतो,याचं हे उदाहरण आहे.    

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 🏻 लेखक: प्रसाद नातु

(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली आपण. धन्यवाद साहेब

    ReplyDelete
  2. महत्वपूर्ण माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...