Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

सतत ग्लुकोज मॉनिटरिंगचा हैदोस-अवश्य वाचा

 ब्लॉग नं. 2025/349.

दिनांक: 13 डिसेंबर, 2025. 

मित्रांनो,

            जे नेहमी विविध रक्तचाचण्या करीत असतात,त्यांना कल्पना आहे की,त्यांच्या शरीरातून रक्त काढून ते तपासणीसाठी घेऊन जातात, किंवा ज्यांना मधुमेह आहे,त्यांच्याकडे ग्लुकोमिटर असतं,ते बोटाला टोचून रक्त काढतात आणि ते ग्लुकोमिटरला जोडलेल्या स्ट्रिपवर ठेवतात आणि आणि ग्लुकोमिटर त्यांची शुगर लेवल दर्शविते. पण ज्यांना वारंवार बोटाला टोचून घेणे पटत नाही,आवडतं नाही, ते  CGM म्हणजे Continuous Glucose Monitoring System किंवा सतत ग्लुकोज मॉनिटरिंग वापरतात.पण या CGM ने जो हैदोस अमेरिकेत आणि जगात घातला आहे. त्यापेक्षा बोटाला टोचून घेणे बरे असे म्हणायची वेळ,अमेरिकेत ज्यांनी हे CGM लावून घेतले आहे,त्यांच्यावर आली आहे. आजचा ब्लॉग आहे,याच विषयावर.

सविस्तर:

            अमेरिकेत नेमके काय झाले हे सांगायच्या आधी,आपण CGM म्हणजे काय आणि ते नेमके काय काम करते ते जाणून घेऊ.

📟 सतत ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) म्हणजे काय?

CGM म्हणजे Continuous Glucose Monitoring System हे उपकरण आहे,ज्यात त्वचेखाली एक छोटा सेन्सर बसवून, 24 तास रक्तातील साखरेची पातळी मोजते.ही माहिती हे उपकरण,मोबाईल किंवा इतर उपकरणावर पाठवते. यामुळे, वारंवार बोट टोचण्याची गरज भासत नाही आणि रुग्णांना रिअल टाइममध्ये साखरेचा चढ-उतार दिसतो. परंतु जर हे तंत्रज्ञानच चुकीचे असेल, तर ते जीवघेणे ठरू शकते.

            FDA च्या माहितीनुसार, FreeStyle Libre 3 आणि FreeStyle Libre 3 Plus हे ग्लुकोज सेन्सर्स चुकीचे रक्तातील कमी साखरेचे रीडिंग दाखवत आहेत.यामुळे रुग्ण, गरजेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट्स घेतात, इन्सुलिन डोस उशिरा घेतात किंवा वगळतात आणि चुकीचे वैद्यकीय निर्णय घेतात. FDA स्पष्ट शब्दांत सांगते की,अशा चुकीच्या निर्णयांमुळे गंभीर दुखापत, कोमा किंवा मृत्यूही होऊ शकतो.**

🌍 सध्या किती लोक या धोक्यात आहेत?

अहवालानुसार, अमेरिकेत तयार झालेले सुमारे 30 लाख सेन्सर्स संशयाच्या भोवऱ्यात आहेत, CGM च्या या चुकीच्या निर्णयामुळे 14 नोव्हेंबरपर्यंत जगभरात 7 मृत्यू आणि 736 गंभीर जखमा नोंदवल्या गेल्या आहेत.अमेरिकेत 57 जखमा झाल्या असून मृत्यूची नोंद नाही

यामुळे FDA ने तातडीने, वितरक, रुग्णालये आणि फार्मसी यांना हे सेन्सर्स विक्रीतून आणि वापरातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

⚠️ मधुमेह: भविष्यातील मोठा धोका:

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 77 दशलक्षांहून अधिक लोकांना सध्या मधुमेह आहे.जवळपास 2.5 कोटी लोक ‘मधुमेहपूर्व अवस्थेत’ आहेत, म्हणजेच भविष्यात त्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे.म्हणजेच योग्य उपचार, अचूक उपकरणे आणि वेळेवर निदान न झाल्यास भविष्यात ही समस्या महामारीचे (Epidemic) रूप घेऊ शकते.

रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

जर तुम्ही किंवा तुमचे जवळचे, FreeStyle Libre 3 किंवा Libre 3 Plus सेन्सर वापरत असाल, तर त्वरित, आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा,पर्यायी ग्लुकोज तपासणी पद्धती वापरा, लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नका 

✍️ समारोप:

ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते,  तंत्रज्ञान जितके उपयुक्त, तितकेच ते धोकादायकही असे असू शकते. मधुमेहासारख्या गंभीर आजारात अचूक माहितीच जीवन वाचवू शकते. रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य संस्थांनी याकडे गांभीर्याने पाहणे ही काळाची गरज आहे.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

  प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

Comments

  1. नेहमीप्रमाणे हा ब्लॉग पण अतिशय उपयुक्त आहे
    धन्यवाद प्रसाद सर
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete
  2. खूपच माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा लेख

    ReplyDelete
  3. महत्वपूर्ण माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...