Skip to main content

पित्ताचा त्रास हा सर्वाधिक सामान्य आणि त्रासदायक आजार

  ब्लॉग नं. 2025/35 3 . दिनांक: 1 7 डिसेंबर, 2025.   मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनशैलीतून उद्भवणारे अनेक त्रास आपण वारंवार अनुभवतो,त्यापैकी पित्ताचा त्रास हा सर्वाधिक सामान्य आणि त्रासदायक प्रकार आहे. छातीत जळजळ , तोंड कडू होणे , अंग गरम जाणवणे , आंबट ढेकर… हे सर्व त्रास पित्त वाढल्याची लक्षणे आहेत.पण पित्त का वाढते ? आणि ते कमी करण्यासाठी घरच्या घरी कोणते उपाय करता येतात ? चला , अत्यंत सोप्या भाषेत समजून घेऊया आजच्या ब्लॉगमध्ये.  सविस्तर: पित्त वाढण्याची मुख्य कारणे : 1. चुकीचा आहार: आपण नेहमी खात असलेल्या पदार्थांचा पित्ताशी थेट संबंध असतो.तेलकट , तिखट , मसालेदार पदार्थ रेड मीट , जंक फूड हे अन्न पदार्थ पित्त वाढवण्यामागील मुख्य कारणे आहेत. अशा पदार्थांमुळे छातीत जळजळ होणे अगदी स्वाभाविक आहे. 2. अपेय पानाचे सेवन: आयुर्वेदानुसार अपेय पान म्हणजे शरीरासाठी हितकारक नसलेले पदार्थ.जसे चहा , कॉफी , दारू , सिगारेट यांचे जास्त प्रमाणात सेवन पित्त दोष वाढवते. 3. तीव्र ऊन आणि उष्ण वातावरण: ऊन्हात जास्त वेळ काम करणे , शरीराला सूर्याची तिव्रता पेलवणं कठीण होणे,...

पित्ताचा त्रास हा सर्वाधिक सामान्य आणि त्रासदायक आजार

 ब्लॉग नं. 2025/353.

दिनांक: 17 डिसेंबर, 2025. 

मित्रांनो,

आपल्या दैनंदिन जीवनशैलीतून उद्भवणारे अनेक त्रास आपण वारंवार अनुभवतो,त्यापैकी पित्ताचा त्रास हा सर्वाधिक सामान्य आणि त्रासदायक प्रकार आहे. छातीत जळजळ, तोंड कडू होणे, अंग गरम जाणवणे, आंबट ढेकर… हे सर्व त्रास पित्त वाढल्याची लक्षणे आहेत.पण पित्त का वाढते? आणि ते कमी करण्यासाठी घरच्या घरी कोणते उपाय करता येतात? चला, अत्यंत सोप्या भाषेत समजून घेऊया आजच्या ब्लॉगमध्ये. 

सविस्तर:

पित्त वाढण्याची मुख्य कारणे:

1. चुकीचा आहार:

आपण नेहमी खात असलेल्या पदार्थांचा पित्ताशी थेट संबंध असतो.तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ रेड मीट, जंक फूड हे अन्न पदार्थ पित्त वाढवण्यामागील मुख्य कारणे आहेत. अशा पदार्थांमुळे छातीत जळजळ होणे अगदी स्वाभाविक आहे.

2. अपेय पानाचे सेवन:

आयुर्वेदानुसार अपेय पान म्हणजे शरीरासाठी हितकारक नसलेले पदार्थ.जसे चहा, कॉफी, दारू, सिगारेट यांचे जास्त प्रमाणात सेवन पित्त दोष वाढवते.

3. तीव्र ऊन आणि उष्ण वातावरण:

ऊन्हात जास्त वेळ काम करणे, शरीराला सूर्याची तिव्रता पेलवणं कठीण होणे, यामुळे पित्त सहज वाढते. शरीरातील अंतर्गत उष्णता वाढते आणि जळजळ सुरू होते.

4. भावनिक ताण व चिंता:

पित्त फक्त आहारानेच वाढत नाही.अति विचार, तणाव, बेचैनी, राग, अस्वस्थ मन हे सर्व मानसिक कारणेही पित्त वाढवू शकतात.

पित्त कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies to Reduce Pitta):

हे उपाय सोपे, नैसर्गिक आणि प्रभावी आहेत. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांनी पित्त सहज कमी करता येते.

🔰 अमृत फळ – आवळा:

आवळा चवीला तुरट असला तरी तो उत्कृष्ट पित्तशामक आहे.त्यातील व्हिटॅमिन C पोटातील आम्लता कमी करून पचन सुधारते.तो कसा खावा? कच्चा आवळा मीठ लावून खा. आवळ्याचे चूर्ण कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.काही दिवस नियमित वापर केल्यास पित्ताचा त्रास कमी होतो

🔰 मूग आणि तांदूळ – पित्तासाठी सर्वोत्तम जेवण:

पित्तामुळे भूक लागत नसेल, जळजळ होत असेल तर,जेवण हलके, पचायला सोपे असावे.साधं वरणभात + तूप किंवा मूग-तांदळाचा नीर डोसा खावा.मूग हा उत्तम पित्तशामक असल्याने काही दिवस हे अन्न उत्तम ठरते.

🔰 उष्ण आलं आणि रसदार लिंबू:

आलं उष्ण असले तरी ते आम्लपित्त कमी करणारे आहे.लिंबाचा व्हिटॅमिन C पचनशक्ती सुधारतो.उपाय:
किसलेलं आलं + मीठ + लिंबू रस + थोडी साखर,हे मिश्रण चमच्याने थोडं-थोडं पित राहिल्यास जळजळ कमी होते.

🔰 कोकम किंवा आमसूल:

कोकम हे नैसर्गिक पित्तशामक आहे.कोकम सरबत किंवा आमसूलाची कढी दोन्ही पित्त कमी करण्यात प्रभावी ठरते. 

🔰 थंड दूध:

थोड्या साखरेसह थंड दुधाचे सेवन, छातीतली जळजळ लगेच शांत होते.

🔰 पिकलेले केळे:

केळ्याने पोटातील आम्लनिर्मिती कमी होते. त्यातील फायबर पचनक्रिया सुधारते आणि पित्ताचा त्रास घटतो.

पित्त कमी करण्यासाठी रोजची काळजी:

तिखटमसालेदार पदार्थ टाळा. सिगारेट, दारू, जास्त चहाकॉफी टाळा. तणाव कमी करण्यासाठी श्वसनप्राणायाम करा. पुरेसे पाणी प्या.आणि चांगली झोप घ्या

समारोप:

पित्त हा आजच्या धावपळीच्या जीवनात सहज वाढणारा त्रास आहे. पण त्याकडे दुर्लक्ष न करता, शरीरातील सूचक संदेश ओळखून,योग्य आहार-विहार स्वीकारला, तर हा त्रास घरच्या घरी सहज कमी होऊ शकतो. आवळा, मूग, कोकम, थंड दूध, केळी यांसारखे निसर्गदत्त उपाय शरीराला शांत करून पित्त संतुलित करतात. त्यासोबतच तणाव कमी ठेवणे, पुरेशी झोप घेणे आणि मनःशांती राखणे याही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.   

Comments

  1. प्रसाद सर रोजच्या प्रमाणे आजचा ब्लॉग पण अतिशय उपयुक्त आहे
    काही गोष्टी माहित असतात पण तुम्ही लिहिल्यामुळे ठळकपणे लक्षात रहातात
    तुमचे सर्व ब्लॉग्ज सेव करून ठेवायला हवेत
    प्रसाद सर तुम्ही ह्या ब्लॉग चे पुस्तक का लिहित नाही
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...