Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

27 वर्षाच्या मुलाची डोकेदुखी निघाली जीवघेणी

ब्लॉग नं: 2025/346.
दिनांक: 10 डिसेंबर,2025.

मित्रांनो,

आज काल तरुणांच्या आरोग्य समस्या खूप वाढल्यात.27 वर्षांच्या युवकाला “साधा डोकेदुखी” वाटलेला त्रास निघाला जीवघेणा. अपोलोचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी उघड केली खरी समस्या.27 वर्षांचा एक तरुण वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असल्याने एका क्लिनिकमध्ये गेला.त्याला वाटत होते—कदाचित ताण, झोपेची कमी किंवा कामाचा थोडा दगदग असेल.पण पुढे जे समोर आले ते धक्कादायक आणि जीवघेणे ठरू शकणारे होते. आजचा ब्लॉग या विषयावर.

सविस्तर:

क्लिनिकमध्ये त्याचा रक्तदाब मोजला. त्याचे रक्तदाबाचे मोजमाप 190/110 mmHg! इतका भयानक उच्च रक्तदाब एका तरुणामध्ये… हे सामान्य नव्हते.अपोलो हॉस्पिटल्सचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी X वर ही संपूर्ण घटना शेअर करताना सांगितले की, ही केस म्हणजे एका लपलेल्या रोगाशी, धावपळ करत करत केलेली जीव वाचवणारी शर्यत होती.

क्लिनिकमध्ये दाखल होताच दिसू लागले धोक्याचे संकेत.तरुण दिसायला अस्वस्थ वाटत होता.खोली एसीची असूनही त्याचा घाम थांबत नव्हता.त्याचे हात थरथरत होते.तो सतत घाबरलेला, तणावग्रस्त जाणवत होता.अचानक येणाऱ्या हृदयाच्या ठोक्यांच्या वाढ, पाल्पिटेशन्स आणि भीतीच्या लाटा यांचा तो उल्लेख करत होता.

सगळ्यात विचित्र म्हणजे—

वेगवेगळ्या डॉक्टरांनी दिलेल्या उच्च रक्तदाबाच्या औषधांनी काहीच परिणाम होत नव्हता.चार स्पष्ट संकेतांनी डॉक्टरांना सावध केले.

डॉ. कुमार यांनी सांगितले की या चार लक्षणांनी लगेचच त्यांचे लक्ष वेधून घेतले:

1. अस्पष्ट आणि तीव्र डोकेदुखी,

2. इतक्या कमी वयात इतका प्रचंड रक्तदाब,

3. अचानक घाम, थरथर, पाल्पिटेशन्स येणारे झटके,

4. औषधांनंतरही कमी न होणारा रक्तदाब.

ही लक्षणे सामान्य हायपरटेन्शनची नव्हती.

डॉक्टरांना एक गंभीर शक्यता दिसत होती, फिओक्रोमोसायटोमा (Pheochromocytoma) : एक दुर्मिळ अधिवृक्क ग्रंथीतील ट्यूमर. हा ट्यूमर शरीरात डोपामाइन, नॉरएड्रेनलिन आणि अॅड्रेनलिनसारखे स्ट्रेस हार्मोन (catecholamines) प्रचंड प्रमाणात सोडतो.यामुळे शरीरात थरथर, भीतीचे झटके, हृदयाचे ठोके, आणि अनियंत्रित रक्तदाब वाढतो.

निदानाची शर्यत — चाचण्यांचे परिणाम निघाले धक्कादायक:

डॉ. कुमार यांनी रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाला सविस्तर चाचण्या करून घेण्याचा सल्ला दिला.

1.प्लाझ्मा मेटानेफ्रिन्स चाचणी – अत्यंत जास्त,

2.24-तास मूत्रातील मेटानेफ्रिन्स – खूपच वाढलेले,

3.एमआरआय स्कॅन – अधिवृक्क ग्रंथीमध्ये स्पष्ट ट्यूमर.

निदान स्पष्ट होते—फिओक्रोमोसायटोमा.

रुग्णाच्या कुटुंबाने धक्का, भीती, गोंधळ आणि शेवटी दिलासा… अशा अनेक भावनांचा प्रवास अनुभवला.कित्येक वर्षे तो ज्या रहस्यमय त्रासांनी झुंजत होता, त्याचे कारण अखेर स्पष्ट झाले.रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टरांची टीम मैदानात उतरली.

निदान झाल्यावर तातडीने एक multidisciplinary टीम तयार केली गेली:

1.न्यूरॉलॉजिस्ट,

2.एंडोक्रायनोलॉजिस्ट,

3.सर्जन,

4.अ‍ॅनेस्थेसिस्ट,

आणि एक कार्डिओलॉजिस्ट

औषधांनी रक्तदाब स्थिर केल्यानंतर ट्यूमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया ठरवली गेली.शस्त्रक्रियेनंतर अविश्वसनीय बदल दिसून आले. ट्यूमर यशस्वीपणे काढण्यात आला.आणि मग काही दिवसांतच रक्तदाब सामान्य झाला. अनेक वर्षे सतावणारी डोकेदुखी पूर्णतः गायब झाली! रुग्णाने follow-up मध्ये सांगितले: "आता मला पुन्हा पूर्वीसारखे वाटत आहे." एका अचूक निदानाने त्याचे संपूर्ण जीवन बदलले.

समारोप:

या प्रकरणातून काय शिकायचे? डॉ. कुमार यांनी सांगितले.तरुणांमधील उच्च रक्तदाब नेहमी ‘साधा’ नसतो.

खालील लक्षणे असल्यास त्वरित तज्ज्ञांची मदत घ्यावी:

1.अचानक येणारे घामाचे झटके,

2.पाल्पिटेशन्स अर्थात हृदयगती वाढणे किंवा भीतीचे अटॅक्स,

3.अनियंत्रित, खूप जास्त रक्तदाब,

4.डोकेदुखीचे वारंवार झटके,आणि 

5.औषधे घेतल्यानंतरही BP नॉर्मल न होणे

कधी कधी शरीर देणारे संकेत दिसायला छोटे वाटतात, पण ते कोणत्या मोठ्या लपलेल्या आजाराचे द्योतक असू शकतात.म्हणून शरीराच्या या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.

समारोप:

27 वर्षांच्या या तरुणाची कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको.प्रत्येक लक्षण हे शरीराचा एक SOS संदेश असतो.वेळीच योग्य डॉक्टरांकडे गेल्यास जीवघेणाही आजार सहज बरा होऊ शकतो.एका योग्य निदानाने तरुणाचे आयुष्य परत मिळाले, आणि ही कहाणी आपल्यासाठी आरोग्याविषयी जागरूकतेची एक नवी जाणीव देऊन गेली.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

 प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. बदलत्या परिस्थितीमध्ये ज्या बदलांना आपल्याला तोंड द्यावं लागतं त्यामुळे होणारे त्रास आपण वेळीच लक्ष नाही दिलं तर गंभीर रूप धारण करत. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं ही अतिउच्च प्रायोरिटी मानली गेली पाहिजे छान माहिती सर खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  2. बदलत्या परिस्थितीमध्ये ज्या बदलांना आपल्याला तोंड द्यावं लागतं त्यामुळे होणारे त्रास आपण वेळीच लक्ष नाही दिलं तर गंभीर रूप धारण करत. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं ही अतिउच्च प्रायोरिटी मानली गेली पाहिजे छान माहिती सर खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  3. समस्या आणि त्यावरील परीक्षण व उपचार याची सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...