Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

अनेक इन्फेक्शनस् मध्ये गुणकारी प्रोबायोटिक्स

 ब्लॉग नं. 2025/326.

दिनांक: 20 नोव्हेंबर, 2025.


मित्रांनो,

            आजकाल आजार होऊन गेल्यानंतर उपचाराची साधनं बदलली आहेत,त्याच प्रमाणे काहींना नवीन नांवे मिळाली आहेत. जसे की, दही, ताक किंवा लोणचे यांना Probiotic हे नवीन नांव मिळाले आहे. या आणि अशा Probiotic चे फायदे काय? ते केंव्हा घ्यायला हवेत? किंवा केंव्हा घेऊ नयेत. यावर आहे आजचा ब्लॉग ब्लॉग.

सविस्तर:

What is a Probiotic?

Probiotics म्हणजे,असे जिवंत सूक्ष्मजीव (गुड बॅक्टेरिया) जे आपल्या शरीरासाठी, विशेषतः पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे नैसर्गिकरित्या काही पदार्थांमध्ये आढळतात किंवा पूरक (supplements) स्वरूपातही घेतले जाऊ शकतात.

आपल्या आतड्यांमध्ये चांगले व वाईट असे दोन्ही बॅक्टेरिया असतात. जेव्हा हा समतोल बिघडतो, जसे की संक्रमण, अँटिबायोटिक्स, चुकीच्या आहारामुळे,तेव्हा पचन बिघडते,रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि विविध तक्रारी निर्माण होतात. प्रोबायोटिक्स हा समतोल पुन्हा सुधारतात.

Probiotics कशामुळे आजारातून रिकव्हरी जलद होते?

1. पोटातील गुड बॅक्टेरिया वाढवतात:

बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा अँटिबायोटिक्स घेतल्यानंतर आतड्यातील चांगले बॅक्टेरिया कमी होतात. प्रोबायोटिक्स हे चांगले बॅक्टेरिया वाढवून पचन सुधारतात आणि शरीराची ताकद पुनर्संचयित करतात.

2. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात:

70% इम्युनिटी गट (gut) मध्ये असते. प्रोबायोटिक्स immunity cells उत्तेजित करून शरीराला इन्फेक्शनशी लढायला मदत करतात.                                                                  

3.अँटिबायोटिकचे दुष्परिणाम कमी करतात:

अँटिबायोटिक घेतल्यावर, वारंवार पोट बिघडते,अतिसार (डायरिया) होतो, पोटात गॅस, पोटदुखी, प्रोबायोटिक्स हे दुष्परिणाम कमी करतात आणि पचन व्यवस्थित ठेवतात.

4. वाईट बॅक्टेरिया वाढू देत नाहीत

प्रोबायोटिक्समुळे गुड बॅक्टेरिया वाईट बॅक्टेरियाला जागा मिळू देत नाहीत व त्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे इन्फेक्शन पुन्हा होण्याची शक्यता कमी होते.

5. सूज (Inflammation) कमी करतात

आजारामुळे शरीरात सूज वाढते. प्रोबायोटिक्स सूज कमी करून शरीराचे healing process वेगवान करतात.

बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये प्रोबायोटिक्स कधी आणि कसे घ्यावेत?

✔️ अँटिबायोटिक्ससोबत:

पण अँटिबायोटिकपासून 2–3 तास अंतर ठेवून, कारण एकत्र घेतले तर अँटिबायोटिक probiotic ला नष्ट करू शकतो

✔️ आजारी झाल्यावर 1–2 आठवडे सुरू ठेवावेत:

आतड्यातील चांगले बॅक्टेरिया पुन्हा संतुलित होताना वेळ लागतो.

सहसा वापरले जाणारे Probiotic पदार्थ

दही (curd) – उत्तम नैसर्गिक probiotic, ताक, कांजी, लोणचे (natural fermentation), किमची, किम्बूची, Idli-dosa batter (fermented foods)

प्रोबायोटिक्स capsules (जर डॉक्टरने सुचवले असतील तर)

प्रोबायोटिक्स कोणी घ्यावे?

ज्यांना अँटिबायोटिक चालू आहे, ज्यांना डायरिया झालाय, ज्यांना food poisoning झालंय, ज्यांना

bloating / gas झालाय, ज्यांची इम्युनिटी कमी झालीय. आणि ज्यांचे पोट संवेदनशील आहे.  

प्रोबायोटिक्स कधी टाळावे?

जसे की, अतिशय कमकुवत इम्युनिटी (जसे की ICU किंवा काही specific रोग) किंवा डॉक्टरने मनाई केली असेल तर.

समारोप:

सोप्या भाषेत समारोप करायचा झाल्यास प्रोबायोटिक्स हे शरीराचे मित्र बॅक्टेरिया. बॅक्टेरियल इन्फेक्शननंतर किंवा अँटिबायोटिक्स घेतल्यावर ते पचन सुधारतात, immunity वाढवतात आणि recovery जलद करतात.सध्या मला झालेल्या बॅक्टेरियल इन्फेक्शननंतर, मी याचा आहारात प्रयोग करत आहे आणि त्याचे  आश्चर्यकारक फायदे होतात.   

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.

 

 प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. 

 

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...