Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

आरोग्यदायी आतड्यांसाठी प्रोटीन:

ब्लॉग नं:2025/335.

दिनांक:29 नोव्हेंबर, 2025. 


मित्रांनो,

            लहानपणी शाळेत असतांना जीवशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना, लहान आतडे,मोठे आतडे आपण ऐकलेलं.शरीराला व्यवस्थितपणे चालविण्याचे काम हे आतडे करीत असतात. पण यांना आरोग्यदायी ठेवण्यासाठी लागतं प्रोटीन. प्रोटीन हे फक्त मांसाहारी जेवणातून मिळत असत नाही. तर असे पाच शाकाहारी पदार्थ आहेत,जे प्रोटीनने समृद्ध आहेत.याच विषयावर आहे,आजचा ब्लॉग याच विषयावर आहेत.       

सविस्तर:

आपण प्रोटीन म्हटले की,लगेच डोळ्यांसमोर येते ते स्नायू, व्यायाम आणि वजन कमी करण्याचे फायदे. पण आजचे तज्ज्ञ सांगतात की,प्रोटीन हे केवळ स्नायूंसाठीच नाही,तर आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट डॉ. पॉल यांच्या मते, प्रोटीनसोबत फायबर, प्रीबायोटिक्स किंवा प्रोबायोटिक्स मिळाले, तर ते आपल्या आतड्यांच्या बॅक्टेरियासाठी एक परफेक्ट कॉम्बिनेशन ठरते. म्हणूनच खाली दिलेले पाच शाकाहारी प्रोटीन स्रोत केवळ पचनास सोपे नसून, आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया वाढवतात आणि पचनशक्ती सुधारतात.

1) अंकुरलेली मुगडाळ — पचायला हलकी आणि फायबरयुक्त:

भिजत ठेवलेल्या आणि अंकुर आलेल्या मुगडाळीत जीवनसत्त्वे वाढतात,पचनशक्ती सुधारते आणि गॅस निर्माण करणारे घटक कमी होतात.

मुगडाळीत प्रोटीन किती: 100 ग्रॅम अंकुरलेल्या मुगडाळीत सुमारे 7 ग्रॅम प्रोटीन असतं.  

हे कसे खावे:  सलाड किंवा चाटमध्ये टाकून खावे,किंवा पोह्यात मिसळून खावे, मोहरी–कढीपत्ता टाकून हलके परतून स्नॅक म्हणून खावे.  

2) सोया पनीर — पूर्ण प्रोटीन, कमी फॅट:  सोया दूध कर्डलिंग करून बनवलेले हे पनीर पूर्ण प्रोटीन देते आणि चवीत न्यूट्रल असल्याने कोणताही मसाला सहज शोषून घेते.

प्रोटीन किती: 100 ग्रॅममधे 8 ग्रॅम प्रोटीन असतं.  

हे कसे खावे: स्टर-फ्रायमध्ये, काठी-रोलमध्ये, पालक-टोफूमध्ये आणि पॅन-सीअर करून जलद साइड डिश

3) स्ट्रेन्ड दही — प्रोबायोटिक्स + प्रोटीन:

पाणी काढलेले घट्ट दही (हंग कर्ड) प्रोटीनने समृद्ध असते आणि त्यातील जिवंत बॅक्टेरिया आतड्यांतील मायक्रोबायोम संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

प्रोटीन किती: 100 ग्रॅममध्ये सुमारे 10 ग्रॅम प्रोटीन आहे.  

हे कसे खावे:  फ्रूट–नट बाउल खाणे, काकडीचे रायते खाणे, स्मूदीच्या स्वरूपात सेवन करून पहावे .  

4) लो-फॅट पनीर — जास्त प्रोटीन, कमी जडपणा:

लो-फॅट दूधापासून तयार केलेले पनीर हलके, पचायला सोपे आणि प्रोटीनने समृद्ध असते.

प्रोटीन किती:: 100 ग्रॅममध्ये जवळपास 18 ग्रॅम प्रोटीन असतं.  

हे कसे खावे:  पनीर भुर्जीच्या स्वरूपात खावे, एअर-फ्रायरमध्ये पनीर टिक्का करून खावे,भाज्यांच्या ग्रेव्हीत किंवा मिलेट पुलावमध्ये टाकून खावे.  

5) फर्मेंटेड सोयाबीन केक — प्रीबायोटिक + प्रोबायोटिक गुणधर्म:

सोयाबीन आंबवून तयार होणाऱ्या या घट्ट केकमध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स वाढतात आणि पचण्याची क्षमता सुधारते.

प्रोटीन किती: 100 ग्रॅममध्ये जवळपास 19 ग्रॅम प्रोटीन असतं.  

हे कसे खावे:  पॅन-ग्रिल करून बुद्धा बाउलमध्ये, शेजवान सॉससोबत टॉस करून, कीमा-स्टाइल स्टफिंगमध्ये

समारोप:

पचन सुधारायचे असेल तर आतड्यांची ताकद वाढवायची असेल आणि शरीराला दर्जेदार प्रोटीन द्यायचे असेल तर,वरील पाच वनस्पती-आधारित प्रोटीन स्रोत तुमच्या दैनंदिन आहारात नक्की समाविष्ट करा. प्रोटीनसोबत फायबर आणि प्रोबायोटिक्स मिळाले की ते आपल्या पोटासाठी एक नैसर्गिक औषधासारखे काम करते.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...