Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

मधुमेहावर मात करण्याचा नवा मार्ग: “माइंडफुल ईटिंग.”

ब्लॉग नं:2025/336.

दिनांक:30 नोव्हेंबर, 2025. 

मित्रांनो,

            तुम्हाला मधुमेह आहे म्हटलं की, हे खात जा, ते खाऊ नका,रोज इतके चालत जा किंवा ही योगासने करा असंच डॉक्टरच नव्हे तर ज्याला वाटेल तो सांगत सुटतो. पण एक डॉक्टर असेही आहेत,जे म्हणतात मधुमेहावर ईलाज करायचा असेल, तर जे खाल ते हळू हळू खा, लक्ष देऊन खा… आणि तुमची साखर आपोआप कमी होईल.हो आजचा ब्लॉग आहे याच विषयावर.

सविस्तर:

कधी कधी आपण इतक्या घाईघाईत जेवतो की, कुणी विचारलं की, अरे,तू नेमकं काय खाल्लंस?” तर बऱ्याचदा आपल्याकडे उत्तर नसतं आणि मजेची गोष्ट म्हणजे ही घाईघाईत जेवायची सवय फक्त पोट नाही तर आरोग्यालाही त्रासदायक ठरते. ही एक शांतपणे नुकसान करणारी सवय आहे.आणि त्यात तुम्हाला मधुमेह असेल तर मधुमेह असणाऱ्यांसाठी तर ती आणखीच त्रासदायक आहे.आपण नेहमी शोधत असतो, कोणते सुपरफूड खाऊ, कोणती गोळी घेऊ, कोणते डाएट फॉलो करू? पण तुम्हाला सांगतो,जे शोधताय ना ते फार दूर नाही,ते तुमच्या ताटातच आहे. हो ज्यालाच म्हणतात, “माइंडफुल ईटिंग.”

हळू हळू जेवा, लक्ष देऊन जेवा, फक्त जेवताना जेवणावर लक्ष ठेवा.उपाय इतका साधा पण परिणाम? अप्रतिम! विशेषज्ञ काय सांगतात? डॉ. अमित भूषण शर्मा (Paras Health) यांनी खूप छान सांगितलं आहे, ते म्हणतात,लोक जास्त खातात,कारण ते भुकेले असतात म्हणून नाही, तर ते विचलित असतात म्हणून.” फोन, टीव्ही, घाई, ताण, कंटाळा—हे सगळं आपल्याला अन्नापासून दूर नेतं. “माइंडफुल ईटिंग.”ची कल्पना त्यांचीच.

त्यांचे नियमही सोपे आहेत,ते म्हणतात, जेवायला डायनिंग टेबलवर बसा. मोबाईल,टीव्ही,नोटिफिकेशन्स सगळं बाजूला ठेवा, ताटातील अन्नाचा सुगंध, रंग, पोत, चव अनुभवा.प्रत्येक घास नीट चावून चावून खा. स्वतःला विचारा—“मी भुकेलेलो आहे का, की फक्त खाण्याची इच्छा आहे? दुसऱ्यांदा ताटात काही हवं आहे कां?थोडं थांबा, भूक आहे कां? तरच खा !”

त्यांच्याच  विचाराला डॉ. रविंद्र निडोणी यांनीही पुष्टी दिली आहे,आपण कसे खातो यावर शरीर ऊर्जा कशी वापरतं हे ठरतं.”

माइंडफुल ईटिंग म्हणजे,

खाण्यावरचे  नियंत्रण सुधारते, लिव्हरवर ताण येत नाही, भावनिक खाणं कमी होतं आणि शरीर शांत राहतं.शेवटी आरोग्य जपण्यासाठी अवघड गोष्टींची गरज नसते.जाणीव आणि सतर्कता पुरेशी असते.आणि हो विज्ञानही तेच सांगतं.

            बरं या सगळ्या फक्त गप्पा नाहीत बार कां. अभ्यास सांगतो,

1) 2024 चा  एक अभ्यास सांगतो, Mindful Eating म्हणजेच कमी HbA1c. संशोधना दरम्यान असे आढळू आले की, जे लोक माइंडफुल पद्धतीने खात होते,त्यांची HbA1c पातळी नियमितपणे चांगली आढळली.तुम्ही खा, पण लक्ष देऊन खा. तसेच;  

2) 2020  च्या Meta-analysis मध्ये आढळून आले की, माइंडफुलनेस आणि माइंडफुल ईटिंगने HbA1c रिपोर्ट  सुमारे 0.25% ने कमी आला. माइंडफुलनेस आणि माइंडफुल ईटिंगमुळे 1) HbA1c कमी आलं, 2) भावनिक ताण कमी, 3) डिप्रेशनची लक्षणे कमी आढळली आणि शरीराला शांतता दिली की साखरही कमी असते.  

3) 2016 अभ्यास म्हणतो की माइंडफुलनेस आणि माइंडफुल ईटिंगने उपाशी साखर कमी  म्हणजे fasting sugar कमी येते. माइंडफुल ईटिंग करणारे लोक, गोड कमी खातात,त्यांची शुगर लेवल कमी असते,त्यांच्या खाण्याच्या सवयी आरोग्यदायी बनतात.

नवीन डायबेटीस मंत्र:हळू हळू खा, लक्ष देऊन खा

माइंडफुल ईटिंग ही फॅशन नाही.ते डॉक्टरांनी सुचवलेलं, संशोधनांनी सिद्ध केलेलं एक प्रॅक्टिकल टूल आहे.कारण ते, जास्त खाणे अर्थात ओव्हरईटिंग थांबवतं, भावनिक खाणं कमी करतं, खर्‍या भुकेची जाणीव करून देतं, तसेच पोट भरल्याचे संकेत लक्षात आणून देतं,मनावरील ताण कमी करतं, पचन सुधारतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, माइंडफुल ईटिंग हे मोफत आहे. कुठलाही खर्च नाही. फक्त…लक्षात असू द्यायचं, जे खाल ते हळू हळू खा, लक्ष देऊन खा आणि आनंद घेत खा.

समारोप:

हळू खा… आणि तुमचं शरीर त्या बदल्यात तुम्हाला बरेच काही देईल! माइंडफुल ईटिंग हा चमत्कार नाही, पण ती एक साधी, सुंदर, सहज अमलात आणता येणारी सवय आहे.आपण जेवणाकडे अनुभूती म्हणून पाहायला लागलो,तर  शुगर लेवल सुधारते,पचन सुधारते, मनावरचा ताण कमी होतो आणि आरोग्य नैसर्गिकपणे सुधारते.म्हणून जेवायला बसाल तेव्हा थोडं थांबा…खोल श्वास घ्या…आणि लक्षात ठेवा “जे खाल ते हळू हळू खा, लक्ष देऊन खा आणि आनंद घेत खा.” मी सुरुवात केलीय.  

मित्रांनो,एकवार महिनाभर करून बघायला काय हरकत आहे, झाला तर फायदाच होईल. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. अतिशय उपयुक्त माहिती
    प्रसाद नातू, तुमच्या ब्लॉगचे viewers १ लाखाहून जास्त झाले त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊
    तुमचे ब्लॉग असतातच माहितीपूर्ण
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद सर

    ReplyDelete
  3. Important information

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...