Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

दररोज तुम्ही फक्त 2 तास झोपता धोकादायक आहे

ब्लॉग नं:2025/340.

दिनांक:4 डिसेंबर, 2025. 

मित्रांनो,

आजच्या धावपळीच्या जगात झोप ही अनेकांसाठी लक्झरी झाली आहे. कामाच्या डेडलाईन्स, सोशल मीडियावरचा डूमस्क्रोलिंग, रात्री उशिरापर्यंत वेब सिरीज पाहणे किंवा ताणतणावात विचारांच्या गिरक्या,अशा अनेक कारणांमुळे झोप कमी होत चालली आहे. 2025 मधील झोपेच्या अहवालानुसार, जगातील एक-तृतीयांश प्रौढांना रात्री 7 तासांचीही झोप मिळत नाही.याच विषयावर आहे आजचा ब्लॉग.

सविस्तर:  

पण काहीजण तर इतक्या टोकाला जातात की,रोज फक्त 2 तास झोपूनही दिवस ढकलतात.हे किती धोकादायक असू शकते? हे समजण्यासाठी आम्ही PSRI हॉस्पिटलच्या पल्मोनोलॉजी, क्रिटिकल केअर आणि स्लीप मेडिसिन विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. नीतू जैन यांच्याशी संवाद साधला. त्यांनी झोपेच्या अभावाचे तात्काळ आणि दीर्घकालीन परिणाम स्पष्ट करून सांगितले.

1) फक्त दोन तास झोप — तात्काळ परिणाम किती गंभीर?

डॉ. जैन म्हणतात, रात्री फक्त दोन तास झोपल्याने मेंदूची कार्यक्षमता प्रचंड बिघडते. त्यामुळे तात्काळ दिसून येणारे दुष्परिणाम म्हणजे, थकवा, अशक्तपणा, एकाग्रता कमी होणे, लक्ष विचलित होणे, चिडचिड, मूड खराब होणे

माहिती process करण्याची क्षमता मंदावणे, निर्णयक्षमता आणि समन्वय बिघडणे. एवढेच नव्हे तर यामुळे शारीरिक दृष्ट्या, शरीरात कोर्टिसोल (ताण वाढवणारा हार्मोन) वाढतो आणि इम्युनिटी कमी होते. अगदी एका रात्रीची झोप कमी झालीतरी हे परिणाम स्पष्ट दिसू शकतात.

2) भावनांवर आणि निर्णयक्षमतेवर परिणाम:

मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जे तर्कशक्ती, निर्णय आणि आवेग नियंत्रण सांभाळते,ते झोपेच्या कमतरतेने कमजोर होते. त्याउलट, अमिग्डाला अधिक सक्रिय होते, जी भीती, राग, भावनिक प्रतिक्रिया वाढवते.यामुळे व्यक्ती…अधिक चिडचिडी होते, भावनिक निर्णय घेते, राग, चिंता वाढते, तणाव हाताळताना सहज कोलमडते, छोटे-छोटे प्रसंगही मोठे वाटू लागतात.म्हणजे शरीर झोपेच्या अभावात “भावनिक आपत्ती मोड” मध्ये जातं.

3) झोप कमी असल्याची ‘दृश्यमान’ चिन्हे:

डॉ. जैन सांगतात की ही चिन्हे केवळ काही दिवसांत दिसू लागतात, जसे की त्वचा निस्तेज दिसणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे, त्वचेतील कोलेजन कमी होऊन कांतिहीनपणा, वजनात चढ-उतार,भूक वाढणे (कारण घ्रेलिन वाढते आणि लेप्टिन कमी होते) म्हणजे कधी कधी वजन वाढणे किंवा चेहऱ्यावरचे थकलेपण हे झोपेची उणीव सांगते.

4) दोन तास झोपण्याची सवय नाही — धोका आहे!

रोज फक्त दोन तास झोपण्याची सवय ही शरीरासाठी मूक हत्याऱ्यासारखी आहे.डॉ. जैन यांच्या मते, दीर्घकाळ झोप कमी झाल्यास पुढील धोके वाढतात, जसे की उच्च रक्तदाब,हृदयरोग, मधुमेह, नैराश्य (डिप्रेशन)

स्मरणशक्ती कमी होणे, अल्झायमरचा धोका, रोगप्रतिकारक शक्ती घटणे, भावनिक लवचिकता कमी होणे, बर्नआउट आणि चिंता वाढणे.कारण मेंदू विषारी पदार्थ काढून टाकू शकत नाहीत, त्यामुळे संज्ञानात्मक क्षमता (Cognitive ability) हळूहळू घटते.

5) काही दिवसांसाठी कमी झोप घेत असेल तर:

जर एखादी व्यक्ती काही दिवसांसाठीच कमी झोप घेत असेल तर नुकसान कमी करण्यासाठी, 20-30

मिनिटांची पॉवर नॅप घ्यायला हवी, भरपूर पाणी प्यायला हवे, संतुलित आहार घ्यायला हवा, नैसर्गिक प्रकाशात थोडा वेळ घालवायला हवा आणि वेळोवेळी विश्रांती घ्यायला हवी.पण डॉ. जैन स्पष्ट करतात. हे फक्त तात्पुरते उपाय आहेत, योग्य झोपेची जागा घेऊ शकत नाहीत.

6) जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ फक्त दोन तास झोपत असेल तर?

या स्थितीत ताबडतोब पावले उचलणे अत्यावश्यक, दररोज 30-60 मिनिटांनी झोपेची वेळ वाढवणे आवश्यक आहे, झोपण्याची नियमित वेळ कायम ठेवणे, झोपण्यापूर्वी स्क्रीन टाळणे, कॅफिन कमी करणे, रात्री अति विचार/काम टाळणे आणि महत्त्वाचे म्हणजे जर मूड, एकाग्रता, सतर्कता सुधारत नसेल तर स्लीप स्पेशालिस्टचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

समारोप:

शेवटी… झोप ही गरज नाही, ती जीवनाचा पाया आहे.आपण काम, स्वप्ने, धावपळ, जबाबदाऱ्या यासाठी झोपेची तडजोड करत असतो, पण शरीर आणि मेंदू झोपेशिवाय काम करत नाहीत.फक्त दोन तासांची झोप दीर्घकाळ घेणे हे शरीराशी अन्याय आहे, आणि त्याचे दुष्परिणाम अपरिवर्तनीयही ठरू शकतात.म्हणूनच,
झोपेला वेळ द्या, झोपेला प्राधान्य द्या.झोप हीच खरी आरोग्य गुंतवणूक आहे.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. उपयुक्त माहिती 👌👌

    ReplyDelete
  2. छान उपयोगी माहिती 🙏 RR

    ReplyDelete
  3. 1990 मध्ये मला निद्रा समस्या होती. गडहिंग्लज च्या हवामानाने मात्र ही सवय पूर्णपणे बदलून.
    थंडी जरी पडत नसली तरी सध्याच्या हवामानामध्ये मला साडेसहा तास झोप पुरी वाटते परंतु उन्हाळ्यात मात्र सात ते साडेसात तास झोप घेतल्याशिवाय बरं वाटत नाही.. या समस्येतून मी गेलो असल्यामुळे मला अडचणींची चांगली जाण आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...