ब्लॉग नं:2025/340.
दिनांक:4 डिसेंबर, 2025.
मित्रांनो,
आजच्या धावपळीच्या जगात झोप ही अनेकांसाठी लक्झरी झाली आहे. कामाच्या डेडलाईन्स, सोशल मीडियावरचा डूमस्क्रोलिंग, रात्री उशिरापर्यंत वेब सिरीज पाहणे किंवा ताणतणावात विचारांच्या गिरक्या,अशा अनेक कारणांमुळे झोप कमी होत चालली आहे. 2025 मधील झोपेच्या अहवालानुसार, जगातील एक-तृतीयांश प्रौढांना रात्री 7 तासांचीही झोप मिळत नाही.याच विषयावर आहे आजचा ब्लॉग.
सविस्तर:
पण काहीजण तर इतक्या टोकाला जातात की,रोज फक्त 2 तास झोपूनही दिवस ढकलतात.हे किती धोकादायक असू शकते? हे समजण्यासाठी आम्ही PSRI हॉस्पिटलच्या पल्मोनोलॉजी, क्रिटिकल केअर आणि स्लीप मेडिसिन विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. नीतू जैन यांच्याशी संवाद साधला. त्यांनी झोपेच्या अभावाचे तात्काळ आणि दीर्घकालीन परिणाम स्पष्ट करून सांगितले.
1) फक्त दोन तास झोप — तात्काळ परिणाम किती गंभीर?
डॉ. जैन म्हणतात, “रात्री फक्त दोन तास झोपल्याने मेंदूची कार्यक्षमता प्रचंड बिघडते.” त्यामुळे तात्काळ दिसून येणारे दुष्परिणाम म्हणजे, थकवा, अशक्तपणा, एकाग्रता कमी होणे, लक्ष विचलित होणे, चिडचिड, मूड खराब होणे
माहिती process करण्याची क्षमता मंदावणे, निर्णयक्षमता आणि समन्वय बिघडणे. एवढेच नव्हे तर यामुळे शारीरिक दृष्ट्या, शरीरात कोर्टिसोल (ताण वाढवणारा हार्मोन) वाढतो आणि इम्युनिटी कमी होते. अगदी एका रात्रीची झोप कमी झालीतरी हे परिणाम स्पष्ट दिसू शकतात.
2) भावनांवर आणि निर्णयक्षमतेवर परिणाम:
मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जे तर्कशक्ती, निर्णय आणि आवेग नियंत्रण सांभाळते,ते झोपेच्या कमतरतेने कमजोर होते. त्याउलट, अमिग्डाला अधिक सक्रिय होते, जी भीती, राग, भावनिक प्रतिक्रिया वाढवते.यामुळे व्यक्ती…अधिक चिडचिडी होते, भावनिक निर्णय घेते, राग, चिंता वाढते, तणाव हाताळताना सहज कोलमडते, छोटे-छोटे प्रसंगही मोठे वाटू लागतात.म्हणजे शरीर झोपेच्या अभावात “भावनिक आपत्ती मोड” मध्ये जातं.
3) झोप कमी असल्याची ‘दृश्यमान’ चिन्हे:
डॉ. जैन सांगतात की ही चिन्हे केवळ काही दिवसांत दिसू लागतात, जसे की त्वचा निस्तेज दिसणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे, त्वचेतील कोलेजन कमी होऊन कांतिहीनपणा, वजनात चढ-उतार,भूक वाढणे (कारण घ्रेलिन वाढते आणि लेप्टिन कमी होते) म्हणजे कधी कधी वजन वाढणे किंवा चेहऱ्यावरचे थकलेपण हे झोपेची उणीव सांगते.
4) दोन तास झोपण्याची सवय नाही — धोका आहे!
रोज फक्त दोन तास झोपण्याची सवय ही शरीरासाठी मूक हत्याऱ्यासारखी आहे.डॉ. जैन यांच्या मते, दीर्घकाळ झोप कमी झाल्यास पुढील धोके वाढतात, जसे की उच्च रक्तदाब,हृदयरोग, मधुमेह, नैराश्य (डिप्रेशन)
स्मरणशक्ती कमी होणे, अल्झायमरचा धोका, रोगप्रतिकारक शक्ती घटणे, भावनिक लवचिकता कमी होणे, बर्नआउट आणि चिंता वाढणे.कारण मेंदू विषारी पदार्थ काढून टाकू शकत नाहीत, त्यामुळे संज्ञानात्मक क्षमता (Cognitive ability) हळूहळू घटते.
5) काही दिवसांसाठी कमी झोप घेत असेल तर:
जर एखादी व्यक्ती काही दिवसांसाठीच कमी झोप घेत असेल तर नुकसान कमी करण्यासाठी, 20-30
मिनिटांची पॉवर नॅप घ्यायला हवी, भरपूर पाणी प्यायला हवे, संतुलित आहार घ्यायला हवा, नैसर्गिक प्रकाशात थोडा वेळ घालवायला हवा आणि वेळोवेळी विश्रांती घ्यायला हवी.पण डॉ. जैन स्पष्ट करतात. “हे फक्त तात्पुरते उपाय आहेत, योग्य झोपेची जागा घेऊ शकत नाहीत.”
6) जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ फक्त दोन तास झोपत असेल तर?
या स्थितीत ताबडतोब पावले उचलणे अत्यावश्यक, दररोज 30-60 मिनिटांनी झोपेची वेळ वाढवणे आवश्यक आहे, झोपण्याची नियमित वेळ कायम ठेवणे, झोपण्यापूर्वी स्क्रीन टाळणे, कॅफिन कमी करणे, रात्री अति विचार/काम टाळणे आणि महत्त्वाचे म्हणजे जर मूड, एकाग्रता, सतर्कता सुधारत नसेल तर स्लीप स्पेशालिस्टचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
समारोप:
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा
लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी
संपर्क करावा.

उपयुक्त माहिती 👌👌
ReplyDeleteछान उपयोगी माहिती 🙏 RR
ReplyDelete1990 मध्ये मला निद्रा समस्या होती. गडहिंग्लज च्या हवामानाने मात्र ही सवय पूर्णपणे बदलून.
ReplyDeleteथंडी जरी पडत नसली तरी सध्याच्या हवामानामध्ये मला साडेसहा तास झोप पुरी वाटते परंतु उन्हाळ्यात मात्र सात ते साडेसात तास झोप घेतल्याशिवाय बरं वाटत नाही.. या समस्येतून मी गेलो असल्यामुळे मला अडचणींची चांगली जाण आहे.