Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

कोरडा खोकला, कारणे त्रास आणि उपाय

ब्लॉग नं: 2025/331.

दिनांक: 26 नोव्हेंबर,2025. 


मित्रांनो,

कोरडा खोकला: कारणे, त्रास आणि घरगुती उपाय

हवामान बदल होत असतांना,सर्दी, ताप आणि खोकल्याच्या तक्रारी वाढताना दिसतात. त्यातही कोरडा खोकला हा सर्वात त्रासदायक प्रकार. कफ निघत नाही, घसा खवखवतो, खोकताना छातीत व बरगड्यात वेदना होतात. आज या विषयावर आहे,आजचा ब्लॉग.

सविस्तर:

 सामान्य वाटणारा कोरडा खोकला,अनेकदा गंभीर आजारांची सुरुवात असू शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार करणे गरजेचे आहे.औषधांसोबत काही घरगुती, नैसर्गिक उपाय तुम्हाला त्वरित आराम देऊ शकतात.

आता आपण जाणून घेऊ, कोरड्या खोकल्यावरचे 6 प्रभावी घरगुती उपाय.

1) मध घशाचा नैसर्गिक संरक्षक:

मध हा कोरड्या खोकल्यावरचा रामबाण उपाय मानला जातो.मध घशातील सूज कमी करतो, खवखव शांत करतो आणि जंतुनाशक म्हणूनही काम करतो.

बनवण्याची पद्धत:

एका छोट्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या.त्यात 2 चमचे मध मिसळा.दिवसातून एक-दोन वेळा प्या. यामुळे काही दिवसांतच खोकल्यात आराम जाणवतो.

2) आले व मीठ, त्वरित परिणाम देणारा पारंपरिक उपाय:

आल्यामध्ये नैसर्गिक प्रतिजैविक (anti-inflammatory) गुणधर्म असतात.

बनवण्याची पद्धत:

आल्याचे छोटे तुकडे वाटून घ्या. त्यात चिमूटभर मीठ मिसळा,हे मिश्रण दाढेखाली 5 मिनिटे ठेवा,नंतर कोमट पाण्याने गुळण्या करा, यामुळे घशातील सूज कमी होते आणि कोरडा खोकला शांत होतो. 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडात ठेवू नका.

3) ज्येष्ठमधाचा चहा, घशाला दिलासा:

ज्येष्ठमध (यष्टिमधु) घशाला अतिशय कोमलपणे आराम देते आणि कोरड्या खोकल्यावर उपयुक्त असते.

बनवण्याची पद्धत:

एक कप पाण्यात 2 चमचे ज्येष्ठमध पावडर उकळा,10-15 मिनिटांनी गाळून घ्या.हवे असल्यास मध मिसळा.दिवसातून दोन वेळा प्या.

4) हळदीचे दूध, रोगप्रतिकार वाढवणारा सुवर्ण उपाय:

हळदीतील कर्क्युमिन नावाचा घटक जंतुसंसर्ग, सर्दी आणि श्वसनाचे त्रास कमी करतो.

बनवण्याची पद्धत:

एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद मिसळा,रात्री झोपण्यापूर्वी प्या,काही दिवसांतच कोरड्या खोकल्याचा त्रास जाणवण्यासारखा कमी होतो.

5) गूळ  कफ बाहेर काढणारा नैसर्गिक साथी:

गुळामुळे शरीर गरम राहते आणि जमा झालेला कफ सैल होऊन बाहेर येण्यास मदत होते.

बनवण्याची पद्धत:

कोमट पाण्यात थोडी गूळ पावडर मिसळून प्या. प्रमाणाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामुळे सर्दी, खोकला आणि पचनाचे विकारही कमी होतात.

6) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, त्वरित आराम:

खोकल्यामुळे घशाला झालेला त्रास, खवखव आणि जळजळ यावर हा उपाय अतिशय परिणामकारक आहे.

बनवण्याची पद्धत:

एका ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मीठ मिसळा. दिवसातून दोन वेळा गुळण्या करा,यामुळे घशातील सूज कमी होते आणि संसर्ग दूर होतो.

7) गरम पाण्याची वाफ, श्वासोच्छवास सुधारते:

गरम पाण्याची वाफ घेतल्याने, कफ सैल होऊन बाहेर पडतो,श्वास घेणे सोपे होते,नाक-घसा स्वच्छ राहतो.आठवड्यातून फक्त दोन वेळाच वाफ घ्यावी.जास्त केल्यास त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात. आरोग्यास प्राधान्य द्या.सर्दी, खोकला ही छोटी समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य काळजी, पौष्टिक आहार, पाणीपुरवठा आणि वेळेत उपचार केल्यास गंभीर त्रास टाळता येतो.

समारोप:

कोरडा खोकला,हा तसा सामान्य वाटणारा पण, दैनंदिन आयुष्याची लय बिघडवणारा त्रास आहे. मात्र योग्य काळजी, नैसर्गिक उपाय आणि आवश्यक तेव्हा वैद्यकीय सल्ला घेतल्यास,हा त्रास सहज कमी करता येतो. मध, हळद, आले, गूळ, ज्येष्ठमध आणि वाफ यांसारखे साधे घरगुती उपाय,आपल्याला शरीराशी अधिक जवळीक साधायला मदत करतात आणि औषधांच्या गरजाही कमी करतात.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक) 

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

 

 

Comments

  1. नेहमीप्रमाणे परंतु खास करून प्रत्येकास उपयुक्त वाटावा असा आपला आजचा ब्लॉग

    ReplyDelete
  2. सोपे उपाय सोप्या शब्दात आमच्यापर्यंत पोहोचवलेत

    ReplyDelete
  3. उपयोगी माहिती 🙏 RR

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...