Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम: रात्री झोपेत पायांना होणारी बेचैनी

ब्लॉग नं.2025/304

दिनांक: 29 ऑक्टोबर, 2025.

मित्रांनो,

रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम: रात्री झोपेत पायांना होणारी बेचैनी

रात्री झोपायला गेल्यावर,अनेकांना पायात विचित्र हालचालींची इच्छा होते.पाय हलवावेसे वाटतात, आतून झिणझिण्या येतात,टोचल्यासारखं वाटतं, किंवा काहीतरी सतत चुळबुळ करावीशी वाटते.ही अवस्था काही क्षणांसाठी नव्हे,तर रोजच्या रात्री त्रास देते.या विकाराला “रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम” (Restless Legs Syndrome - RLS) किंवा “विलिस-एकबॉम डिसऑर्डर” असे म्हणतात. आजचा ब्लॉग आहे या विषयावर. 

🌙 रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम म्हणजे काय?

रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम हा स्नायू व मज्जासंस्थेशी संबंधित,एक न्यूरोलॉजिकल विकार आहे.या विकारात रुग्णाला,मुख्यतः पाय हलवण्याची अनावर इच्छा होते.विशेषतः रात्री झोपताना किंवा दीर्घकाळ बसल्यावर,ही अस्वस्थता जास्त वाढते.पाय हलवले की काही क्षण आराम मिळतो, पण पुन्हा काही वेळाने त्रास परत सुरू होतो.

 मुख्य लक्षणे:

1. पायांमध्ये आतून झिणझिण्या, टोचल्यासारखे किंवा ओढल्यासारखे जाणवणे,

2. झोपताना किंवा शांत बसल्यावर बेचैनी वाढणे,

3. पाय हलवल्यावर थोडा आराम वाटणे,

4. झोप न लागणे, रात्री वारंवार जाग येणे,

5. दिवसभर थकवा, चिडचिड, मनःस्थितीवर परिणाम,

काही रुग्णांमध्ये हे लक्षण फक्त एका पायात तर काहींमध्ये दोन्ही पायात दिसते.

🧠 कारणे काय असू शकतात?

रेस्टलेस लेग्ज सिंड्रोमचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही, पण काही घटक यासाठी जबाबदार असू शकतात. जसे की, मेंदूमध्ये डोपामीन या रसायनातील असंतुलन, लोहाची (Iron) कमतरता,काही औषधांचे दुष्परिणाम, गर्भधारणा, विशेषतः शेवटच्या टप्प्यात, मधुमेह, किडनीचे विकार, थायरॉईडचे आजार आणि अनुवंशिकता (कुटुंबात हा विकार असणे)

🌿 उपचार व व्यवस्थापन:

रेस्टलेस लेग्ज सिंड्रोमचा कायमस्वरूपी इलाज नसला, तरी जीवनशैलीतील बदल आणि योग्य औषधोपचाराने त्यावर चांगले नियंत्रण ठेवता येते.

💧 घरगुती व जीवनशैलीतील उपाय:

जसे की,झोपेचे नियमित वेळापत्रक ठेवा, कॅफिन, मद्य, व तंबाखूचे सेवन टाळा,नियमित हलका व्यायाम करा,जसे चालणे, स्ट्रेचिंग तसेच झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुणे किंवा मसाज करणे,मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, श्वसन तंत्रांचा वापर करणे इत्यादि.  

💊 वैद्यकीय उपचार:

वैद्यकीय उपचारांमध्ये डॉक्टर लोहाची पातळी तपासून पूरक गोळ्या देऊ शकतात,काही वेळा डोपामीनसंबंधी औषधे, झोप वाढवणारी औषधे किंवा नसांवर नियंत्रण ठेवणारी औषधे दिली जातात, पण ही कुठलीही औषधे वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.

🌼 समारोप:

रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम हा “फक्त झोपेचा त्रास” नाही.तो शरीरातील रासायनिक संतुलन आणि मानसिक शांततेशी निगडित विकार आहे.योग्य निदान आणि वेळेवर उपचार घेतल्यास झोप सुधारते,दिवसातील ऊर्जा वाढते आणि जीवनाची गुणवत्ता पुन्हा उत्तम होते.झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे,म्हणून पायांची बेचैनी दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. 🩵

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...