Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

एक सुर हरपला

 ब्लॉग नं: 2025/284

दिनांक:9 ऑक्टोबर, 2025.

मित्रांनो:

पंडित चुन्नीलाल मिश्रा: संगीत उपासकाचे चरित्र आणि योगदान

संगीत म्हणजे आत्म्याचा प्रवास आहे, जिथे प्रत्येक सूर तुम्हाला तुमच्या स्वतःकडे परत आणतो.”
असं म्हणायचे ते पंडित चुन्नीलाल मिश्र.त्या आता आपल्यात नाही राहिले.2 ऑक्टोबर,2025 ला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर  येथे त्यांचे निधन झाले.आज ब्लॉग त्यांना श्रद्धांजली म्हणून समर्पित करतो.     

सविस्तर:

प्रारंभिक जीवन आणि संगीत शिक्षण:

पंडित चुन्नीलाल मिश्रा यांचा जन्म 3 ऑगस्ट 1936 रोजी,उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील हरिहापूर गावात झाला.त्यांचे पहिले गुरू त्यांचे वडील बद्री प्रसाद मिश्रा होते, त्यांचे वडील पंडित बद्रीप्रसाद मिश्र स्वतः एक कुशल गायक होते.ज्यांनी त्यांना संगीताची मूलतत्त्वे शिकवली. त्यानंतर त्यांनी उस्ताद अब्दुल गनी खान (किराणा घराणे) यांच्याकडून संगीताचे प्रकार शिकले.तसेच,ठाकूर जयदेव सिंग सारख्या संगीतकारांनी त्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन केले. बालपणीच त्यांना जाणवले की,संगीत हा केवळ आवाजाचा खेळ नाही,तर तो अंतरात्म्याशी संवाद साधण्याचा मार्ग आहे. लहान वयातच त्यांनी सूर, शब्द आणि भावना यांचा एक पवित्र संगम अनुभवायला सुरुवात केली. त्यांच्या संगीत दृष्टिकोनाने पारंपारिक घराण्यांच्या सीमा ओलांडल्या - त्यांनी स्वर, भावना आणि वाक्यरचना यांचे सौंदर्य एकत्रित करून,गायन शैलीचे विविध आयाम स्वीकारले.

🎶 तंत्र आणि भाव”:

तंत्र म्हणजे सुरांच्या शिस्तीचे ज्ञान,आणि भाव म्हणजे त्या सुरांमागील आत्मा.ते शिकले की संगीत हे फक्त रियाज नसते, ते ध्यान असते.रोजच्या सरावात ते सूरांना नम्रतेने वंदन करत, जणू देवपूजाच करत असत.

🎶 ठुमरी ते भजन: शब्दांना स्वरांचा स्पर्श:

पंडित मिश्र यांची खासियत म्हणजे,त्यांची ठुमरी गायकी.त्यांनी ‘पूरब अंग’ ठुमरीला भाव, माधुर्य आणि भक्तीचा स्पर्श दिला.त्यांच्या गायकीत दादरा, कजरी, चैती आणि होरी हे सगळे रंग होते,जसे ऋतूंचे बदलते स्वरूप,तसे त्यांच्या सुरांचे रूप.ते नेहमी म्हणायचे,संगीत ही पूजा आहे.स्वर हा मंत्र आहे आणि श्रोते म्हणजे त्या मंत्राचे साक्षीदार.” त्यांचे भजन सादरीकरण ऐकताना,श्रोत्यांना केवळ आनंदच नाही तर,एक आध्यात्मिक शांती लाभायची.

🌼 संघर्ष आणि साधेपणा:

साधनेचा मार्ग नेहमी सोपा नसतो.सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आर्थिक संकटे,कार्यक्रमांची कमतरता,आणि संगीताकडे कमी कल असलेली समाजपरिस्थिती,या सगळ्यांतही त्यांनी आपली श्रद्धा ढळू दिली नाही.त्यांनी कधीच प्रसिद्धीसाठी गायन केले नाही;त्यांनी ते प्रार्थनेसाठी केले.त्यांचा विश्वास होता,ज्याच्या हृदयात श्रद्धा आहे,त्याचे सूर कधीही व्यर्थ जात नाहीत.”

संगीत शैली:

1. शैलींवर प्रभुत्व:

पंडित मिश्राजींनी अनेक शैलींवर प्रभुत्व मिळवले – ख्याल, ठुमरी, दादरा, चैती, कजरी, होरी, भजन इत्यादी.त्यांची खासियत म्हणजे पुरब अंग ठुमरी शैली,भावना, लय आणि शब्दांचे सूक्ष्म मिश्रण.

2. शब्द, भावना आणि संगीत यांचे सुसंवाद:

त्यांच्या गायनात,संगीत केवळ स्वरांची मांडणी बनले नाही, तर गायक आणि श्रोत्यामधील संवाद बनले. त्यांनी केवळ सुरात हरवून जाण्याऐवजी,शब्द आणि भावनांना संगीतमय स्वरूप कसे द्यायचे हे दाखवून दिले.

3. घराण्याच्या सीमा ओलांडणे:

जरी ते बनारस घराण्यातील होते, तरीही त्यांनी किरण, पुरब आणि इतर घटकांचा समावेश केला. परिणामी एक समृद्ध,वैविध्यपूर्ण,तरीही वेगळी शैली निर्माण झाली.असे म्हटले जाते की त्यांनी घराण्याच्या सीमांना आव्हान दिले आणि कलाकाराला "घराण्याच्या बंधना"ऐवजी "आध्यात्मिक स्वातंत्र्य" दिले.

4. लोक आणि धार्मिक संगीताचा समावेश:

पंडित मिश्राजींनी त्यांच्या संगीतात रामचरितमानस,भजन आणि कबीर यासारख्या धार्मिक विषयांचा समावेश केला.त्यांनी त्यांच्या संगीत रचनांमध्ये विविध ऋतू आणि सण (चैती, होळी इ.) समाविष्ट केले.

शिक्षण आणि प्रेरणा:

पंडित मिश्राजींनी दाखवून दिले की,संगीत हे केवळ तंत्र नाही तर ते भावना,शब्द आणि प्रामाणिकपणाचे मिश्रण आहे.एका कलाकाराकडे त्यांच्या मुळांशी (परंपरेशी) जोडलेले राहून,नवोन्मेष करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.संगीताला जनतेच्या जवळ नेणे,उच्च दर्जाचे संगीत केवळ "उच्चभ्रू प्रेक्षकांना ऐकू येत नाही,तर ते व्यापकपणे उपलब्ध असले पाहिजे. गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व—त्यांनी स्वतः गुरु-शिष्य परंपरेत संगीत शिकवले आणि प्रसारित केले. शास्त्रीय संगीत सोपं करून सांगण्याकडे त्यांचा कल होता.   

पंडित चन्नूलाल मिश्र यांची प्रेरणादायी कहाणी

🎵 संगीत म्हणजे साधना:

भारतभूमी नेहमीच संगीत,संस्कृती आणि साधनेची पवित्र भूमी राहिली आहे.या भूमीवर अनेक संत, कवी आणि गायक जन्मले,ज्यांनी संगीताला केवळ कला मानले नाही तर ते ती साधना म्हणून जगले.त्या परंपरेतील एक तेजस्वी दीपस्तंभ होते, पंडित चुन्नीलाल मिश्र.

🏆 पुरस्कार, मान्यता आणि सामाजिक प्रभाव:

त्यांना 2010 मध्ये, भारताचा तृतीय सर्वोच्य पुरस्कार,पद्मभूषणने प्रदान करण्यात आले.नंतर त्यांना 2020 मध्ये,भारताचा द्वितीय सर्वोच्य पुरस्कार,प्रतिष्ठित पद्मविभूषणने गौरन्वित करण्यात आले. त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिपसह,अनेक राज्य आणि राष्ट्रीय सन्मान मिळाले.त्यांच्या गायनाने केवळ भारतातच नव्हे तर,परदेशातही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.त्यांनी केवळ संगीत सादर केले नाही,तर संगीत परंपरा पुढे नेण्यासाठी असंख्य विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

🕊️ शेवटचा सूर, अनंतात विलीन

पंडित छन्नुलाल मिश्रा यांनी जवळजवळ 60+ वर्षे संगीताची सक्रियपणे सेवा केली.2 ऑक्टोबर 2025, रोजी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे,वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीताचे मोठे नुकसान झाले आहे. 2 ऑक्टोबर 2025 रोजी पंडित चन्नूलाल मिश्र यांनी देह सोडला.परंतु त्यांचा स्वर आजही बनारसच्या घाटावर, मंदिरांच्या आरतीत आणि संगीतप्रेमींच्या हृदयात घुमतो.त्यांनी दाखवून दिले की संगीत म्हणजे केवळ प्रदर्शन नाही,ती साधना, संयम आणि आत्म्याची अभिव्यक्ती आहे.

🌺समारोप:

त्यांच्या गायनाने त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली.पंडित मिश्र यांच्या आयुष्यातून आपण शिकतो,की कोणत्याही कलेत श्रद्धा आणि सातत्य महत्त्वाचे असते.प्रसिद्धीपेक्षा आपल्या कलेशी प्रामाणिकपणा मोठा असतो, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे,जेव्हा आपण आपल्या कार्याला प्रार्थना समजतो, तेव्हा तेच कार्य आपल्याला अमर करते.ते म्हणतात, संगीत म्हणजे आत्म्याचा प्रवास आहे, जिथे प्रत्येक सूर तुम्हाला तुमच्या स्वतःकडे परत आणतो.”अशा या महान विभूतीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.  

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

  🏻 लेखक: प्रसाद नातु

(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...