Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या !

 ब्लॉग नं. 2025/307.

दिनांक: 1 नोव्हेंबर 2025.

मित्रांनो,

  “या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या !”

जिथे तुमची कदर नाही तिथे का राहावे? भारतमातेला तुमची गरज आहे, आणि तुमचे स्वागत आहे!”  झोहो कॉर्पचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांचे हे शब्द केवळ एक ट्वीट नाहीत,तर प्रत्येक भारतीयाचे,  स्थलांतरितासाठी अंतर्मनाला स्पर्श करणारे आवाहन आहे.आज जगभरातील अनेक भारतीयांनी त्यांची बुद्धिमत्ता, कार्यकौशल्य आणि प्रामाणिकतेच्या जोरावर,परदेशात प्रतिष्ठा कमावली आहे.त्यांचे योगदान इतके मोठे आहे की,अमेरिकेच्या अर्थसंकल्पात भारतीय स्थलांतरितांनी गेल्या 30 वर्षांत सरासरी 1.7 दशलक्ष डॉलर इतके योगदान दिल्याचे आकडे सांगतात.हे सर्वात जास्त आहे,इतर कोणत्याही देशाच्या स्थलांतरितांपेक्षा.पण तरीही देखिल,अमेरिकेचे तोंडाळ राष्ट्रपती आपली मुक्ताफळे उधळीत आहेत.   

वेम्बू यांनी याच आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना म्हटले. भारताने त्याचे सर्वोत्तम पाठवले.” ही ओळ वेदनादायक आहे आणि अभिमानास्पदही आहे.वेदना कारण भारताने आपली प्रतिभा गमावली आहे. आणि  अभिमान,कारण त्या प्रतिभेने जग जिंकले.

🌏 ब्रेन ड्रेन” पासून “ब्रेन गेन”कडे:

दशकानुदशके आपण ‘ब्रेन ड्रेन’बद्दल बोलत आलो आहोत,म्हणजे भारतातील उत्तम मेंदू,उत्तम शिक्षण घेऊन,चांगल्या संधींच्या शोधात परदेशात स्थायिक होतात.परंतु आता काळ बदलतो आहे.भारताची अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान क्षेत्र आणि स्टार्टअप संस्कृती झपाट्याने विकसित होत आहे. “ब्रेन ड्रेन”चा प्रवाह आता उलटा फिरू लागला आहे.अनेक कुशल भारतीय पुन्हा मायदेशी परत येत आहेत,केवळ भावनांनी नव्हे, तर भारताच्या नव्या क्षमतेवर विश्वास ठेवून.

श्रीधर वेम्बू स्वतः याचे उत्तम उदाहरण आहेत. अनेक वर्षे परदेशात राहून त्यांनी ग्रामीण तामिळनाडूमध्ये,स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.आज ते केवळ कंपनी चालवत नाहीत,तर भारताच्या खेड्यांमध्येग्रामीण तंत्रज्ञान क्रांती” घडवण्याचे काम करत आहेत.ते दाखवून देत आहेत की,जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा उद्योग भारताच्या मातीशी जोडला जाऊ शकतो.

🧠 भारताला का हवी आहे परतलेली प्रतिभा?

भारताला आज गरज आहे नव्या विचारांची,नव्या पिढीची आणि नव्या आत्मविश्वासाची.
जगात उंच भरारी घेतलेल्या भारतीयांची दृष्टी, अनुभव आणि कार्यशैली भारताला अधिक सक्षम बनवू शकते.
भारत आज फक्त ‘बाजार’ नाही, तरसंधींचे महासागर” बनला आहे.

तंत्रज्ञान,आरोग्य, शिक्षण, शेती, पर्यावरण आणि उत्पादन क्षेत्र,सर्वत्र मोठ्या बदलांची गरज आहे. आणि हे बदल घडवू शकतील तेच लोक, जे जागतिक दृष्टीकोनासह भारताच्या मातीशी नाळ जोडून राहतात.

💬 समाजातील प्रतिसाद — भावनिक आणि व्यावहारिक:

वेम्बू यांच्या पोस्टनंतर अनेकांनी या आवाहनाला समर्थन दिले.एका वापरकर्त्याने User ने लिहिले: भारताला जागतिक पॉवरहाऊसमध्ये बदलण्याची संधी प्रचंड आहे. योग्य परिसंस्था आणि संधी मिळाल्या तर अनेकजण आनंदाने परत येतील.” तर काहींनी वास्तव मांडले. परत येणे हे केवळ भावनिक असू शकत नाही. नोकरशाही, प्रदूषण आणि कमकुवत पायाभूत सुविधा सुधारल्याशिवाय,भारतात टिकणे कठीण आहे.” हे दोन्ही दृष्टिकोन महत्त्वाचे आहेत. कारण परत येण्यासाठी फक्त देशप्रेम पुरेसे नाही, देशानेही त्यांच्यासाठी योग्य व्यवस्था, सन्मान आणि सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात.

🌿भारताची खरी ताकद – संस्कृती, कुटुंब आणि समुदाय:

अनेकांना वाटते की परदेशातील पैसा आकर्षक आहे,पण भारताची खरी ताकद पैशात नाही.ती संस्कृतीत,कौटुंबिक मूल्यांत आणि आपुलकीत आहे. इथे अजूनही “शेजारी आपल्या मुलासारखा” असतो, “कामगाराला सन्मानाने वागवले” जाते आणि “उद्या सुधारेल” हा आशावाद टिकून आहे.या भावनिक बांधिलकीतच भारताचा आत्मा आहे.आणि तो आत्मा अनुभवण्यासाठी,अनेक परदेशस्थ भारतीय पुन्हा मायदेशाकडे वळत आहेत.

समारोप:  

“घरी या, भारतमातेला तुमची गरज आहे !” श्रीधर वेम्बू यांचे आवाहन हे फक्त एका उद्योजकाचे नव्हे, तर एका देशभक्ताची हाक आहे. भारताला पुन्हा विश्वगुरू बनवायचे असेल, तर आपल्याला आपल्या उत्तम मेंदूंची गरज आहे.परदेशात गेलेले भारतीय हे भारताचे हरवलेले तारे नाहीत, तर वितळलेल्या प्रकाशाचे किरण आहेत,ते   परत आले, तर भारताचा आकाश पुन्हा उजळून निघेल.याचा अर्थ भारतात सध्या कार्यरत असलेले टॅलेंट नाही असे नाही पण त्याला इतरांची साथ मिळेल.ज्याची कमतरता सध्या जाणवते आहे. म्हणूनच... घरी या... भारतमातेला तुमची गरज आहे!” 🌺

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

✍️ प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. अगदी तंतोतंत माझ्या मनातले बोललात
    परदेशी, विशेषतः अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांना माझे पण आवाहन आहे कि *या चिमण्यांनो परत फिरा*

    ReplyDelete
  2. 🙏योग्य आवाहन🙏RR

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...