Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले

ब्लॉग नं. 2025/306.

दिनांक: 31 ऑक्टोबर, 2025.

मित्रांनो,

🌿 कारले — सहजसुंदर, सर्वत्र उपलब्ध होणारे अमृतफळ!🌿

कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरीही कडू ते कडूच! ही ओळ आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. पण या कडवट चवीच्या मागे लपलेले आरोग्याचे गुपित फार थोड्यांना माहीत आहे. खरं सांगायचं झालं, तर कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी नाही! आजच्या ब्लॉगमध्ये आपण याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

सविस्तर:   

🌱 निसर्गदत्त आरोग्याचा खजिना:

ग्रीष्म ऋतूमध्ये सहजपणे मिळणारे,कारले ही एक वेलवर्गीय भाजी आहे.भारतात ती सर्वत्र पिकते. तिचे आयुष्य बरंच दीर्घ असतं आणि काही वेळा ती वेल स्वतःच उगवते.संस्कृतमध्ये “कंदुरा” किंवा “करवल्ली”, हिंदीत “करेला” आणि इंग्रजीत “Bitter Gourd” किंवा “Karela Fruit” म्हणून ती ओळखली जाते.कुकरबिटेसी (Cucurbitaceae) कुळातील ही वनस्पती हिरवट, पांढरसर, काळसर हिरव्या रंगात दिसते. पिकल्यावर आतून ती लालसर किंवा केशरी होते.आकाराने मोठी आणि लहान अशी दोन प्रकारची कारली,तर रंगानुसार हिरवी आणि पांढरी अशी दोन उपप्रकार सर्वत्र आढळतात.

⚠️ हायब्रीड कारल्यांपासून सावधान:

आजकाल बाजारात मोठी, आकर्षक आणि हायब्रीड कारली मिळतात. पण त्यांच्यात औषधी गुणधर्म कमी असतात.म्हणून भरपूर रेषा असलेली, मध्यम आकाराची नैसर्गिक कारलीच वापरावी.

🌿 आयुर्वेदातील कारल्याचे स्थान

आयुर्वेदानुसार कारले हे पित्तशामक,वातानुलोमक,कृमिघ्न आणि मूत्रल आहे.कारल्याची पाने  ज्वरनाशक, कृमीनाशक व मूत्रल आहेत. कारल्यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन A, B आणि K भरपूर प्रमाणात असतात.या सर्व घटकांमुळे कारले शरीराला शक्तीवर्धक, रक्तशुद्धीकारक आणि पाचनास उपयुक्त ठरते.

🍀 कारल्याचे औषधी उपयोग:

🩸 1) मधुमेहावर प्रभावी उपाय:

कारल्याचा रस रक्तातील साखर आणि लघवीतील ग्लुकोज कमी करतो.परंतु तो थेट ग्लासभर न घेता केवळ 4-6 चमचे रस पाण्यात मिसळून घ्यावा.नियमित सेवनाने साखर नियंत्रणात राहते आणि वजनही कमी होते.

💧 2) चरबी आणि विषबाधा:

शरीरातील जादा चरबी आणि विषारी घटक दूर करण्यासाठी कारल्याचे नियमित सेवन फार प्रभावी ठरते.

🦟 3) त्वचा जळजळ आणि कीटकदंश:

कारल्याच्या पानांचा रस,अंगाला चोळल्यास पिसू किंवा कीटक चावल्याने,होणारी आग व सूज कमी होते.

🍛 4) भूक न लागणे, पचनदोष.

तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, पचन नीट न होणे या सर्व तक्रारींवर कारल्याची भाजी अमृतासमान आहे.

🌸 5) त्वचारोगावर रामबाण उपाय:

कारले हे उत्तम रक्तशुद्धीकारक असल्याने खाज,चट्टे,खरूज,नायटे, सोरायसीस अशा विकारांवर प्रभावी ठरते.कारल्याच्या रसात लिंबूरस घालून उपाशीपोटी घेतल्यास उत्तम परिणाम दिसतात.

🩺 6) स्त्रीरोगांवर लाभदायक:

पाळीचे विकार, वेळेवर पाळी न येणे किंवा अचानक थांबणे यावर कारल्याचे सेवन फायदेशीर आहे.

👁️ 7) रातआंधळेपणा:

कारल्याच्या पानांचा लेप डोळ्यांवर लावल्यास रातआंधळेपणा दूर होतो, असे आयुर्वेद सांगते.

💦 8) अंगावर सूज:

सकाळी कारल्याचा ताजा रस घेतल्यास सूज कमी होते आणि शरीर हलके वाटते.

🌿 9) श्वसन विकारांवर उपाय:

दमा, सर्दी, खोकला यांसारख्या तक्रारींवर कारल्याचा रस, तुळशीचा रस आणि मध यांचे मिश्रण अत्यंत उपयुक्त आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

🧒 10) कृमी (जंत) नाश:

आठ दिवस कारल्याच्या पानांचा रस दिल्यास शरीरातील कृमी शौचावाटे बाहेर पडतात.

🍋 11) आम्लपित्तावर उपाय:

आम्लपित्त, छातीत जळजळ होत असल्यास कारल्याचे नियमित सेवन करणे हितावह आहे.

🥛 12) मूळव्याधीवर उपचार:

तीन चमचे कारल्याच्या पानांचा रस ताकात मिसळून दुपारी घेतल्यास मूळव्याधी कमी होते. मुळांचा लेप कोंबांवर लावल्यास आराम मिळतो.

🍶 13) दारूचे व्यसन आणि यकृत विकार:

दारूचे सेवन करणाऱ्यांचे यकृत नुकसानग्रस्त होते.कारल्याच्या पानांचा रस सकाळ-संध्याकाळ घेतल्यास यकृताची हानी भरून निघते आणि व्यसन कमी होण्यास मदत होते.

🌞 14) कावीळ व यकृत रोग:

कावीळ झाल्यास कारल्याचा रस दिवसातून दोनदा घ्यावा. यामुळे यकृत शुद्ध होते आणि रंग परत येतो.

🌼 15) त्वचाविकारांसाठी बाह्य उपचार:

कारल्याच्या पानांचा कल्क,हळद आणि तीळतेलात उकळून तयार केलेले तेल,त्वचेला लावल्यास सोरायसीस आणि जुने चट्टे दूर होतात.

🌿 समारोप:

कारले हे केवळ भाजी नाही, तर निसर्गाने दिलेले एक औषधी वरदान आहे. आयुर्वेदात ते रक्तशुद्धी, पचन सुधारणा, रोगप्रतिकार वाढ आणि विषनाशक म्हणून गौरवले गेले आहे. कडू चवीमुळे कारले बहुतेकांना नकोसं वाटतं. पण लक्षात ठेवा. कारल्यासारखं “कडू पण हितकर” दुसरं काही नाही.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...