Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

मधुमेह आणि डायबेटिक रेटिनोपॅथी (डोळ्यांसंबंधी आजार)

 ब्लॉग नं: 2025/265.

दिनांकः 22 सप्टेबर, 2025.

मित्रांनो,

:मधुमेह आणि डोळ्यांचे आरोग्य: जाणून घ्या डायबेटिक रेटिनोपॅथीबद्दल:

आपल्या डोळ्यांची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. डोळ्याच्या गोळ्याला तीन महत्त्वाचे थर असतात –

·        सर्वात बाहेरील थर म्हणजे तंतुमय थर (Fibrous Layer) ज्यात स्क्लेरा आणि कॉर्निया यांचा समावेश होतो.

·        मध्यभागीचा थर म्हणजे रक्तवाहिन्यांचा थर (Uveal Layer) जो युरिया नावाने ओळखला जातो.

·        सर्वात आतला थर म्हणजे मज्जातंतूंचा थर, ज्याला रेटिना म्हणतात. रेटिनामध्ये प्रकाश-संवेदनशील पेशी असतात, ज्या आपल्याला दृष्टी देण्यासाठी आवश्यक आहेत.

डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी रेटिनाचे कार्य महत्त्वाचे असते. परंतु मधुमेहाच्या गुंतागुंतीमुळे या थरावर परिणाम होतो आणि डायबेटिक रेटिनोपॅथी #Diabetes Ratinopathy नावाचा आजार उद्भवतो.

डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय?

डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे,मधुमेहामुळे रेटिनामध्ये होणारे बदल. पाश्चात्य देशांमध्ये अंधत्वाचे हे एक सर्वसामान्य कारण मानले जाते. जगभरात मधुमेहाचे रुग्ण वाढत असल्यामुळे या आजाराचे प्रमाणही वाढताना दिसते आहे. त्यामुळे या गुंतागुंतीला वेळेवर ओळखून योग्य उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

डायबेटिक रेटिनोपॅथीची कारणे आणि जोखीम घटक:

1.       मधुमेहाचा कालावधी:

o   हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो.

o   सुमारे 10 वर्षांनी 50% मधुमेही रुग्णांमध्ये रेटिनोपॅथी दिसते.

o   30 वर्षांनी हे प्रमाण जवळजवळ 90% पर्यंत पोहोचते.

2.       लिंग आणि आनुवंशिकता:

o   महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे.

o   आनुवंशिकता देखील महत्त्वाची भूमिका बजावते.पालकांकडून हा आजार recessive trait स्वरूपात मुलांमध्ये येऊ शकतो.

3.       गर्भधारणा आणि सह-रोग

o   गर्भधारणेमुळे रेटिनोपॅथीतील बदल जलद होऊ शकतात.

o   उच्च रक्तदाबासारखे सह-रोग या आजाराची तीव्रता वाढवतात.

o   खराब चयापचय नियंत्रणही धोकादायक ठरते.

4.       जीवनशैलीशी संबंधित घटक

o   धूम्रपान, लठ्ठपणा आणि हायपरलिपिडेमिया (रक्तातील कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्स वाढणे) यामुळे रेटिनोपॅथीचा धोका अधिक वाढतो.

प्रतिबंध आणि नियंत्रण:

1.       रक्तातील साखर नियंत्रण

o   नियमितपणे ब्लड शुगर तपासणे व नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक.

o   कमी #ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणे.

o   नियमित व्यायाम व औषधांचे पालन करणे.

2.       चयापचय व्यवस्थापन

o   रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल व रक्तदाबाचे काटेकोरपणे नियंत्रण करणे आवश्यक.

o   हिमोग्लोबिनची कमतरता (अ‍ॅनिमिया) टाळणे.

3.       औषधे आणि पूरक आहार

o   काही औषधे जसे Protein Kinase C inhibitors आणि ACE inhibitors डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरता येतात.

o   व्हिटॅमिन ई सारखे अँटीऑक्सिडंट्स फायदेशीर ठरू शकतात.

समारोप:

डायबेटिक रेटिनोपॅथी हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी गंभीर धोका आहे.मात्र योग्य आहार, शिस्तबद्ध जीवनशैली,नियमित व्यायाम,औषधांचे पालन आणि वेळोवेळी नेत्रतपासणी केल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी सजग राहणे हेच खरे औषध आहे.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

  🏻 लेखक: प्रसाद नातु

 (आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...