Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

मधुमेह नियंत्रणाचे दोन आधारस्तंभ

 ब्लॉग नं. 2025/239.  

दिनांक: 28 ऑगस्ट, 2025. 

मित्रांनो,

मधुमेह नियंत्रणाचे दोन आधारस्तंभ: HbA1c आणि SMBG

            तुम्ही कदाचित आश्चर्य करत असाल किंवा तुम्हाला कंटाळवाणे झाले असेल की, मी मधुमेहावर एवढे ब्लॉग कां लिहीत असतो,मला मधुमेह आहे म्हणून? तर निश्चितच नाही. तर भारत सध्या मधुमेहाच्या मूक साथीचा सामना करत आहे.भारतात अंदाजे 10 कोटी लोक मधुमेही आणि 13 कोटी लोक प्रिडायबिटीज अवस्थेत आहेत. हा माझ्या चिंतेचा विषय आहे,आणि ब्लॉगच्या माध्यमातून मधुमेहाविषयी मला जेवढी जागृती करता येईल तेवढी करायची आहे,कारण यांचे दुष्परिणाम मला माहित आहेत. प्रिडायबिटीजची संख्या चिंताजनक आहे आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी,रक्तातील साखरेचे नियमित निरीक्षण करणे केवळ वैद्यकीय सल्ला राहिलेले नाही, तर दैनंदिन आरोग्य साधन बनले आहे.यावर आहे माझा आजचा ब्लॉग.

सविस्तर: 

मधुमेह व्यवस्थापनात दोन महत्त्वाची साधने आहेत:

1.       HbA1c चाचणी

2.       रक्तातील ग्लुकोजचे स्वयं-निरीक्षण (Self-Monitoring of Blood Glucose – SMBG)

दोन्हींची भूमिका वेगळी असली तरी ती एकमेकांना पूरक आहेत. चला, त्यांचा सविस्तर परिचय करून घेऊया.

HbA1c म्हणजे काय?

HbA1c चाचणी, किंवा ग्लायकेटेड हिमोग्लोबिन चाचणी, गेल्या ३ महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेची पातळी मोजते.

WHO आणि RSSDI नुसार संदर्भ श्रेणी:

<5.7% – सामान्य पातळी

5.7% ते 6.4% – प्रीडायबिटीज दर्शवू शकते

6.5% – मधुमेहाशी संबंधित असू शकते (तथापि, निदान डॉक्टरांच्या पुष्टीनेच करावे)

ही चाचणी,तुम्हाला मागील तीन महिन्यांत रक्तातील साखरेचे एकूण नियंत्रण,कसे होते हे समजते. मात्र, एखाद्या दिवसातील साखरेतील चढ-उतार ही चाचणी दाखवत नाही.

SMBG म्हणजे काय?

SMBG म्हणजे घरी ग्लुकोमीटरच्या मदतीने रक्तातील साखरेची तपासणी करणे.यामुळे त्या क्षणी रक्तातील साखरेची पातळी कळते आणि दैनंदिन निर्णय घेणे सोपे होते.

सामान्य चाचणी वेळा (डॉक्टरांच्या सल्ल्याने वैयक्तिकृत करा):

1.सकाळी उपाशीपोटी (<100 mg/dL)

2.जेवणापूर्वी व जेवणानंतर (80–130 mg/dL; <180 mg/dL)

3.झोपण्यापूर्वी

4.व्यायामापूर्वी व नंतर

5.तब्येत बिघडल्यास किंवा हायपोग्लायसेमियाची लक्षणे असल्यास (<70 mg/dL असल्यास त्वरित उपचार)

6.सण, उपवास, प्रवास किंवा औषधात बदल करताना

 

HbA1c चाचणी

रक्तातील ग्लुकोजचे स्वयं-निरीक्षण (Self-Monitoring of Blood Glucose – SMBG)

दीर्घकालीन चित्र दाखवते.

दिवसातील व त्या क्षणातील रिअल-टाइम माहिती देते.

दीर्घकालीन सरासरी दाखवते, पण दैनंदिन चढ-उतार पकडत नाही.

तात्काळ बदल ओळखते, पण दीर्घकालीन ट्रेंड दाखवत नाही.

HbA1c वर अवलंबून राहिल्यास दैनंदिन चढ-उतार दुर्लक्षित होऊ शकतात.

SMBG वापरल्यास मोठा पॅटर्न दिसत नाही.

मधुमेह नियंत्रणासाठी दोन्ही माहिती आवश्यक आहे.

मधुमेह नियंत्रणासाठी दोन्ही माहिती आवश्यक आहे.

क्रिकेटची तुलना:

कल्पना करा की, एका फलंदाजाने 6 चेंडूत 12 धावा केल्या. हा एकूण स्कोअर म्हणजे HbA1c, पण त्या धावा कशा केल्या तर (2 + 4 + ० + 6 + 0 + 0) – हे SMBG सांगते.
SMBG बद्दलच्या सामान्य गैरसमजुती

"चाचणी वेदनादायक असते" प्रत्यक्षात आधुनिक ग्लुकोमीटरमध्ये चाचणी जलद, जवळजवळ वेदनारहित व फक्त एका थेंब रक्तात होते.

"ठीक वाटत असेल तर साखर नियंत्रणात असते"  ही चुकीची समजूत आहे. रक्तातील साखरेचे चढ-उतार लक्षणांशिवायही होऊ शकतात.

व्यवहार्य सल्ला:

टाइप 2 मधुमेह = तोंडी औषधेआठवड्यातून 2-3 वेळा उपाशीपोटी व जेवणानंतर तपासणी.

इन्सुलिन थेरपी = दिवसातून 2-4 वेळा तपासणी.

प्रीडायबिटीज / जीवनशैलीतील बदलवर्षातून 1-2 वेळा तपासणी.

समारोप:

HbA1c आणि SMBG हे मधुमेह व्यवस्थापनाचे दोन आधारस्तंभ आहेत. HbA1c दीर्घकालीन धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त आहे, तर SMBG दैनंदिन निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. दोन्ही एकत्र वापरल्यास रुग्ण, डॉक्टर आणि कुटुंबीय यांना साखर नियंत्रणाची संपूर्ण माहिती मिळते आणि गुंतागुंतीचा धोका कमी होतो.

मधुमेह नियंत्रण ही केवळ औषधांची बाब नाही, तर सततचे निरीक्षण, योग्य आहार, व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला यांचा संगम आहे.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 🏻 लेखक: प्रसाद नातु

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...