Skip to main content

Posts

Showing posts from April, 2025

मेंदूत स्वतःला बदलण्याची अद्भुत क्षमता म्हणजे न्यूरोप्लॅस्टिसिटी

  ब्लॉग नं: 2025/035. दिनांक: 4 फेब्रूवारी, 2026. मित्रांनो,   न्यूरोप्लॅस्टिसिटी : मेंदू त स्वतःला बदलण्याची अद्भुत क्षमता आपण अनेकदा म्हणतो , “ आता माझं वय झालं , सवयी बदलणं कठीण आहे” किंवा “ मेंदू एकदा घडला की बदलत नाही.” पण आधुनिक न्यूरोसायन्स हे स्पष्टपणे सांगते की मेंदू सतत बदलत असतो. या विलक्षण क्षमतेलाच म्हणतात — न्यूरोप्लॅस्टिसिटी ( Neuroplasticity). आज आपण न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे काय ? हे समजून घेण्याचा प्रयत्न करू या. सविस्तर:  न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे, अनुभव , शिकणे , विचार , भावना , दुखापत किंवा उपचारांच्या परिणामामुळे मेंदूची रचना आणि कार्य बदलण्याची क्षमता. सोप्या शब्दांत सांगायचं तर, आपला मेंदू ‘स्टॅटिक’ नसून ‘डायनॅमिक’ आहे. पूर्वी काय समजलं जात होतं ? एकेकाळी असा समज होता की, मेंदू बालपणातच पूर्ण विकसित होतो, एकदा न्यूरॉन्स नष्ट झाले की ते पुन्हा निर्माण होत नाहीत आणि वृद्धत्वात मेंदू बदलू शकत नाही पण संशोधनाने हे सर्व गैरसमज खोटे ठरवले. न्यूरोप्लॅस्टिसिटी कसं काम करते ? मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स ( Neuron) असतात. हे न्...

पाणीपुरी विभिन्न नांवे असणारा पदार्थ

ब्लाॅग नं.2025/119. दिनांक: 30 एप्रिल, 2025. मित्रांनो,   पाणीपुरी किंवा   गोलगप्पा हा एक भारतीय नाश्ता आहे.हा   राज्यांच्या सीमा ओलांडून सर्वत्र चवीने खाल्ला जातो. आणि संपूर्ण भारतभरात चव मात्र वेगवेगळी पहायला मिळते आणि वेगवेगळ्या नांवाने ओळखला जातो.पण तुम्हाला माहित आहे का ? ती प्रत्येक   प्रदेशाची अद्वितीय चव आणि संस्कृती प्रतिबिंबित करते ? चला भारतातील राज्यांमध्ये गोलगप्पांची वेगवेगळी नावे आणि स्वादिष्ट प्रकार आजच्या ब्लॉग मधे जाणून घेणार आहोत. सविस्तर : गोलगप्पांची वेगवेगळी नावे आणि प्रकार 1.  राजेशाही गोलगप्पा: उत्तर भारतात , विशेषतः दिल्ली , पंजाब , जम्मू आणि काश्मीर , हरियाणा , मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये , या नाश्त्याला गोलगप्पा म्हणून ओळखले जाते. कुरकुरीत पुरीमध्ये बटाटा , हरभरा आणि चटणीचे परिपूर्ण मिश्रण भरलेले असते , जे मसालेदार आणि पुदिन्याच्या पाण्याच्या स्वादिष्ट मिश्रणासह दिले जाते. 2. पुचकाचे पूर्वेकडील आकर्षण: पश्चिम बंगाल , बिहार आणि झारखंडमध्ये पुचका किंवा फुचका म्हणून लोकप्रिय , या नाश्त्यामध्ये आट्याने...

वाढलेल्या वजनावर कसा विजय मिळवावा?

ब्लॉग नं.2025/118 दिनांक: 29 एप्रिल, 2025. मित्रांनो,             आज कालच्या आजाराच्या समस्यामध्ये वाढते किंवा वाढलेले वजन ही एक समस्या झाली आहे. कारण नुसतं वजन वाढले असं होतं नाही तर त्यासोबत वेगवेगळे आजार होऊ शकतात. आणि ते जास्त गंभीर आहे. कारण पूर्वी वाढत्या वजनासोबत,वेळी अवेळी जेवणं, कामाचे बैठे स्वरूप आणि अयोग्य आहार या गोष्टी नसतं. त्यामुळे पूर्वी आजार मागे लागायचा तेवढा धोका नव्हता. पण आजकाल या सर्व गोष्टींमुळे आजार मागे लागतात. आजच्या ब्लॉगमध्ये या सर्व गोष्टींवर आपण जाणून घेणार आहोत.                                           सविस्तर: आजच्या गतिमान जीवनशैलीत वजन वाढणे ही सामान्य समस्या बनली आहे.अयोग्य आहार , ताणतणाव , अपुरी झोप , आणि शारीरिक क्रियाशीलतेचा अभाव यामुळे वजन वाढत आहे. वजन वाढल्याने केवळ दिसण्यावर परिणाम होत नाही , तर शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. वजन ...

वाढत्या तापमानामुळे नेत्रसंसर्ग

ब्लॉग नं.2025/117 दिनांक: 28 एप्रिल,2025.     मित्रांनो ,             या वर्षी तापमानाने उच्चांक गाठलाय. सर्दी,खोकला,ताप,अपचन इत्यादि नेहमीच्या आजारांसोबतच यावर्षी नेत्रसंसर्गाचा धोका सुद्धा जाणवतोय.यातील वाईट गोष्ट ही की त्यामुळे डोळे कोरडे पडत आहेत,म्हणजे डोळ्यातील पाणी संपून जात आहे.म्हणून कुणाला डोळे दुखण्याचे, डोळे चुरचुरण्याचे,तसेच डोळ्यातून पाणी येणे यासारखे तक्रारी तुम्हाला जाणवत असतील तर त्याकडे गंभीरपणे लक्ष द्या.आजचा ब्लॉग आहे,याच विषयावर. सविस्तर: वाढत्या तापमानाचा मानवाच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. त्यामध्ये डोळ्यांचे आरोग्यही वेगळे राहू शकत नाही.उष्णतेचा वाढता प्रभाव आणि प्रदूषण यामुळे नेत्रसंसर्ग (कॉनजंक्टिव्हायटिस) होण्याचा धोका वाढला आहे. नेत्रसंसर्ग ही डोळ्यांची एक संसर्गजन्य अवस्था आहे ज्यामुळे डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर आणि आतल्या पापणीवर जळजळ , खाज , आणि लालसरपणा येतो. वाढत्या तापमानामुळे ही समस्या अधिक गभीर होऊ शकते. नेत्रसंसर्ग म्हणजे काय ? नेत्रसंसर्ग म्हणजे डोळ्यांच्य...

निद्रिस्त मनाची अदभूत शक्ती

Blog No. 2025/116   Date 27 एप्रिल, 2025. मित्रांनो ,              आज मी तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे. माणसाचे जीवन हे सकारात्मक अंगाने घेतले तर खूप छान आहे , हे जीवन आपल्याला जगायला मिळणे हीच खरं तर खूप आनंददायी गोष्ट आहे. एकूण काय सकारात्मक अंगाने विचार केला तर , आपल्याला ह्यात आनंदच दिसून येतो. पण नकारात्मक अंगाने विचार केला तर हेच जीवन खूप त्रासदायक आहे असे वाटून जातं.त्याची सुरुवात आपण करतो ती अगदी आई वडिलांनी आपल्याला लहानपणी मनासारखे वागू दिले नाही इथपासून.शाळेत शिक्षकांनी चूक नसतांना मलाच मारले , कॉलेज मनासारखे मिळाले नाही , नोकरी मनासारखी मिळाली नाही , नोकरीत पोस्टिंग मनासारखे मिळाले नाही , बॉस मनासारखा मिळाला नाही , अगदी बायको देखिल मनासारखी मिळाली नाही.बापरे ! नकारात्मक अंगाने विचार केला तर किती गोष्टी विरुद्ध गेल्या असं दिसतं. पण मित्रांनो , काही गोष्टींना काय बऱ्याचशा गोष्टींना आपण जबाबदार असतो.कारण प्रत्येक गोष्टीचा विचार आपण नकारात्मक करत असतो , आणि आपल्या विचार करण्याचा परिणाम नकारात्...

वेदनारहित झोप महत्वाची

ब्लॉग नं. 2025/115 दिनांक: 26 एप्रिल , 2025.   मित्रांनो , जीवनात आहार , व्यायाम या सोबतच झोप अतिशय महत्वाची आहे. एखाद्या दिवशी झोप व्यवस्थित झाली नाही की त्याचा परिणाम पूर्ण दिवसावर होतो.झोप ही मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. शारीरिक आरोग्य , मानसिक ताजेतवानेपणा आणि उत्पादकता यासाठी झोप अत्यंत गरजेची आहे. पुरेशी झोप घेतल्याने शरीरातील ऊर्जा पुनर्निर्मित होते , मेंदू ताजेतवाना होतो , आणि एकूणच कार्यक्षमतेत वाढ होते. पण काही वेळेस आपल्याला काही वेदना होत असतं,अंगदुखी जाणवत असते,तेव्हा आपण या वेदना किंवा दु:खासोबत सोबत झोपतो.आजचा ब्लॉग या विषयावर आहे. सविस्तर: शास्त्रज्ञांच्या मते , झोप ही मेंदूसाठी "डिटॉक्सिफिकेशन"ची प्रक्रिया आहे. झोपताना मेंदू दिवसभरात मिळालेल्या माहितीची योग्यरीत्या छाननी करतो आणि महत्त्वाच्या आठवणी साठवतो. यामुळे निर्णयक्षमता आणि सर्जनशीलता वाढते. झोपेचा अभाव असलेल्या व्यक्तींमध्ये चिडचिडेपणा , ताणतणाव , आणि एकाग्रतेचा अभाव दिसून येतो.शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनेही झोप अत्यंत महत्त्वाची आहे. पुरेशी झोप घेतल्याने शरीरातील संप्रेरक संतुलित...