Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

बहारोने मेरा चमन लूट कर

ब्लॉग नं.2025/057.

दिनांक: 26 फेब्रूवारी, 2025.

मित्रांनो,

कधी कधी काही गाणी खूप दिवस लक्षात रहातात.एवढेच नव्हे ते तर ती आपल्या मनावर कोरली जातात.अशी खूप आशयपूर्ण गाणी जी मनात ठसून रहातात आणि काही वेळा त्या गाण्यांशी काही आठवणी जोडल्या जातात.तरुणपणी मनुष्याच्या वाटेला असे काही प्रसंग येतात की जे एखाद्या गाण्याशी जोडले जातात.अशीच एक गोष्ट मी आज सांगणार आहे,त्या गोष्टीशी म्हणा,आठवणीशी म्हणा हे गाणे जोडले गेले आहे. 

सविस्तर:

         मी रेल्वेने नासिक रोड स्टेशनवरुन अकोल्याला येत होतो. नासिक रोडला एक वरात एका डब्यात चढली.ते सर्व एका डब्यात चढले होते.पण आतापर्यन्त नवरी मुलगी आणि नवऱ्या मुलासोबत अगदी मोकळे पणाने बोलणारा एक तरुण मुलगा माझ्या सोबत दुसऱ्या डब्यात चढला. तो वरातीसोबत चढला नाही.अचानक एक माणूस जो ट्रांजिस्टर घेऊन बसला होता. त्याच्या रेडियोवर  स्व.मुकेश यांनी गायलेले,“देवर” सिनेमातील हे गाणं लागलं.गीत आनंद बक्षी यांच, संगीत रोशन (राजेश आणि राकेश रोशन यांचे वडील) यांच आणि याचं चित्रण हे धर्मेंद्रवर करण्यात आलं होतं.                             

बहारों ने मेरा चमन लूटकर, खिज़ां को ये इल्ज़ाम क्यों दे दिया.  

किसीने चलो दुश्मनी की मगर, इसे दोस्ती नाम क्यों दे दिया.  

बहारों ने मेरा ...

             हे गाणं सुरू होताच तू मघाशी डब्यात प्रवेश करता झालेला तरुण अस्वस्थ झाला.तो ट्रांजिस्टर घेऊन बसलेल्या माणसाला म्हणाला,काका हे गाणं बंद करा न.त्या गृहस्थाने विचारले कां? तर तो म्हणाला की त्या गाण्याच्या नायकाच्या बाबतीत जे घडले आहे.तसेच माझ्या बाबतीत झाले आहे.मी त्याला विचारले तर तो म्हणाला. या गाण्याचा अर्थ सांगतो आधी, मग माझी कहाणी.   

माझी बाग वसंत ऋतुने उजाड करून टाकली पण दोष मात्र शरद ऋतुला दिला.

कुणीतरी शत्रुत्व केले आहे पण त्याला मैत्रीचे गोंडस नांव दिले आहे.            

मैं समझा नहीं ऐ मेरे हमनशीं, सज़ा ये मिली है मुझे किस लिये.  

के साक़ी ने लब से मेरे छीन कर, किसी और को जाम क्यों दे दिया

बहारों ने मेरा ...

मला समजत नाही मित्रा की मला ही कसली शिक्षा मिळाली आहे.

की माझ्या हातातला मद्याचा प्याला हिसकावून कुणी दुसऱ्याला दिला.    

मुझे क्या पता था कभी इश्क़ में, रक़ीबों को कासिद बनाते नहीं.   

खता हो गई मुझसे कासिद मेरे, तेरे हाथ पैगाम क्यों दे दिया

बहारों ने मेरा ...

मी प्रेमाच्या बारीक सारिक गोष्टींबाबत पूर्ण अनभिज्ञ होतो.

आपल्या प्रेमिकेच्या दुसऱ्या प्रेमीला कधीच संदेशवाहक बनवू नये.    

माझ्याने चूक झाली,मी माझ्या हाताने प्रतिस्पर्ध्याच्या हातात लगाम देऊन टाकला.    

खुदाया यहाँ तेरे इन्साफ़ के, बहुत मैंने चर्चे सुने हैं मगर.  

सज़ा की जगह एक खतावार को,भला तूने ईनाम क्यों दे दिया.  

हे परमेश्वरा, तुझ्या न्याय प्रियतेच्या खूप चर्चा ऐकल्या होत्या.

पण तू गुन्हेगाराला शिक्षा करण्याऐवजी बक्षीस कां देऊन टाकलेस.

            हा अर्थ सांगून तो त्या गृहस्थाला आणि मला, पुढे म्हणाला, “मी आणि ती मुलगी एकाच वर्गात शिकत होतो. तो नवरा मुलगा माझा मावस भाऊ,एकदा आमच्या घरी पाहुणा म्हणून आला होता.माझं आणि त्या मुलीचं  प्रेम होते आणि मी त्याला तसं सांगितलं होतं.मीच स्वतः त्याची ओळख माझ्या मैत्रिणीशी करून दिली.मी माझे म्हणणे माझ्या आई बाबांना सांगू शकलो नाही.त्यानं तिच्या आई बाबांना सांगायची हिम्मत केली.आणि त्यानं त्याचं प्रेम त्यांच्या मुलींवर असल्याचं सांगितलं. आणि दोघांचे लग्न झालं.अगदी एका चित्रपटात शोभेल अशी माझी कहाणी आहे.प्रेम हिम्मत असेल तरच करांव.हा धडा तो मला शिकवून गेला. म्हणून हे गाणं लागलं की मी ते बंद करतो.”

समारोपः

            तेव्हा त्याला ते काका काय म्हणाले हे महत्वाचे आहे.ते म्हणाले, “राजा, तू एका चांगल्या गाण्याचा आनंद घ्यायला मुकला आहेस. अरे गाणं बंद करून तुला झालेलं दुख: कधीच हलकं होणार नाही.आज या गाण्याने तुला बोलतं केलं बघं. दु:खाला असं मनात कोंडून टाकू नकोस, मोकळं कर. मग हेच गाणं तू स्वतः म्हणशील.” खरं आहे काही वेळा आपण उगाच दु:ख कुरवाळत बसतो आणि त्याच्या कोशात स्वतःला अडकवून घेतो आणि मोकळा श्वास घेऊ शकत नाही. हे गाणं आणि त्याची गोष्ट मला खूप काही शिकवून गेली.               

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु. 

 



Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...